शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास वर्षांचा पँथर पुन्हा डरकाळी फोडू शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 08:13 IST

आज, ९ जुलै रोजी दलित पँथरचा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने दलित चळवळीचा भूतकाळ आणि वर्तमानाचे विवेचन!

बी.व्ही.जोंधळे,दलित चळवळीचे अभ्यासक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर १६ वर्षांनी म्हणजेच ९ जुलै १९७२ ला उदयास आलेल्या दलित पँथरने आंबेडकरी चळवळीला एक आक्रमक नि आश्वासक रूप जसे दिले तसेच अत्याचाराचा प्रतिकार करण्याचे एक सामर्थ्यही प्रदान केले होते. दलित पँथरने लढाऊ भूमिका घेताना म्हटले होते, ‘आम्हाला साऱ्या देशाचे राज्य पाहिजे, आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे. हृदयपरिवर्तनाने आमच्यावरचा अन्याय, अत्याचार, आमचे शोषण थांबणार नाही, आम्ही क्रांतिकारी समूह जागे करून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढू.’ 

पँथर्सच्या वादळी सभा, जिथे अत्याचार होईल तिथे धावून जाऊन ‘जशास तसे’ उत्तर देण्याची कार्यशैली याची सर्वदूर चर्चा होऊ लागली; पण आंबेडकरी चळवळीला जो दुहीचा शाप आहे तो अखेर पँथरलाही भोवला व पँथर चळवळ मोडून पडली. लोककवी वामनदादा कर्डकांनी विकलांग झालेल्या आंबेडकरी चळवळीवर आपल्या लोकगीतांतून भाष्य करताना कळवळून लिहिले.संपला वामन तयाचे गीत आता संपले, संपलेल्या गायनाचा साज आम्ही पाहतो!

पँथरचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना अशाच विदीर्ण भावना दाटून आल्या तर नवल नव्हे!  नामदेव ढसाळांना जातीबरोबरच वर्गाचाही विचार व्हावा असे वाटत होते, म्हणून ते आंबेडकरवादाबरोबरच  मार्क्सवादाचीसुद्धा सांगड घालत हाेते. याचा अर्थ ते आंबेडकरवादाला दुय्यम लेखत होते असा नाही. समग्र परिवर्तनासाठी संघर्ष करण्याची ढसाळांची भूमिका चूक नव्हती. याउलट राजा ढालेंची भूमिका समग्र परिवर्तनासाठी धर्मांतरासारखे उपाय योजावेत, अशी हाेती. ढालेंनी १९७८ मध्ये पँथर बरखास्त करून जी मास मूव्हमेंट काढली तिचे उद्दिष्ट बाैद्ध धर्माद्वारे सांस्कृतिक क्रांती घडवून आणावी, हेच होते. काही पँथर्संनी तर ‘जो बुद्धिस्ट, तोच खरा पँथर’ अशी संकुचित भूमिका घेऊन जनसामान्यांची विश्वासार्हता न मिळविता आपले नेतृत्व कसे शाबूत राहील याचीच काळजी वाहिली. हेसुद्धा पँथर चळवळीच्या पीछेहाटीचे एक कारण ठरले.

‘दलित पँथर : एक अधोरेखित सत्य’ या त्यांच्या ग्रंथात अर्जुन डांगळे लिहितात, ‘मध्य मुंबईत बॅ. रामराव आदिक विरुद्ध रोझा देशपांडे या पोटनिवडणुकीत राजा ढालेंनी काँग्रेसशी डील केली, असा आराेप ढसाळांनी ढालेंवर केला. ढालेंनी पँथर बरखास्त करून मास मूव्हमेंट काढली, त्याचेही कारण म्हणजे आपण पँथरचे सर्वोच्च नेते जरी असलो तरी संस्थापक नाही हे शल्य ढालेंच्या मनात डाचत होते! आपणाशिवाय पँथर चालू शकत नाही, असाही भ्रम ढालेंचा होता. पण पुढे रामदास आठवले, अरुण कांबळे, दयानंद मस्के, गंगाधर गाडे, ॲड. प्रीतमकुमार शेगावकर, टी. एम. कांबळे, उमाकांत रणधीर, एस. एम. प्रधान आदींनी पँथरचे पुनरुज्जीवन ‘भारतीय दलित पँथर’ असे करून पँथर चळवळ चालविली; पण १९९६ च्या रिपब्लिकन ऐक्यात पँथरचे विसर्जनही करून टाकले. दलित पँथरचे संस्थापक कोण यावरूनही पँथर्समध्ये श्रेयाचे भांडण निर्माण झाले. ज. वि. पवार म्हणतात, पँथरची कल्पना मला व ढसाळांना सुचली म्हणून आम्हीच खरे पँथरचे संस्थापक आहोत, तर अर्जुन डांगळे लिहितात, राजा ढालेंंचा पँथर स्थापनेत प्रत्यक्ष वाटा नव्हता. ‘साधना’ साप्ताहिकातील ‘काळ स्वातंत्र्य दिन’ या त्यांच्या लेखाला प्रसिद्धी मिळाल्यावर ढाले पँथरमध्ये आले! 

- तर राजा ढाले ‘दलित पँथरचा संस्थापक कोण?’ या त्यांच्या पुस्तिकेत ‘संघटना स्थापनेची बीजभूत कल्पना कुणाला तरी सुचावी’ लागते म्हणजे आपणालाच ती सुचली असे ते अप्रत्यक्षपणे सुचवितात. 

- दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव आता वर्षभर ठिकठिकाणी साजरा होणार आहे, तेव्हा प्रश्न असा की, दलित चळवळ भूतकाळातच रमणार आहे, की भविष्याचा वेध घेऊन दलित मुक्तीचा लढा  पुकारणार आहे? पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात या अनुषंगाने चिंतन व्हावे ही अपेक्षा!