शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

विकास मंडळांचा खुळखुळा तरी हाती होता; अजितदादांनी तोही पळवला

By सुधीर महाजन | Updated: March 3, 2021 08:11 IST

परवा विधानसभेत विरोधकांवर मारा करण्यासाठी अजितदादा कोणते अस्त्र वापरता अशा विचारात त्यांचे चाहते असतानाच आतापर्यंत अडगळीत पडलेला, अनेकांनी खेळून, कंटाळून टाकून दिलेला हा विकास मंडळाचा खुळखुळाच हाती घेतला

बारामती म्हणजे केवळ बारामती नाही तर अनेकांची मती गुंग करण्याचा गुणधर्म या मातीचा आहे. म्हणूनच विधानसभेत अजितदादा पवारांनी केवळ खुळखुळ्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याची शक्कल लढवली नसती. हा खुळखुळा कधी काळी आपल्या पश्चात शस्त्र बनू शकतो, असा अंधूक अंदाज गोविंदभाई श्राॅफ यांना आला असता तर पार दिल्लीपर्यंत खस्ता खात शंकरराव चव्हाणांसारख्या जुन्या सहकाऱ्याचा विरोध सहन करत मराठवाड्यासाठी वैधानिक विकास मंडळ मंजूर करून आणले नसते. त्यांना काय माहीत हे विकास मंडळ म्हणजे वेताळाने विक्रमास दिलेला वर असेल की, जो पुढे जाऊन त्याच्यावरच उलटतो. तर, ३७१ (२) कलमान्वये मागास भागाच्या विकासासाठी मराठवाड्यासोबत विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राची वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली आणि पुढे राजकारणात जे होते तेच झाले.  कालांतराने याचा राजकीय  मंडळींनी खुळखुळाच करून टाकला आणि रिकामटेकड्यांची सोय लावण्याची ती हक्काची जागा बनली. गोविंदभाई गेले आणि नंतर काही वर्षांत विकास मंडळाचा खुळखुळाच झाला. त्याचा विसरही पडला.

परवा विधानसभेत विरोधकांवर मारा करण्यासाठी अजितदादा कोणते अस्त्र वापरता अशा विचारात त्यांचे चाहते असतानाच आतापर्यंत अडगळीत पडलेला, अनेकांनी खेळून, कंटाळून टाकून दिलेला हा विकास मंडळाचा खुळखुळाच हाती घेतला. सरकारने सुचवलेल्या राज्यपालांच्या अधिकारातील विधान परिषदेवरील १२ जणांची नियुक्ती राज्यपाल करत नाही तोपर्यंत या विकास मंडळावरील नियुक्त्या सरकार करणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली. तू आम्हाला पेपरमिंटची गोळी देत नाही तर आम्ही तुला होमवर्कची वही देणार नाही. इयत्ता ५ वीत असताना आम्ही केलेली प्रतिज्ञा आठवली. त्यावेळी याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात, एवढे आम्ही जाणते नव्हतो.

ज्या आवेशाने दादांनी सभागृह गदागदा हादरवून टाकले त्यावेळी ‘मेरी झांशी नही दुंगी’ असे म्हणणाऱ्या चित्रपटातील कंगनाचा आवेश डोळ्यांसमोर तरळून गेेला. कंगना म्हणताच ऊर्मिला आठवली. या दोघींमधून विस्तव जात नाही. हे दादांना माहीत असावे म्हणून दादा १२ जागांच्या नियुक्त्यांचा आग्रह तर धरत नसावे, असेही क्षणभर वाटले; पण हा विचार झटकला तसा आम्हास मराठी बाणा आठवला.

वैधानिक विकास मंडळाचा खुळखुळा केल्याबद्दल  आम्हा मराठवाड्यातील लोकांची अजिबात नाराजी नाही. ते मिळेल यातच आम्ही भरून पावलो होतो. काहीही मिळाले की, आम्हाला तृप्तीची ढेकर येते आणि डोळे आपोआप मिटले जातात, असेच आम्ही यशाच्या गुंगीत असताना विकास मंडळाचा खुळखुळा केव्हा झाला हेच आम्हाला समजले नाही. अगदी परवा परवा देवेंद्र भाऊंनी मराठवाड्यासाठी ‘वाॅटरग्रीड’ची घोषणा केली आणि बसल्या बसल्या डोळे मिटत पाण्यात डुंबायला लागले. कधी काळी नितीन गडकरींनी केलेली गोदावरीतून जलवाहतुकीची  घोषणाही मिटत्या डोळ्यांवरून तरळून गेली; पण या डुलकीने घात केला आणि आमचे आयआयएम फडणवीसांनी नागपूरला पळवून नेले. आमचे रस्ते, आमच्या रेल्वेगाड्या, आमच्याकडे येणारे कारखाने पळवले जातात. तिकडे अहमदनगर, नाशिककर दिवसाढवळ्या आमचे पाणी पळवतात. यावर्षी तर कमालच झाली तुमच्याकडे पाऊस जास्त झाल्याने आम्ही पाणी सोडणार नाही, अशी घोषणाच नाशिककरांनी केली. पूर्वी म्हणे दरोडेखोर जाहीरपणे घरावर चिठ्ठी चिकटवून पूर्व सूचना देऊन दरोडा टाकायचे, तशी ही नाशिककरांनी काढलेली खोडी. आता हा विकास मंडळांचा खुळखुळा तरी आमच्या हाती होता, म्हटले याचा कोणास काय उपयोग हा तरी कोण पळवणार नाही; पण अजितदादांनी तोही पळवला. पाहू आता किती वाजवता ते?-सुधीर महाजन

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादAjit Pawarअजित पवार