शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे खापर ‘५ जी’वर फोडण्यात अर्थ आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 07:43 IST

भारतात सरकारी आकड्यांनुसार कोरोनामुळे २ लाख ४२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पण, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतील उच्चविद्याविभूषित पंडित हे सारे मृत्यू ५-जी टेस्टिंगमुळे झाल्याचे सांगत आहेत.

- साहेबराव नरसाळे, वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, अहमदनगर

‘५-जी लहरींच्या रेडिएशनमुळे कोरोना होऊन लोक चिमण्यांसारखे मरत आहेत,’  असा मेसेज फॉरवर्ड होऊन आला, तर तुम्ही काय कराल?

- हॅलो... सरजी क्या हाल है बनारस का? - बस ठीक है. - इधर तो चिडियाँ जैसे आदमी मर रहे है. - अरे हाँ.. वो ५-जी टेस्टिंग चल रहा है ना. पहले चिडियाँ मरती थी, आज आदमी मर रहे है.. फोनवरील हा संवाद ५-जी टॉवर उभारणाऱ्या दोन अधिकाऱ्यांमधील असल्याचे सांगून सध्या कचाकच फॉरवर्ड केला जात आहे. सुमारे ७ मिनिटांच्या या संवादासोबत काही छायाचित्रेही येतात. परदेशात ‘५-जी’विरोधात लोक रस्त्यावर उतरल्याची छायाचित्रे. त्याखाली पुन्हा एक मेसेज, ‘५-जी टेस्टिंग बंद करो.. इन्सानों को बचाओ.’ ५-जीमुळेच कोरोना वाढत असून, लोक चिमण्यांसारखे मरत आहेत, असे सांगणारा हा मेसेज सध्या व्हायरल आहे. पण, खरेच ५-जी लहरींच्या रेडिएशनमुळे लोक मरत आहेत का, याची पडताळणी न करताच हा मेसेज वेगाने फॉरवर्ड केला जात आहे.  सोशल मीडियावर ‘स्टॉप ५-जी’ नावाने एक चळवळ राबविली जात आहे. या चळवळीत अनेक शास्त्रज्ञ, डॉक्टर, तत्त्वज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी असल्याचा दावा करीत अफवा पसरविल्या जात आहेत.  अलीकडेच ५-जी विरोधात अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा यूके सरकारने दिला अन् तेथे तरी हा अफवांचा बाजार थांबला. भारतात सरकारी आकड्यांनुसार कोरोनामुळे २ लाख ४२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पण, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतील उच्चविद्याविभूषित पंडित हे सारे मृत्यू ५-जी टेस्टिंगमुळे झाल्याचे सांगत आहेत. खरेच भारतात ५-जीचे टेस्टिंग सुरू आहे का? भारतात आतापर्यंत ५-जीचे किती टॉवर उभे राहिले आहेत? ५-जी रेडिएशनमुळे मानवी जीवनास किती प्रमाणात धोका आहे?- सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल डॉ. एस.पी. कोच्चर सांगतात, “भारतात अजून ५-जी टॉवर उभारलेले नाहीत. टेस्टिंगही सुरू झालेले नाही. भारतात फक्त ५-जी टॉवर उभारण्यास मान्यता दिलेली आहे. कोरोनाचा आणि ५-जीचा काहीही संबंध नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेनेही सांगितले आहे!”कोरोनाचा व्हायरस रेडिओ लहरी किंवा मोबाइल नेटवर्कद्वारे पसरू शकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले आहे.  जगभरात जेथे ५-जी सुरूच झालेले नाही, तेथेही कोरोनाचा उद्रेक पाहावयास मिळत आहे. ५-जीमुळे कोरोना वाढतो व लोकांचा मृत्यू होतो, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.कोरोना वाढीस ५-जी रेडिएशन कारणीभूत असल्याचा उल्लेख वारंवार केला जातो. हे रेडिएशन नेमके आहे तरी काय? तर, रेडिएशन म्हणजे किरणोत्सार. वायरलेस संवादाच्या तंत्रज्ञानात रेडिओ लहरी वापरल्या जातात. या रेडिओ लहरींच्या निर्मितीसाठी विद्युतभारीत किरणांचा वापर होतो. यातून किरणांचे उत्सर्जन केले जाते. त्याला रेडिएशन किंवा किरणोत्सार म्हणतात. हे किरणोत्सार दोन प्रकारचे असतात. एक आयोनायझिंग आणि दुसरा नॉन आयोनायझिंग. रेडिओ लहरींमध्ये नॉन आयोनायझिंग किरणोत्सार कमी तीव्रतेचे असतात. याउलट, आयोनायझिंग किरणोत्सार उच्च तीव्रतेचे असतात. यामध्ये क्ष-किरण (एक्स-रे), गामा-किरण (सिटी स्कॅनसाठी वापर) असतात. ही दोन्ही किरणे वैद्यकीय कारणांसाठी वापरली जातात. रेडिओ, टीव्ही सिग्नल, मोबाइल या बिनतारी संदेशवहनात नॉन-आयोनायझिंग रेडिएशन म्हणजे अ-विद्युतभारित किरणोत्साराचा वापर होतो. याद्वारे कोणत्याही विषाणूंचे वहन होऊ शकत नाही, असे अमेरिकेत झालेल्या संशोधनात म्हटलेले आहे. त्यामुळे कोरोनावाढीस अथवा सध्याच्या परिस्थितीत होत असलेल्या मानवी मृत्यूस ५-जी कारणीभूत आहे, असे म्हणता येणार नाही. म्हणूनच, यूकेमध्ये अशा अफवा पसरविणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा नियम झाला आहे. हा नियम करतानाही तेथील प्रशासनाने भारताचे उदाहरण दिले आहे. भारतात ५-जी अजून पोहोचायचे आहे, तरीही तेथे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. - म्हणूनच, ५-जीमुळे कोरोना वाढला, असा समज पसरविणे चुकीचे आहे; आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस