शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनी सतरंज्यांच्या घड्याच घालत बसायचं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 05:34 IST

‘आयत्या पिठावर रांगोळ्या काढणं सोपं असतं’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. राजकीय क्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही.

‘आयत्या पिठावर रांगोळ्या काढणं सोपं असतं’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. राजकीय क्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही. लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या की, आयाराम-गयारामांचे राजकीय वावटळ उठते. पूर्वी पक्षांतर कायद्याचा अडसर नव्हता, तेव्हा हे वावटळ कधीही उधळायचे, सरकार अल्पमतात यायचे, मुख्यमंत्री बदलले जायचे. सतराव्या लोकसभेची निवडणूक सुरू होताच, अनेक राजकीय घराण्यांतील पहिली नव्हे, तर तिसरी पिढीसुद्धा आता आयत्या पिठावर रांगोळ्या काढण्यासाठी पक्ष, तत्त्व, विचारधारा, आदी सर्व गुंडाळून ठेवून पुढे येत आहे. यातून राजकारणाचे गांभीर्यच संपत चालले आहे.नगर जिल्ह्याच्या राजकारणावर गेली सत्तर वर्षे दबदबा ठेवून असणाऱ्या विखे-पाटील घराण्याचे तिसऱ्या पिढीचे वारसदार डॉ. सुजय विखे पाटील यांना लोकसभेत प्रवेश करण्याची घाई झाली आहे. त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे-पाटील यांनी अनेक वेळा काँग्रेसमध्ये राहूनच बंडखोरी केली. त्यात अपयश आल्यावर शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण करीत केंद्रीय मंत्रीही झाले. त्याच मार्गाने सुजय विखेसुद्धा जात आहेत. ‘अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याचे तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपाच्या वाटेवर’ अशा बातम्या येत आहेत. शरद पवार यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीचे दोन शिलेदार निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहेत. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी निवडणूक लढविणारच, असा निर्धार करताच, शरद पवार यांना माढ्यातून माघार घेऊन कुटुंबातील तीन-तीन उमेदवार नकोत, अशी भूमिका घ्यावी लागली.काँग्रेस पक्षात घराणेशाही आहे, असा आरोप करणाऱ्या विरोधकांनीही आपली घराणी उभी केली आहेत, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर प्रहार करताहेत. बीडचे राजकारण मुंडे घराण्याभोवती, तर जळगावचे खडसे घराण्याच्या अंगणातच खेळले जात आहे. कोणाला झाकावे आणि कोणाचा चेहरा उघडून दाखवावा? नेत्यांच्या वारसदारांनी राजकारण करण्यास कोणाची हरकत असायला नको, पण या नव्या पिढीच्या सर्व उड्या आयत्या पिठावर आहेत. राजकीय तत्त्वज्ञान नाही. विचारधारेशी काही देणे-घेणे नाही. राजकारण करायचे म्हणजे वलय लागते, बळ लागते, धन लागते, या पिढीला हे सर्व आयते मिळाले आहे. त्या जोरावर राजकीय पक्षांनाही तत्त्वज्ञानाशी तडजोड करण्याची ताकद यांच्यात आली आहे.नगरचे तीन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले दिलीप गांधी जनसंघापासून भाजपाचे काम करतात. कालपर्यंत जनसंघ किंवा भाजपाच्या तत्त्वज्ञानाशी काही देणे-घेणे नसलेले काँग्रेसी नेत्याचे चिरंजीव म्हणून वावरणाऱ्या सुजय विखे यांच्यासाठी गांधींचा बळी द्यायला भाजपाने क्षणाचाही विचार केला नाही. असे असंख्य कार्यकर्ते वर्षोनुवर्षे राबत असतात. त्यांना घराण्याचे वलय नसते. सत्तेच्या जोरावर धनसंपत्तीची ताकद मागे नसते. त्यांनी सतरंज्यांच्या घड्याच घालत बसायचे का? नव्या पिढीनेही राजकारण करावे. मात्र, काही विचारधारेची गांभीर्याने मांडणी तरी करावी. यांच्या उड्या या बापजाद्यांनी कमावलेल्या राजकीय, तसेच संपत्तीच्या बळावर मारल्या जातात. अशांना मतदारांनी जागा दाखवायला हवी. केवळ सत्ता मिळविण्याचा धंदा करण्यासाठी या राजकीय उड्या आहेत. राजकीय पक्षसुद्धा हा बाजार मांडण्यास मदत करीत आहेत. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाºया नेत्यांचा बळी द्यायलाही मागे-पुढे पाहिले जात नाही.साताऱ्याचे उदयनराजे, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आदींना सर्वच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचा विचार सोडून उमेदवारी द्यायच्या तयारीत होते. पहिल्या पिढीने तळागाळातील लोकांबरोबर समाज उभारणीचे काम केले होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा घेऊन नव्या भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी ते तत्त्वनिष्ठ राजकारण करीत होते. या आयत्या-रेडीमेड तिसऱ्या पिढीसमोर कोणते स्वप्न आहे? उद्याचा समाज कसा असावा, याचे काही स्वप्न हे पाहतात का? घराण्याच्या मिळकतीवर राजकीय रांगोळ्या काढण्यासाठी त्यात कोणताही रंग भरण्याची त्यांची तयारी आहे, हे लोकशाही प्रक्रिया बळकट होण्यास घातक ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा