शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

संकटग्रस्त शेतकरी; पावसासह तिन्ही ऋतूंमध्ये चढ-उतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 08:02 IST

गेली काही वर्षे बाराही महिन्यांत कमी-अधिक पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे.

हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेतीक्षेत्राला आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरीवर्गाला बसतो आहे. अतिवृष्टी आणि महापुराने शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. पावसासह तिन्ही ऋतूंमध्ये चढ-उतार होत असल्याने निर्माण होणारी संकटाची साखळी काही केल्या तुटत नाही. पाऊस वेळेवर आला नाही तर पेरण्या वेळेवर होत नाहीत. लवकर झाला तर शेतकरी पेरण्या उरकून घेतो आणि नंतर पाऊस लांबल्याने उगवण नीट होत नाही किंवा पिके करपून जातात. दुबार पेरणीचे संकट उभे राहते. सुरुवातीचा पाऊस सातत्यपूर्ण झाला तर पिके कापणी-मळणीच्या वेळी परतीचा पाऊस प्रचंड होऊन अन्नधान्याची नासाडी होते.

गेली काही वर्षे बाराही महिन्यांत कमी-अधिक पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे. या हवामान बदलाशी उत्तम पद्धतीने सामना करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांची उभारणी करून  हवामानाचे अनुमान मांडता येईल का?  यावर तातडीने विचार करायला हवा. अन्यथा आता जाहीर केली तशी मदत शेतकरीवर्गाला दरवर्षी द्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी तसेच महापुराने शेतीच्या नुकसानीसाठी मदत जाहीर केली. शेतीचे नुकसान नेमके किती झाले आहे, याचा कोणताही ठोकताळा सरकारकडे नाही. अंदाजे पंधरा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, असे मानले जाते.

महापुराने विदर्भात खूप नुकसान झाले आहे. शेतजमीनच खरडून जाण्याचे प्रकारही घडले आहेत. मातीच वाहून गेली आहे. या शेतीची दुरुस्ती करणे मोठे कठीण काम! अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण गटाच्या निकषानुसार प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाते, ती दुप्पट करण्याचा निर्णय नव्या राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत प्रत्येक शेतकऱ्याला कमाल तीन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ दोन हेक्टरच्या नुकसानीची भरपाई प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे दिली जात होती. या नुकसानभरपाईने शेतकऱ्यांचे नुकसान भरून येणार नाही. केवळ दिलासा देणे एवढाच या मदतीचा उपयोग आहे. जिरायत शेतीसाठी ही भरपाई जाहीर झाली आहे. बागायतीचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. हा निर्णय झाला म्हणजे मदत मिळाली, असे होत नाही. शासनाचा अध्यादेश निघावा लागेल. नुकसान कसे गृहीत धरायचे याचे निकष ठरविण्यात येतील. खतांची मात्रा किती दिली असेल याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

हेक्टरी किती बियाणे वापरण्यात आले याचे गणित मांडावे लागेल. वेगवेगळ्या विभागातील शेती करण्याची पद्धती वेगळी असते. उन्हाळी कामांचा खर्च हिशेबात घेणार का? त्याआधारे सगळा खर्च काढला तर हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई तुटपुंजीच असणार आहे. महाआघाडीच्या सरकाने राष्ट्रीय आपत्ती निवारण गटाच्या निकषांना बाजूला सारून हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाचे विरोधी पक्ष भाजप आणि त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठ्या आवाजात सभागृह डोक्यावर घेऊन हेक्टरी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. विद्यमान विरोधी पक्षनेते हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी करीत आहे. द्यायचे नाही, घ्यायचे नाही, सरकारही देणार नाही, याची कल्पना असूनही ही नेतेमंडळी सहानभूतीचा पुळका म्हणून अशी मागणी करीत असतात.

पंधरा हजार रुपये प्रतिहेक्टरी मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आता शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असे वाटत नाही का? महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान विदर्भात झाले आहे. ते स्वत:ला विदर्भाचे नेते मानतात. तरीदेखील नुकसानभरपाई वाढवून द्यावी, असे वाटले नाही. राजकारणी ज्या खुर्चीवर बसतात तशी भाषा बोलतात. शेतकरी ज्या मातीत हात घालून शेती करतो, त्याचे नुकसान पाहून मागणी करणे किंवा त्या मागण्या मान्य करण्याचे धैर्य  यांच्यात नाही. आता अशा नुकसानीचा सामना दरवर्षी करावा लागणार आहे. याचादेखील विचार करणे अगत्याचे ठरणार आहे. अत्याधुनिक यंत्रणा उभारून प्रत्येक विभागातील पिकांची नोंदणी, होणारे नुकसान टाळणारी उपाययोजना, तातडीने मदत देण्यासाठी आकडेवारी एकत्र करण्याची यंत्रणा उभी करणे गरजेचे असणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतालाच बदलत्या हवामानाचा सामना करावा लागणार आहे. त्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचविणे, नुकसानभरपाई देणे, ही यापुढच्या काळात सरकारला गुंतवणूकच मानावी लागेल, असेच चित्र दिसते.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रfloodपूरRainपाऊस