शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

संकटग्रस्त शेतकरी; पावसासह तिन्ही ऋतूंमध्ये चढ-उतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 08:02 IST

गेली काही वर्षे बाराही महिन्यांत कमी-अधिक पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे.

हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेतीक्षेत्राला आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरीवर्गाला बसतो आहे. अतिवृष्टी आणि महापुराने शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. पावसासह तिन्ही ऋतूंमध्ये चढ-उतार होत असल्याने निर्माण होणारी संकटाची साखळी काही केल्या तुटत नाही. पाऊस वेळेवर आला नाही तर पेरण्या वेळेवर होत नाहीत. लवकर झाला तर शेतकरी पेरण्या उरकून घेतो आणि नंतर पाऊस लांबल्याने उगवण नीट होत नाही किंवा पिके करपून जातात. दुबार पेरणीचे संकट उभे राहते. सुरुवातीचा पाऊस सातत्यपूर्ण झाला तर पिके कापणी-मळणीच्या वेळी परतीचा पाऊस प्रचंड होऊन अन्नधान्याची नासाडी होते.

गेली काही वर्षे बाराही महिन्यांत कमी-अधिक पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे. या हवामान बदलाशी उत्तम पद्धतीने सामना करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांची उभारणी करून  हवामानाचे अनुमान मांडता येईल का?  यावर तातडीने विचार करायला हवा. अन्यथा आता जाहीर केली तशी मदत शेतकरीवर्गाला दरवर्षी द्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी तसेच महापुराने शेतीच्या नुकसानीसाठी मदत जाहीर केली. शेतीचे नुकसान नेमके किती झाले आहे, याचा कोणताही ठोकताळा सरकारकडे नाही. अंदाजे पंधरा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, असे मानले जाते.

महापुराने विदर्भात खूप नुकसान झाले आहे. शेतजमीनच खरडून जाण्याचे प्रकारही घडले आहेत. मातीच वाहून गेली आहे. या शेतीची दुरुस्ती करणे मोठे कठीण काम! अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण गटाच्या निकषानुसार प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाते, ती दुप्पट करण्याचा निर्णय नव्या राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत प्रत्येक शेतकऱ्याला कमाल तीन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ दोन हेक्टरच्या नुकसानीची भरपाई प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे दिली जात होती. या नुकसानभरपाईने शेतकऱ्यांचे नुकसान भरून येणार नाही. केवळ दिलासा देणे एवढाच या मदतीचा उपयोग आहे. जिरायत शेतीसाठी ही भरपाई जाहीर झाली आहे. बागायतीचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. हा निर्णय झाला म्हणजे मदत मिळाली, असे होत नाही. शासनाचा अध्यादेश निघावा लागेल. नुकसान कसे गृहीत धरायचे याचे निकष ठरविण्यात येतील. खतांची मात्रा किती दिली असेल याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

हेक्टरी किती बियाणे वापरण्यात आले याचे गणित मांडावे लागेल. वेगवेगळ्या विभागातील शेती करण्याची पद्धती वेगळी असते. उन्हाळी कामांचा खर्च हिशेबात घेणार का? त्याआधारे सगळा खर्च काढला तर हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई तुटपुंजीच असणार आहे. महाआघाडीच्या सरकाने राष्ट्रीय आपत्ती निवारण गटाच्या निकषांना बाजूला सारून हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाचे विरोधी पक्ष भाजप आणि त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठ्या आवाजात सभागृह डोक्यावर घेऊन हेक्टरी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. विद्यमान विरोधी पक्षनेते हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी करीत आहे. द्यायचे नाही, घ्यायचे नाही, सरकारही देणार नाही, याची कल्पना असूनही ही नेतेमंडळी सहानभूतीचा पुळका म्हणून अशी मागणी करीत असतात.

पंधरा हजार रुपये प्रतिहेक्टरी मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आता शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असे वाटत नाही का? महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान विदर्भात झाले आहे. ते स्वत:ला विदर्भाचे नेते मानतात. तरीदेखील नुकसानभरपाई वाढवून द्यावी, असे वाटले नाही. राजकारणी ज्या खुर्चीवर बसतात तशी भाषा बोलतात. शेतकरी ज्या मातीत हात घालून शेती करतो, त्याचे नुकसान पाहून मागणी करणे किंवा त्या मागण्या मान्य करण्याचे धैर्य  यांच्यात नाही. आता अशा नुकसानीचा सामना दरवर्षी करावा लागणार आहे. याचादेखील विचार करणे अगत्याचे ठरणार आहे. अत्याधुनिक यंत्रणा उभारून प्रत्येक विभागातील पिकांची नोंदणी, होणारे नुकसान टाळणारी उपाययोजना, तातडीने मदत देण्यासाठी आकडेवारी एकत्र करण्याची यंत्रणा उभी करणे गरजेचे असणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतालाच बदलत्या हवामानाचा सामना करावा लागणार आहे. त्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचविणे, नुकसानभरपाई देणे, ही यापुढच्या काळात सरकारला गुंतवणूकच मानावी लागेल, असेच चित्र दिसते.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रfloodपूरRainपाऊस