शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

विकास मंडळांचा खुळखुळा तरी हाती होता; अजितदादांनी तोही पळवला

By सुधीर महाजन | Updated: March 3, 2021 08:11 IST

परवा विधानसभेत विरोधकांवर मारा करण्यासाठी अजितदादा कोणते अस्त्र वापरता अशा विचारात त्यांचे चाहते असतानाच आतापर्यंत अडगळीत पडलेला, अनेकांनी खेळून, कंटाळून टाकून दिलेला हा विकास मंडळाचा खुळखुळाच हाती घेतला

बारामती म्हणजे केवळ बारामती नाही तर अनेकांची मती गुंग करण्याचा गुणधर्म या मातीचा आहे. म्हणूनच विधानसभेत अजितदादा पवारांनी केवळ खुळखुळ्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याची शक्कल लढवली नसती. हा खुळखुळा कधी काळी आपल्या पश्चात शस्त्र बनू शकतो, असा अंधूक अंदाज गोविंदभाई श्राॅफ यांना आला असता तर पार दिल्लीपर्यंत खस्ता खात शंकरराव चव्हाणांसारख्या जुन्या सहकाऱ्याचा विरोध सहन करत मराठवाड्यासाठी वैधानिक विकास मंडळ मंजूर करून आणले नसते. त्यांना काय माहीत हे विकास मंडळ म्हणजे वेताळाने विक्रमास दिलेला वर असेल की, जो पुढे जाऊन त्याच्यावरच उलटतो. तर, ३७१ (२) कलमान्वये मागास भागाच्या विकासासाठी मराठवाड्यासोबत विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राची वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली आणि पुढे राजकारणात जे होते तेच झाले.  कालांतराने याचा राजकीय  मंडळींनी खुळखुळाच करून टाकला आणि रिकामटेकड्यांची सोय लावण्याची ती हक्काची जागा बनली. गोविंदभाई गेले आणि नंतर काही वर्षांत विकास मंडळाचा खुळखुळाच झाला. त्याचा विसरही पडला.

परवा विधानसभेत विरोधकांवर मारा करण्यासाठी अजितदादा कोणते अस्त्र वापरता अशा विचारात त्यांचे चाहते असतानाच आतापर्यंत अडगळीत पडलेला, अनेकांनी खेळून, कंटाळून टाकून दिलेला हा विकास मंडळाचा खुळखुळाच हाती घेतला. सरकारने सुचवलेल्या राज्यपालांच्या अधिकारातील विधान परिषदेवरील १२ जणांची नियुक्ती राज्यपाल करत नाही तोपर्यंत या विकास मंडळावरील नियुक्त्या सरकार करणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली. तू आम्हाला पेपरमिंटची गोळी देत नाही तर आम्ही तुला होमवर्कची वही देणार नाही. इयत्ता ५ वीत असताना आम्ही केलेली प्रतिज्ञा आठवली. त्यावेळी याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात, एवढे आम्ही जाणते नव्हतो.

ज्या आवेशाने दादांनी सभागृह गदागदा हादरवून टाकले त्यावेळी ‘मेरी झांशी नही दुंगी’ असे म्हणणाऱ्या चित्रपटातील कंगनाचा आवेश डोळ्यांसमोर तरळून गेेला. कंगना म्हणताच ऊर्मिला आठवली. या दोघींमधून विस्तव जात नाही. हे दादांना माहीत असावे म्हणून दादा १२ जागांच्या नियुक्त्यांचा आग्रह तर धरत नसावे, असेही क्षणभर वाटले; पण हा विचार झटकला तसा आम्हास मराठी बाणा आठवला.

वैधानिक विकास मंडळाचा खुळखुळा केल्याबद्दल  आम्हा मराठवाड्यातील लोकांची अजिबात नाराजी नाही. ते मिळेल यातच आम्ही भरून पावलो होतो. काहीही मिळाले की, आम्हाला तृप्तीची ढेकर येते आणि डोळे आपोआप मिटले जातात, असेच आम्ही यशाच्या गुंगीत असताना विकास मंडळाचा खुळखुळा केव्हा झाला हेच आम्हाला समजले नाही. अगदी परवा परवा देवेंद्र भाऊंनी मराठवाड्यासाठी ‘वाॅटरग्रीड’ची घोषणा केली आणि बसल्या बसल्या डोळे मिटत पाण्यात डुंबायला लागले. कधी काळी नितीन गडकरींनी केलेली गोदावरीतून जलवाहतुकीची  घोषणाही मिटत्या डोळ्यांवरून तरळून गेली; पण या डुलकीने घात केला आणि आमचे आयआयएम फडणवीसांनी नागपूरला पळवून नेले. आमचे रस्ते, आमच्या रेल्वेगाड्या, आमच्याकडे येणारे कारखाने पळवले जातात. तिकडे अहमदनगर, नाशिककर दिवसाढवळ्या आमचे पाणी पळवतात. यावर्षी तर कमालच झाली तुमच्याकडे पाऊस जास्त झाल्याने आम्ही पाणी सोडणार नाही, अशी घोषणाच नाशिककरांनी केली. पूर्वी म्हणे दरोडेखोर जाहीरपणे घरावर चिठ्ठी चिकटवून पूर्व सूचना देऊन दरोडा टाकायचे, तशी ही नाशिककरांनी काढलेली खोडी. आता हा विकास मंडळांचा खुळखुळा तरी आमच्या हाती होता, म्हटले याचा कोणास काय उपयोग हा तरी कोण पळवणार नाही; पण अजितदादांनी तोही पळवला. पाहू आता किती वाजवता ते?-सुधीर महाजन

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादAjit Pawarअजित पवार