शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - सेकंद

By admin | Updated: April 10, 2017 00:28 IST

माणसंच माणसांना जवळ करतात, दूर लोटतात. कालचा आज माझा नसतो. आजचा उद्या माझ्याजवळ राहील ही शाश्वती नाही.

माणसंच माणसांना जवळ करतात, दूर लोटतात. कालचा आज माझा नसतो. आजचा उद्या माझ्याजवळ राहील ही शाश्वती नाही. उद्या माझ्याजवळ कोण येणार माहीत नाही. तेव्हा हा खेळच वेगळा. आपण दान टाकायचं. किती पडतील माहीत नाही. कोण जिंकणार माहीत नाही. अगदी महाभारतातल्या द्यूतपासून हा संघर्ष आहे. म्हणजे आपले जीवन कायम कचकड्यांच्या ताब्यात. पांडव द्यूतामधून वनवासी झाले. खरे तर कैकेयीनेही द्यूतच खेळला. दशरथाला जी मदत केली ती वसूल केली तिने. तिची बाहुली मंथरा होती. आजही आपल्यात मंथरा विविध रूपात वावरतेय. कधी ती सासू असते, कधी प्रेमभंग झालेली प्रेयसी, कधी दुखावलेला मित्र. प्रत्येकजण अशा मंथरेच्या शोधात असतातच. त्याला खरं तर चांगलंच राहायचं असतं. पण आपला कुकर्मी स्वभाव मनुष्यरूपात पाहण्याची त्याची धडपड असते. आपण बऱ्याचदा म्हणतो की हा अगदी बापावर गेला. ती आईवर गेली. या घरातले सगळे चांगले, मग हा असा कसा झाला? म्हणजे हे केवळ वाईट बाबींसाठी नाही तर बघा. रमेश तेंडुलकर मराठीचे सज्जन प्राध्यापक. आपला मुलगा एवढा महान क्रिकेटवीर याचा त्यांना अभिमान होता, पण गर्व नव्हता. सचिन मराठीचा शिक्षक झाला असता तर? हा विनोदच. त्याने चौफेर फटके मारून अवघी मराठी जनता खिळखिळी नव्हे तर खुळी करून सोडली. याबद्दल कुणीच काही म्हणणार नाही. बाप शिपाई, रोजगार हमीचा कामगार पण पोरगा एमपीएससी, यूपीएससी उत्तीर्ण होऊन तहसीलदार, कलेक्टर होतो. हा काळाचा महिमाच म्हणायचा. म्हणजे मुलाने मोठं होणं न होणं हे बापाचं भाग्यच. नारायण सुर्वेंचे वडील सुर्वेंना एवढं मोठं पाहू शकले. पण एक गंगाराम सुर्वे हे सच्चे कामगार होते. त्यांनी नारायणला बेवारस पडलेला उचललं, पोसलंं. त्याला नाव दिलं. घर दिलं. आई दिली. हे सगळं येतं कुठून? कुठे शिकला नारायणचा बाप! आणि आईने तरी कुठून दिला पान्हा! माझा मुलगा काय व्हावा हे बाप ठरवू लागला की समजावे पोरगं झालं बाळू! त्याला मोकळं सोडा की बघा. माणूस आपल्या कृतीने ओळखला जातो. अतिशय क्रूरपणे माणसांना मारणारा कसाब लहानपणी त्याची आई अल्लाला दुवा मागताना तो अतिरेकी व्हावा म्हणून प्रार्थना करीत असेल? माणसाचं आयुष्यच विचित्र आहे. ते कधी बदलेल हे सांगता येत नाही. कालचा आज राजा होतो दुसरा रंक होतो. म्हणूनच कोण दिवस येई कसा कोण जाणतो? आपण प्रत्येक दिवसाला हसऱ्या मनाने सामोरं जावं एवढंच आपल्या हाती. कारण आयुष्याचा वेग वर्ष नाही तर सेकंद आहे आणि सेकंद हातात पकडता येत नाही. एखाद्याला म्हटलं तुझ्या यशाचा सेकंद पकड, तर म्हणता म्हणता तो सेकंद दु:खात परिवर्तित होऊ शकतो. म्हणून प्रत्येक सेकंद फुटपाथवरून जाणाऱ्या गाडीसारखा आहे. गाडी सुटली. पकडता आली तर पकडा. नाहीतर नव्या गाडीची वाट पहा! तीही काही सेकंदच! कारण सेकंद असतो काही सेकंदच, नंतर तो ‘सेकंड’ होतो. जुना होतो. चला हा आनंदाचा सेकंद तर पकडू !किशोर पाठक