शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Dwarkanath Sanzgiri: ओघवत्या शैलीचा समीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 06:01 IST

Dwarkanath Sanzgiri cricket: द्वारकानाथऐवजी आम्ही त्याला पप्पूच म्हणायचो. तो शिवाजी पार्कपाशी म्हणजे क्रिकेटच्या पंढरीत राहायचा, तिथं रमायचा.

-संजीव साबडे, मुक्त पत्रकार लोकप्रिय क्रीडा लेखक आणि हिंदी चित्रपट व संगीताचे कार्यक्रम करणारा द्वारकानाथ संझगिरी पूर्वी महापालिकेत इंजिनिअर होता; पण क्रिकेट आणि संगीताची आवड त्याला तरुणपणी गप्प बसू देत नव्हती. त्यातून त्याने १९७९ मध्ये क्रिकेटवरील पहिला लेख लिहिला दिनांक साप्ताहिकात. त्याची ओघवती शैली, अफाट माहिती, जुन्या आठवणी व किस्से असा सर्व मसाला असलेल्या त्या लेखाने संझगिरी लगेच लोकप्रिय झाला आणि नियमित लिहू लागला. त्याच्या तलत महमूदवरील ‘है सबसे मधुर वो गीत’ या लेखाचीही खूप चर्चा झाली आणि याच लिखाणाने संझगिरीचा पत्रकार व लेखक असा प्रवास सुरू झाला. 

द्वारकानाथऐवजी आम्ही त्याला पप्पूच म्हणायचो. तो शिवाजी पार्कपाशी म्हणजे क्रिकेटच्या पंढरीत राहायचा, तिथं रमायचा. वेळ मिळेल तेव्हा चित्रपट पाहणं हा त्याचा छंद. त्याच्या आवडी आणि छंदांद्वारे लिखाण करून त्यानं लाखो वाचकांना मुग्ध केलं. 

त्याने जवळपास १०-१२ विश्वचषक मालिकांना हजेरी लावली. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशात तो गेला. सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, संदीप पाटील आणि अनेक देशांचे खेळाडू त्याचे मित्र बनले होते. एकदा त्याने श्रीलंकेच्या खेळाडूंना पार्टीही  दिली होती. 

असंख्य सामने पाहिल्याने व खेळाडूच मित्र झाल्याने त्याच्याकडे माहिती, आठवणी आणि किस्से यांचा खजिनाच होता. त्या पेटाऱ्यातून कधी काय काढायचे हे त्याला माहीत असे. त्यामुळे त्याने क्रिकेट आणि खेळाडू यांच्याविषयी अनेक कार्यक्रमही केले. 

सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या कार्यक्रमाला ३००० खुर्च्या असलेला ‘षणमुखानंद हॉल’ फुल होता. ती गर्दी सचिन आणि पप्पू या दोघांसाठी होती. 

पप्पूने क्रिकेट व संगीत यावर ५०० हून अधिक कार्यक्रम केले. संगीतकार रोशन, एस. डी. बर्मन,  सी. रामचंद्र, तसंच मुकेश, रफी, तलत हे गायक आणि देव आनंद, शम्मी कपूर, मधुबाला ते माधुरी अशा त्याच्या संगीताच्या कार्यक्रमांनाही अफाट गर्दी व्हायची. त्याचे परदेशांतही  कार्यक्रम होत. ‘लोकमत’पासून मराठीतील सर्व दैनिकांच्या पानांवर त्याचा वावर असे.

इतकी लोकप्रियता मिळूनही पप्पू वागण्यात साधाच होता. मित्रांमध्ये राहणं त्याला आवडायचं. काही वर्षांपूर्वी त्याची ओपन हार्ट सर्जरी झाली. त्याने थोडी धावपळ कमी केली; पण कार्यक्रम व पुस्तक लेखन सुरूच ठेवलं. त्याची ४२ पुस्तके प्रकाशित होऊन संपली आहेत. 

त्याला दोन-सव्वादोन वर्षांपूर्वी कर्करोग झाला. उपचार सुरू होते आणि लिखाण व कार्यक्रमही. त्रास वाढत गेल्याने तो कार्यक्रमात कमी बोलायचा वा स्वतः निवेदन करायचा नाही. त्याच्या घरीही जाणं व्हायचं. आजारपणात मात्र जाऊ शकलो नाही, ही खंत मनात कायम राहील.

टॅग्स :MumbaiमुंबईDeathमृत्यू