शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

अग्रलेख : अखेरची दंगल! विधानसभेसाठी हवे त्यांना बळ मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 08:00 IST

गेलेली लोकसभा आणि येणारी विधानसभा याच्यामधील ही कुस्ती म्हणजे अखेरची दंगलच होती.

अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून जेमतेम ३९ दिवस झाले आहेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यास जेमतेम ६० दिवस उरले आहेत. लोकसभेला महाराष्ट्राच्या मतदारांनी दिलेला कौल पाहता सत्तारूढ आणि विरोधकांचा जय-पराजय दोन्हीही घडला. असे वातावरण असताना विधान परिषदेची निवडणूक काल पार पडली. विधानसभेच्या सदस्यांनी निवडून द्यायच्या ११ जागांसाठी त्या-त्या पक्षांच्या सदस्यसंख्येप्रमाणे उमेदवार विजयी होतात. यावेळी विधान परिषदेला प्रथमच सहा पक्ष रिंगणात उतरल्याने चुरस होईल, असे वाटत होते. संख्याबळानुसार काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य निवडून येईल, असे मानले जात होते. प्रत्यक्षात भाजपचा एक सदस्य जादा निवडून आणण्यात यश मिळविले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने उमेदवार उभा न करता शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. काँग्रेसकडे ३७ सदस्य असल्याने एक उमेदवार विजयी होऊन चौदा मते शिल्लक राहणार होती. काँग्रेसने उद्धवसेनेला मदत केली. तशी मदत जयंत पाटील यांना केली नाही. याउलट काँग्रेसची पाच मते फुटली, असा दावा करण्यात आला आहे. 

आपापली मते शाबूत राहावीत यासाठी महायुतीमधील घटक पक्षांनी फार काळजी घेतली होती. लोकसभा निवडणुकीत त्यांना अपेक्षित नसलेल्या पराभवास सामोरे जावे लागले. मात्र केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने त्यांचे अवसान गळले नाही. जनतेने पुन्हा एकदा मोदी सरकारलाच कौल दिला आहे, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी महायुती करीत आहे.  अर्थसंकल्पाद्वारे अनेक सवलतींची पेरणी केली आहे. त्याआधारे विधानसभेची निवडणूक जिंकायची असेल तर ही नुरा कुस्तीसारखी विधान परिषदेची दंगल हरून चालणार नव्हते. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने हे शहाणपण आले आहे, असेच वातावरण विधिमंडळाच्या परिसरात निवडणूक काळात होते. अजित पवारांचा पक्ष आणि शिंदेसेनेने दोन उमेदवार निवडून आणण्याइतके संख्याबळ नसतानाही सत्तेवर असल्याचा लाभ उठविला. छोट्या-छोट्या पक्षांचे एक-दोन आमदार, अपक्षांची मते एकत्र करीत महायुतीने ११ पैकी नऊ उमेदवार सहजपणे निवडून आणले. भाजपने राजकीय गणिते घालत उमेदवारी दिली होती. महायुतीमध्ये त्यांना मोठ्या भावाची भूमिका निभवायची आहे. लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांचा पराभव ओबीसी राजकारणासाठी जिव्हारी लागला होता. त्यांचे पुनर्वसन करण्यात भाजपला अखेर यश आले. योगेश टिळेकर या मध्यमवर्गीय शहरी चेहऱ्याला संधी देऊन सामान्य कार्यकर्त्याला अजूनही पक्षात स्थान असल्याचे दाखवून दिले. सदाभाऊ खोत हा शेतकरी चेहरा मतदारांना हाकाट्या तरी देऊ शकतो. अशी गणिते घालत भाजपने या निवडणुकीत सावरण्याचा प्रयत्न केला, त्याला चांगले यश मिळाले. शिंदेसेनेने भावना गवळी यांचे पुनर्वसन केले असे म्हणायला हरकत नाही. लोकसभेला त्यांना उमेदवारी देण्यावरून भाजपशी वाद झाला. अखेर त्यांना उमेदवारी नाकारली आणि पराभवही पदरी आला होता. त्याची भरपाई झाली. अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केविलवाणी अवस्था झाली होती. त्यांच्या पक्षाला जागावाटपात चारच जागा मिळाल्या आणि एकच निवडून आली. त्यांच्या रोखठोक स्वभावाची हवा गेली असेच वातावरण तयार झाले होते. त्यांनाही आता उभारी मिळाली. काँग्रेसची बाजू भक्कम होती. मते फुटण्याची त्यांची परंपरा कायम राहिली. प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी मिळून न्याय झाला असे वाटते. 

गेलेली लोकसभा आणि येणारी विधानसभा याच्यामधील ही कुस्ती म्हणजे अखेरची दंगलच होती. विशेष म्हणजे चालू विधानसभेच्या कार्यकाळातील कामकाजाचाही शुक्रवारी अखेरचा दिवस होता. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण अनेक निवडणूक दंगलींनी ढवळून निघाले आहे. त्यात मतदारांचा कौल कोणत्या बाजूने होता, त्याची पहिली चाचणी लोकसभेच्या परीक्षेने पूर्ण झाली आहे. आता विधानसभेसाठी ज्यांना ज्यांना बळ हवे होते ते मिळाले. अनेकांना उमेदवारी देतानाचे साक्षीदार असणारे मिलिंद नार्वेकर एकदाचे आमदार झाले. आजवरचा विधान परिषदेच्या निवडणुकांचा इतिहास पाहता ही अखेरची दंगल पुढील लढाईसाठी सर्वांनाच बळ देणारी ठरली, असे म्हणायला हरकत नाही. 

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदvidhan sabhaविधानसभाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी