शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 00:34 IST

केंद्र सरकारच्या विविध आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडला असल्याचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे मत हा देशासाठी धोक्याचा इशाराच आहे. यावर तातडीने उपाय न केल्यास अर्थव्यवस्थाच धोक्यात येऊ शकते, याची त्यांनी केलेली तर्कशुद्ध मांडणी सर्वांचेच डोळे उघडणारी आहे.

केंद्र सरकारच्या विविध आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडला असल्याचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे मत हा देशासाठी धोक्याचा इशाराच आहे. यावर तातडीने उपाय न केल्यास अर्थव्यवस्थाच धोक्यात येऊ शकते, याची त्यांनी केलेली तर्कशुद्ध मांडणी सर्वांचेच डोळे उघडणारी आहे. प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यात विविध ठिकाणी आयोजित परिसंवादात चिदंबरम यांनी देशाची अर्थव्यवस्था कशी ठप्प झाली आहे, याचा लेखाजोखा मांडला. नऊ वेळा देशाचा अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीकडून देशाच्या सद्यस्थितीचे जे विदारक चित्र मांडले जात आहे, त्यामुळे सुजाण नागरिकांमध्ये जागृती घडून येत आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटी या दोन प्रमुख निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल असे चित्र उभे केले गेले. प्रत्यक्षात किती पैसा जमा झाला तेच अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे काळा पैसा बाहेर आला की नाही हे अस्पष्टच आहे. जीएसटीचा प्रारंभ करताना ‘एक देश, एक कर’ अशी घोषणा केली गेली; मात्र जीएसटीमध्ये आठ प्रकारचे दर ठरविले गेले असल्याने ही घोषणाही फोलच ठरलेली दिसते. नोटाबंदीनंतर एकट्या तामिळनाडू राज्यामध्ये ५० हजार लघु आणि मध्यम उद्योग बंद पडले. तर पाच लाख व्यक्ती बेरोजगार झाल्या. असेच चित्र जवळपास सर्वच राज्यांमध्ये दिसून येते. देशातील साडेतीन कोटी युवक बेरोजगार आहेत. त्यांच्या हातांना काम देण्यासाठी नवे उद्योग येथे सुरू होताना दिसत नाहीत. या बेरोजगारीमुळेच गुन्हेगारीमधील वाढीला हातभार लागतो आहे. महिनाभरात देशात २९ लोकांना जमावाकडून झालेल्या मारहाणीमध्ये प्राण गमवावे लागले आहेत. या मारहाण करणाºयांमध्ये बेरोजगारांची संख्या लक्षणीय दिसून येत होती. यामुळे देशातील शांतता आणि सामाजिक सलोख्यालाच ठेच पोहचली आहे. बेरोजगारीमुळे उत्पन्न नाही. उत्पन्नाअभावी गुंतवणूक नाही आणि गुंतवणूक नसल्याने रोजगार नसल्याचे दुष्टचक्र दिसून येते. ते भेदण्यासाठी सरकारने बँकांमार्फत अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले पाहिजे; मात्र बँकांकडील अनुत्पादक कर्जे प्रचंड वाढली आहेत. शिवाय बँक अधिकाºयांमागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागलेला असल्याने कुणीही कर्ज देण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. चिदंबरम यांच्या सविस्तर मांडणीतून अर्थव्यवस्थेची नाजूक अवस्था स्पष्ट झाली. परिसंवादात केवळ काँग्रेसजनच नव्हते तर सर्व पक्षांचे नेते तसेच वकील, डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाऊंटंट, उद्योजक अशा अभिजन वर्गाची उपस्थिती लक्षणीय ठरली. याच वर्गाकडून समाजाचे मत बनविण्याचे, मत परिवर्तन करण्याचे काम केले जाते. यावर्गाने निश्चित भूमिका घेतल्यास अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होण्याआधीच त्यासाठी उपाययोजनांचा दबाव आल्यास अर्थव्यवस्थेचा रुतलेला गाडा किमान मार्गस्थ होऊ शकेल.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारतnewsबातम्या