शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

CoronaVirus: शारीरिक हल्ला आणि मानसिक आघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:55 IST

एकीकडे ‘कोरोनाचा शारीरिक हल्ला’ परतवून लावत असतानाच दुसरीकडे ‘समाजाचा मानसिक आघात’ सहन करण्याची वेळ कृपया कोणावरही आणून देऊ नका.

- सचिन जवळकोटे, निवासी संपादक, सोलापूरसध्या ‘रामराव’ची स्टोरी सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली आहे. आयुष्यभर घरात दरारा अन् मान असणारे रामराव जेव्हा तापाने फणफणतात, जोरात खोकू लागतात, तेव्हा त्यांच्या पत्नीसह घरातील मुलेबाळेही त्यांच्याशी किती विचित्र पद्धतीने फटकून वागतात, हे या कथेत अत्यंत परखडपणे मांडले गेले आहे. मोती नावाचा कुत्रा सोडला, तर कोणीच त्यांच्यासोबत दवाखान्यात येत नाही; मात्र, १४ दिवसांनंतर ‘निगेटिव्ह रिपोर्ट’ घेऊन रामराव दवाखान्यातून बाहेर पडतात, तेव्हा ते शरीरानं ठणठणीत असले, तरी मनाने पूर्णपणे खचलेले असतात. एकवेळ कोरोना झाला असता, तरी सहन केला असता; परंतु आपल्याच माणसांनी संशयातून निर्माण केलेला हेटाळणीचा जो भयानक आजार पसरविला, तो त्यांना सहन होत नाही. म्हणूनच घरची मंडळी आता मोठ्या गाडीत घेण्यासाठी येत असतानाही ते उलट पावली चालत अनोळखी वाट धरतात, कधीही घरी न परतण्यासाठी.सोशल मीडियावरची ही पोस्ट कदाचित काल्पनिक असेलही. मात्र, सध्या गावोगावी असे कैक ‘रामराव’ संशयाच्या रोगाने बाधित झाले आहेत. नजरेतल्या द्वेषापासून ते वाळीत टाकण्याच्या भाषेपर्यंत अनेक कटू प्रसंगांना ते सामोरे जाऊ लागले आहेत. ‘कोरोना’ची भीती गावागावांत इतकी खोलवर रुजली आहे की, नेहमीप्रमाणे शेजारच्या घरातून येणारी भाजीची वाटीही आता विषाची वाटू लागली आहे. पूर्वी विरजणासाठी दही मागणारी शेजारीणदेखील आता उंबरा ओलांडून बाहेर पडेनाशी झाली. माणसेच माणसाला परकी झाली. माणुसकीची भावनाच पोरकी झाली. 

‘संसर्ग’ नको म्हणून केवळ ‘संपर्क’ कमी करा, एवढीच या रोगावर मात करण्याची अचूक मात्रा लागू झालेली. मात्र, एकमेकांमधला ‘संवाद’ तोडून टाकण्याची घातक प्रक्रिया सुरू झाली. ज्या तरुण पिढीने आपल्या गावचे नाव पुण्या-मुंबईत जाऊन मोठे केले, तीच आता पुन्हा गावात आली म्हटल्यावर उलट त्यांचा दुस्वास केला गेला. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर विनाकारण संशय व्यक्त झाला. ज्यांनी कधीकाळी गावातील पडिक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पैसे पाठविले, त्यांनाच आता गावची वेस पूर्णपणे बंद झाली. रस्त्यावर काटे-कुटे अन् दगडं-लाकडं टाकून त्यांचा प्रवेश रोखला गेला. अनेकांना त्यांच्या घरच्यांवर दबाव आणून गावाबाहेर काढले गेले. केवळ ‘बाहेरून आलेला’ या भीतीपोटी गावातूनच बहिष्कृत करण्याचा अन् समाजातून वाळीत टाकण्याचा नवा पायंडा कैक ठिकाणी पाडला गेला.केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी परिसरातही असाच विचित्र प्रकार दिसून आला. ज्या पेठेत एखादा इसम ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आढळून आला त्या टापूतही आपापले छोटे-मोठे रस्ते स्थानिक लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलेत. शेजारच्या गल्लीबोळातील रहिवाशांनाही जाण्या-येण्यासाठी प्रवेश रोखला गेला. हाती मिळेल त्या वस्तू म्हणजे टायर, भंगारातील मोडके-तोडके इलेक्ट्रॉनिक पार्ट्स, बांबू अन् फाटकी पोती यांचा यासाठी वापर करण्यात आला.
‘हातावर क्वारंटाईनचा शिक्का म्हणजे तो शंभर टक्के कोरोना रुग्णच,’ असाही भ्रम गावागावांमध्ये पसरला. संशयाचे पिशाच्य विनाकारण बागुलबुवा निर्माण करू लागले. या रोगाशी लढा देण्यासाठी खंबीरपणे साऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगून-सांगून प्रशासनही हतबल झाले; त्यामुळे खरा रुग्णही घाबरून दवाखान्यात जाण्यासाठी टाळाटाळ करू लागला. तपासणीसाठी दारापर्यंत आलेल्या सरकारी टीमसमोर तोंडही चुकविले जाऊ लागले. त्यामुळेच की काय, अनेक ठिकाणी संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतरच तो बाधित रुग्ण होता, हे उघडकीस येऊ लागले.कदाचित, या रुग्णांनी ‘समाजाला काय वाटेल?’ ही भीती डोक्यात न ठेवता थेट दवाखान्यात धाव घेतली असती, तर कदाचित हा आजार मृत्यूपर्यंतही गेलानसता. त्यांच्या संपर्कात आलेले इतरही आता आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल झाले नसते. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, एकीकडे ‘कोरोनाचा शारीरिक हल्ला’ परतवून लावत असतानाच दुसरीकडे ‘समाजाचा मानसिक आघात’ सहन करण्याची वेळ कृपया कोणावरही आणून देऊ नका.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या