शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

मनाचिये गुंथी - सेकंद

By admin | Updated: April 10, 2017 00:28 IST

माणसंच माणसांना जवळ करतात, दूर लोटतात. कालचा आज माझा नसतो. आजचा उद्या माझ्याजवळ राहील ही शाश्वती नाही.

माणसंच माणसांना जवळ करतात, दूर लोटतात. कालचा आज माझा नसतो. आजचा उद्या माझ्याजवळ राहील ही शाश्वती नाही. उद्या माझ्याजवळ कोण येणार माहीत नाही. तेव्हा हा खेळच वेगळा. आपण दान टाकायचं. किती पडतील माहीत नाही. कोण जिंकणार माहीत नाही. अगदी महाभारतातल्या द्यूतपासून हा संघर्ष आहे. म्हणजे आपले जीवन कायम कचकड्यांच्या ताब्यात. पांडव द्यूतामधून वनवासी झाले. खरे तर कैकेयीनेही द्यूतच खेळला. दशरथाला जी मदत केली ती वसूल केली तिने. तिची बाहुली मंथरा होती. आजही आपल्यात मंथरा विविध रूपात वावरतेय. कधी ती सासू असते, कधी प्रेमभंग झालेली प्रेयसी, कधी दुखावलेला मित्र. प्रत्येकजण अशा मंथरेच्या शोधात असतातच. त्याला खरं तर चांगलंच राहायचं असतं. पण आपला कुकर्मी स्वभाव मनुष्यरूपात पाहण्याची त्याची धडपड असते. आपण बऱ्याचदा म्हणतो की हा अगदी बापावर गेला. ती आईवर गेली. या घरातले सगळे चांगले, मग हा असा कसा झाला? म्हणजे हे केवळ वाईट बाबींसाठी नाही तर बघा. रमेश तेंडुलकर मराठीचे सज्जन प्राध्यापक. आपला मुलगा एवढा महान क्रिकेटवीर याचा त्यांना अभिमान होता, पण गर्व नव्हता. सचिन मराठीचा शिक्षक झाला असता तर? हा विनोदच. त्याने चौफेर फटके मारून अवघी मराठी जनता खिळखिळी नव्हे तर खुळी करून सोडली. याबद्दल कुणीच काही म्हणणार नाही. बाप शिपाई, रोजगार हमीचा कामगार पण पोरगा एमपीएससी, यूपीएससी उत्तीर्ण होऊन तहसीलदार, कलेक्टर होतो. हा काळाचा महिमाच म्हणायचा. म्हणजे मुलाने मोठं होणं न होणं हे बापाचं भाग्यच. नारायण सुर्वेंचे वडील सुर्वेंना एवढं मोठं पाहू शकले. पण एक गंगाराम सुर्वे हे सच्चे कामगार होते. त्यांनी नारायणला बेवारस पडलेला उचललं, पोसलंं. त्याला नाव दिलं. घर दिलं. आई दिली. हे सगळं येतं कुठून? कुठे शिकला नारायणचा बाप! आणि आईने तरी कुठून दिला पान्हा! माझा मुलगा काय व्हावा हे बाप ठरवू लागला की समजावे पोरगं झालं बाळू! त्याला मोकळं सोडा की बघा. माणूस आपल्या कृतीने ओळखला जातो. अतिशय क्रूरपणे माणसांना मारणारा कसाब लहानपणी त्याची आई अल्लाला दुवा मागताना तो अतिरेकी व्हावा म्हणून प्रार्थना करीत असेल? माणसाचं आयुष्यच विचित्र आहे. ते कधी बदलेल हे सांगता येत नाही. कालचा आज राजा होतो दुसरा रंक होतो. म्हणूनच कोण दिवस येई कसा कोण जाणतो? आपण प्रत्येक दिवसाला हसऱ्या मनाने सामोरं जावं एवढंच आपल्या हाती. कारण आयुष्याचा वेग वर्ष नाही तर सेकंद आहे आणि सेकंद हातात पकडता येत नाही. एखाद्याला म्हटलं तुझ्या यशाचा सेकंद पकड, तर म्हणता म्हणता तो सेकंद दु:खात परिवर्तित होऊ शकतो. म्हणून प्रत्येक सेकंद फुटपाथवरून जाणाऱ्या गाडीसारखा आहे. गाडी सुटली. पकडता आली तर पकडा. नाहीतर नव्या गाडीची वाट पहा! तीही काही सेकंदच! कारण सेकंद असतो काही सेकंदच, नंतर तो ‘सेकंड’ होतो. जुना होतो. चला हा आनंदाचा सेकंद तर पकडू !किशोर पाठक