शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

कसोटीला आयसीसी मृतावस्थेत पाहू इच्छिते? लीग सामन्यांचे कॅलेंडर वेगळे करावे लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 13:15 IST

मालिकेतील दिवसांचा विचार केल्यास कसोटी क्रिकेट कुठे जात आहे, याबद्दल काळजी वाटते. वनडे आणि टी-२० हे दोनच  प्रकार शिल्लक राहतील का, अशी शंका येते.

-अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

दक्षिण आफ्रिका-भारत यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दोन्ही सामने एकूण पाचच दिवस चालले. त्यानंतरही मालिका रोमांचक झाली. दोन्ही संघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, भारताने पहिली कसोटी जिंकल्यानंतर मुसंडी मारताना मालिका बरोबरीत सोडविली; पण द. आफ्रिकेत पहिली मालिका जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. भारताच्या दृष्टीने मालिका अनिर्णीत राखणे ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. मालिकेतील दिवसांचा विचार केल्यास कसोटी क्रिकेट कुठे जात आहे, याबद्दल काळजी वाटते. आयसीसीने कसोटी क्रिकेटला मृतावस्थेत नेण्याचे ठरविले का, असा विचार मनात डोकावतो. वनडे आणि टी-२० हे दोनच  प्रकार शिल्लक राहतील का, अशी शंका येते.

नाण्याच्या दोन बाजू...

या शंकेला बळ यासाठी मिळते की न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या द. आफ्रिका संघात सात अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय अनुभव नसलेले) खेळाडू आहेत. कॅगिसो रबाडा, एडन मार्कराम, हेन्रिच क्लासेन हे स्थानिक टी-२० लीग खेळणार आहेत. ते कसोटी संघात नसल्यावरून वाद उद्भवला. द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाची बाजू अशी की क्रिकेट चालविण्यासाठी आम्हाला पैसा लागतो. स्थानिक टी-२० लीगमध्ये दिग्गज नसतील, तर सामने पाहणार कोण? दुसरी बाजू अशी की कसोटीला तुम्ही सापत्न वागणूक देऊ शकत नाही, अशी भूृमिका अन्य बोर्डांनी घेतल्यास कसोटी क्रिकेट इतिहासजमा होईल.

आयसीसीने प्रोटोकॉल आखावा

दोन्ही बाजू योग्य असतील; पण वादात वेळ घालविण्याऐवजी आयसीसीने प्रोटोकॉल तयार करावा. याअंतर्गत खेळाडू अखेरच्या क्षणी माघार घेऊ शकणार नाहीत, ही अट टाकावी.  लीग आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे कॅलेंडर एकाचवेळी येणार नाही, याची काळजी घ्यावी. कसोटी वाचवायला हे करावेच लागेल. अन्यथा हा प्रकार भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडपुरता मर्यादित होईल. अन्य बोर्ड आर्थिक संकटामुळे कसोटी क्रिकेटपासून दूर असतील.

विदेशात विजय नोंदविणे गरजेचे

भारत-द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया- पाकिस्तान मालिका एकाचवेळी झाल्या. दोन्ही मालिकांवर नजर टाकल्यास विदेशात विजय नोंदविणे किती अवघड असते हे पाहायला मिळाले. भारतीय संघ भक्कम होता, तरी मालिका जिंकू शकला नाही. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाने ०-३ ने सफाया केला. भारताकडून रोहित, विराट आणि राहुल यांनी फलंदाजीत प्रभावी कामगिरी केली. राहुलने शतकी खेळी केली; पण शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांनी अपेक्षाभंग केला. हे युवा खेळाडू विदेशात यशस्वी होईपर्यंत महान बनू शकणार नाहीत.

पाकिस्तानचे हेच हाल झाले. बाबर आझम फ्लॉप ठरला. शाहीन शाह आफ्रिदी ऑस्ट्रेलियात भेदक ठरला; पण तो तिसरा सामना खेळला नव्हता. कार्यभार व्यवस्थापनामुळे त्याला तिसरी कसोटी खेळता आली नाही, अशी चर्चा आहे; पण अशा गोष्टी कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी करतात. शाहीन शानदार खेळाडू आहे; पण तो संघासाठी शंभर टक्के योगदान देत नाही.

टॅग्स :ICCआयसीसी