शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

घोषणांचा कोरडा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 3:25 AM

प्रत्येक मंत्रालयाने दिवसाकाठी एक घोषणा केली पाहिजे असा दंडकच बहुधा मोदींच्या व फडणवीसांच्या सरकारने काढला असावा.

प्रत्येक मंत्रालयाने दिवसाकाठी एक घोषणा केली पाहिजे असा दंडकच बहुधा मोदींच्या व फडणवीसांच्या सरकारने काढला असावा. त्याचमुळे त्यांचा पाऊस देशावर आणि राज्यावर पडताना दिसत आहे. खऱ्या पावसाची जागा या घोषणांनी घेतल्यामुळे खºया मेघगर्जना थांबल्या आणि पाऊसही यायचा राहिला. मुख्यमंत्री दरदिवशी किमान पाच घोषणा करतात. मुनगंटीवारही मग त्यांच्याशी स्पर्धा करतात. ही स्पर्धा आता अनिल बोंडे या ‘आल्सो रॅन’ मंत्र्यांपर्यंत पोहोचली असून त्यांच्या आश्वासनांच्या गर्जनांनीच आकाश व्यापले आहे. या गर्जना एकामागोमाग एक अशा येतात की त्या लक्षात राहत नाहीत आणि तसे काही झाले नाही की त्यांची शहानिशाही कुणी करीत नाही.

गावयुक्त शेतीचे काय झाले आणि गावमुक्त धरणांचे काय झाले? त्यातच गडकरींचे रस्ते, जावडेकरांच्या शालेय शिक्षणाच्या दुरुस्त्या असतात, त्याखेरीज अल्पसंख्याकांना दुरुस्त करून सडकेवर आणायचे केंद्राचे सांगणे असते. काश्मीर तत्काळ शांत करायचे असते, कर्नाटकचे सरकार पाडले आता बंगाल, मग राजस्थानची सरकारे पाडायची असतात. काम फार व त्यामुळे घोषणाही फार. गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्यांनी अशा किती घोषणा केल्या आणि त्यातल्या जमिनीवर किती आल्या याचा हिशेब कधी तरी मांडला पाहिजे. बेकार तसेच राहिले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच राहिल्या. मग मनात येते की निदान आश्वासने थांबवा. समाजाला खोट्या आशा दाखवू नका, सुधारणा नकोत आणि घाईही नको. नेहरूंनी देशात अनेक मोठी धरणे, भाकरानांगल, हिराकुंड वगैरे बांधायला घेतली आणि ती वेळेत पूर्ण केली. शेतीचे उत्पन्न पंधरा वर्षांत बारा टक्क्यांनी वाढविले, औद्योगिक उत्पादन वीस टक्क्यांच्या पुढे नेले, दुष्काळ इतिहासजमा केले आणि शेतकºयांनाही शांत केले. त्यांना जे जमले ते या सरकारलाही जमावे. नेहरू घोषणा अमलात आल्यानंतरच त्याविषयी बोलत.

भाकरानांगल व हिराकुंड यांना त्यांनी आधुनिक तीर्थस्थाने म्हटले. आता तीर्थ नाही, गंगा शुद्ध नाही आणि गंगेत जहाजे चालवायच्या घोषणा हवेतच आहेत. हिंदूंच्या बालविवाहांना आळा घालणारा कायदा करून किती वर्षे झाली? स्त्रियांना संरक्षण देणारे कायदे कधी व किती झाले? शेतकºयांना मदत, आदिवासींना साहाय्य वगैरे कधी पुरे होणार? बुलेटची घोषणा होणे, मेट्रोचे सांगाडे उभे होणे वा चांद्रयानाचे सोहळे साजरे होणे हे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र यापैकी कितींचा सामान्य माणसांच्या आयुष्याशी संबंध येतो? की ही माणसे सरकारच्या लेखी राहिलीच नाहीत. सातवा आयोग आला, आठवाही आणा, पण नोकºया नसणाºया बेकारांना काही देणार की नाही? संपत्ती वाढली, पैसा वाढला, राष्ट्रीय उत्पन्न पाच टक्क्यांपर्यंत वाढल्याचे सांगितले गेले. मग हा पैसा गेला कुठे व जातो कुठे? यंदाच्या अंदाजपत्रकात कोणत्या विषयावर किती खर्च व्हायचा याचे निश्चित आकडे नाहीत. एखादा निबंध असावा तसे ते तयार केले गेले. परिणामी कोणत्या विषयाचे काय झाले, त्यावर किती खर्च झाला, त्याचे उत्पन्न वाढले की कमी झाले हे विचारायचीही सोय राहिली नाही. याला खरेपण म्हणत नाही, याला मुत्सद्दीपण म्हणतात. अंदाजपत्रकाचे दस्तऐवज बॅगेतून दिले काय आणि बासनात बांधून दिले काय, ते लोकांपर्यंत पोहोचतील तरच त्याचा उपयोग होईल. मात्र नुसत्या घोषणा व गर्जनांनीही आनंदी होणारा एक मोठा वर्ग आता समाजात तयार झाला आहे. त्याला महागाईची झळ नाही, सुधारणांचा जाच नाही आणि त्याला पाहता येणारा भ्रष्टाचार हा ‘त्यांच्याच माणसांचा’ असल्याने क्षम्यही आहे. सामान्य माणसांना व्यासपीठ नाही, माध्यमांना वाचा नाही, विरोधक दुबळे आहेत आणि गरीब? त्या बिचाºयांना तर त्यांचे प्रश्न पुरेसे कळायचेच राहिले आहेत. बोलका वर्ग प्रसन्न व समाधानी असला की समाज शांत व सरकारही प्रसन्न असते. आताशा अशी शांतता व प्रसन्नता आपण अनुभवत आहोत. ते तिकडे काही जण ओरडतात, पण ते सारे दुर्लक्ष करावे असे असते. कारण त्यांच्यामागे मतांचे गठ्ठे नसतात आणि ते दुबळेही असतात.

गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्यांनी अशा किती घोषणा केल्या आणि त्यातल्या जमिनीवर किती आल्या याचा हिशेब कधी तरी मांडला पाहिजे. बेकार तसेच राहिले, शेतकºयांच्या आत्महत्या तशाच राहिल्या. मग मनात येते की निदान आश्वासने थांबवा.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी