शहरं
Join us  
Trending Stories
1
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
2
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
3
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
4
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
5
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
6
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
7
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; आतापर्यंत ११ जण ठार, ३३ जखमी!
8
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
9
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
10
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
11
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
12
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
13
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
14
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
15
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
16
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
17
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
18
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
19
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
20
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ

आहे मनोहर तरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 09:24 IST

सर्वच विभागांमध्ये आॅनलाईन प्रणालीचा आग्रह धरला जात असताना त्या तुलनेत शासकीय कार्यालयांचे संगणकीकरण, आधुनिकीकरण झालेले नाही.

मिलिंद कुलकर्णी - केंद्र आणि राज्य सरकारकडून गाव आणि शहर केंद्रबिंदू मानून धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. स्वच्छ भारत अभियान, घरकुले, रस्ते, आरोग्य केंद्रे, शाळा, पेयजल आणि जलशुद्धीकरण केंद्र, घनकचरा निर्मूलन अशा विषयांवर अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना गरजू लाभार्भींपर्यंत पोहोचण्यासाठी ‘डीबीटी’ (अर्थात लाभार्थीच्या खात्यात थेट अनुदान)चा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. आधार जोडणी त्यासाठी सक्तीची करण्यात आली आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये हा क्रांतीकारी बदल होता.

दलाल, लालफित, भ्रष्टाचार या बाबींना आळा बसणार आहे. परंतु सर्वच विभागांमध्ये आॅनलाईन प्रणालीचा आग्रह धरला जात असताना त्या तुलनेत शासकीय कार्यालयांचे संगणकीकरण, आधुनिकीकरण झालेले नाही. मंत्रालय, विभागीय कार्यालयापर्यंत आधुनिकीकरण असले तरी जिल्हा आणि तालुका पातळीवर वेगळेच चित्र आहे. भाड्याच्या इमारती, विजेची थकबाकी, इंटरनेटसंबंधीच्या तक्रारी, संगणकाविषयी जुजबी माहिती असलेले कर्मचारी अशा विषम स्थितीत १०० टक्के अपेक्षापूर्ती कशी होणार हा प्रश्न आहे.

वास्तव सगळ्यांना दिसत असले तरी त्याकडे कानाडोळा करीत कर्मचा-यांकडून ‘रिझल्ट’ची अपेक्षा पंतप्रधानांपासून तर सरपंचायपर्यंत सगळेच करीत आहेत. कर्मचा-यांची कोंडी याठिकाणी होत आहे. मंत्री, जिल्ह्याचे अधिकारी आढावा बैठका, साप्ताहिक अहवाल या माध्यमातून योजनांच्या प्रगतीची माहिती निरंतर जाणून घेत आहेत. आडात नाही तर पोह-यात कुठून येणार? हा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाची योजना अशीच बारगळली आहे. शालेय विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे. त्या खात्यात गणवेशाची रक्कम जमा होणार आहे. तालुका आणि मोठ्या गावांच्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकाच्या मोजक्या म्हणजे ३-४ शाखा असतात. झीरो बॅलन्सने बचत खाते उघडण्याचे आदेश असल्याने बँक अधिकारी व कर्मचा-यांचा त्यासाठी फारसा उत्साह नसतो. त्यांना ठेवी, कर्ज यासंबंधी उद्दिष्टये असल्याने त्या कामासाठी अधिक वेळ दिला जातो. परिणामी ५० टक्कयाहून अधिक विद्यार्थ्यांना सहा महिने उलटूनही गणवेश मिळालेला नाही. असे अनेक योजनांच्या बाबतीत झालेले आहे.

केंद्र सरकारने साडेतीन तर राज्य सरकारने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडायचा असल्याने आता योजनांच्या पूर्णत्वासाठी आग्रही भूमिका घेतली जाऊ लागली आहे. वास्तवाकडे दुर्लक्ष करुन योजना पूर्णत्वाचा हट्टाग्रह वादाचे कारण बनत आहे. जळगाव हे त्याचे मोठे मासलेवाईक उदाहरण आहे. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी जळगावच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. निधी मिळायला वर्ष लागले. हा निधी जळगाव शहरात खर्ची होणार आहे. महापालिकेत खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे तर आमदार भाजपाचे आहेत. दोघांचे कार्यक्षेत्र जळगाव शहरच आहे. पण या निधीच्या विनियोगावरुन आमदार आणि महापौर यांच्यात कलगीतुरा रंगला. आमदार सत्ताधारी असल्याने निधी मी आणला, त्यामुळे कोणती कामे करायची, कोणत्या यंत्रणेमार्फत हे मीच ठरविणार असा त्यांचा आग्रह आहे. तर महापालिकेकडे यंत्रणा असताना ही कामे दुसºया संस्थेला कशासाठी? जळगावकरांच्या मुलभूत सुविधांसाठी हा निधी वापरावा, असे महापौरांचे म्हणणे. चार वेळा कामांच्या याद्या बदलल्या. निधी येऊनही खर्च होत नसल्याचे हे उदाहरण म्हणजे राजकीय नेत्यांमधील परिपक्वतेचा अभाव असेच म्हणावे लागेल. हाच अनुभव चाळीसगावच्या गटविकास अधिका-याला आला आणि त्याने चक्क पंचायत समितीच्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न गेल्या आठवड्यात केला.

आता त्याच्या फिर्यादीवरुन सभापतींसह अन्य पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रशासनाकडून काम करवून घेण्याची हातोटी लोकप्रतिनिधींकडे अपेक्षित असते. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार हे उत्तम प्रशासक होते. लाटेवर स्वार होणा-या लोकप्रतिनिधींनी हे लक्षात घ्यायला हवे. सुरेश भोळे आणि उन्मेष पाटील हे दोन्ही आमदार प्रथमच निवडून आले आहेत. त्यांचा उत्साह समजू शकतो, पण त्याला नियम, विवेकाची जोड असायला हवी. अन्यथा गेल्या पंचवार्षिकमध्ये खान्देशातील मतदारांनी पहिल्यांदा निवडून आलेल्या तब्बल ९ आमदारांना घरी पाठविले होते. हा इतिहास फारसा जुना नाही.

टॅग्स :JalgaonजळगावonlineऑनलाइनGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAdhar Cardआधार कार्ड