शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाची साखळी तुटतेय हे दिलासादायी!

By किरण अग्रवाल | Updated: July 30, 2020 11:06 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबद्दल निर्माण झालेल्या भयाची स्थिती आता काहीशी निवळत आहे.

किरण अग्रवाल

जिवाशीच गाठ घालून देणाऱ्या कोरोनाची साखळी हळूहळू तुटू पाहते आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या बाधितांची संख्या कमी होत असून, योग्य त्या उपचाराअंती कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरवापसी होत असलेल्यांचे प्रमाणही वाढले आहे; त्यामुळेच अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू होऊ घातला आहे हे दिलासादायकच असले तरी, याबाबत बाळगावयाच्या सावधानतेबद्दल दुर्लक्ष होऊ न देणेही गरजेचे आहे; पण अनेक ठिकाणी होणारी गर्दी पाहता, यासंबंधीची चिंता दूर होऊ नये.

कोरोनाबद्दल निर्माण झालेल्या भयाची स्थिती आता काहीशी निवळत आहे. शासनाने लॉकडाऊन उठविल्यानंतर गेल्या दोन आवर्तनात अटी-शर्तींवर काही व्यवहार सुरू करून जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न चालविला आहे, याच मालिकेत अनलॉक-३ची घोषणा झाली असून, त्यात जिम्स काही अटींवर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रात्रीची संचारबंदीही उठणार आहे. अर्थात काही ठिकाणची रुग्णसंख्या अजूनही वाढतीच असली तरी लॉकडाऊन हा त्यावरील उपाय व पर्याय ठरू शकत नाही हे आता सर्वांनीच समजून घेतले आहे. डॉ. मिलिंद वाटवे यांच्यासारख्या संशोधक तज्ज्ञांनी तर हे सांगितले आहेच, शिवाय लॉकडाऊनमध्ये होणारे नुकसानही सर्वांनी सोसून झाले आहे; तेव्हा तसे होऊ द्यायचे नसेल व अर्थचक्र आता रडतखडत का होईना जे सुरू झाले आहे, ते पुन्हा थांबवायचे नसेल तर सावधानता बाळगत वाटचाल करण्याचीच भूमिका घेणे इष्ट आहे. अनलॉक-३कडे त्याचदृष्टीने सकारात्मकतेने बघितले जावयास हवे. मिळालीय मान्यता म्हणून अनिर्बंधता किंवा बिनधास्तपणा अनुभवास येऊ नये हे यात महत्त्वाचे आहे. अत्यावश्यक कामाखेरीज बाहेर न पडण्याचा व बाहेर पडले तरी सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचा मनोनिग्रह यासाठी गरजेचा ठरणार आहे.



आतापर्यंत कोरोनाबाधित व बळींची संख्या प्राधान्याने समोर येत होती; परंतु अलीकडे काही दिवसांपासून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही समोर येऊ लागल्याने मनातील भीतीचे वातावरण दूर होण्यास मदत घडून येत आहे. जगभरातील एक कोटी लोकांनी कोरोनावर मात केल्याचे वृत्त आहे तसेच देशातील बरे होणाऱ्यांचा आकडाही दहा लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. राज्यात दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता दिवसाला दहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचाही टप्पा गाठला गेला आहे. मृत्युदर हा दिवसेंदिवस कमी होत चालला असून, रुग्ण बरे होण्याचा टक्का वाढत चालला आहे, ही सारी दिलासादायक चिन्हे आहेत. लवकरच विघ्नहर्त्या गणपती बाप्पांचे आगमन होऊ घातले आहे, त्यामुळे बाप्पा येईपर्यंत कोरोनाचे संकट ब-यापैकी दूर झालेले असेल अशी अपेक्षा करता यावी.

महत्त्वाचे म्हणजे, चाचण्या वाढविल्यामुळेच कोरोनाची साखळी तोडणे शक्य झाले आहे. शासनाबरोबरच सामाजिक व सेवाभावी संस्था पुढे आल्याने आता सर्वत्रच मोठ्या प्रमाणात चाचण्या होऊ लागल्या आहेत. त्या करून घेण्याची निकड सामान्यांनाही जाणवू लागल्याने भय न बाळगता लोक चाचण्या करून घेत आहेत. दिल्लीत प्रतिदिनी वीस हजार चाचण्या केल्या जात आहेत. मुंबईत दिवसाला दहा हजार चाचण्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर नाशिकसारख्या ठिकाणी प्रतिदिनी हजार चाचण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, त्यातून होणारे ट्रेसिंग हे पुढील संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने खूप उपयोगी ठरत आहे. यातील लक्षवेधी बाब अशी, की आता आतापर्यंत कोरोनाच्या भयामुळे कॉरण्टाइन राहिलेले अनेक लोकप्रतिनिधी आता घराबाहेर पडलेले दिसून येत आहेत. खासदार व आमदारच नव्हे, तर महानगरपालिका व नगरपालिकांमधील नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील सरपंचदेखील आपापल्या परिसरात कोरोनाच्या चाचण्या करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असून, प्राथमिक तपासणीसाठी पुढाकार घेत आहेत. कोरोना सोबतचे हे युद्ध केवळ एकटे शासन-प्रशासन तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना लढून चालणार नाही तर त्यांच्या साथीला लोकसहभाग लाभणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कोरोनाच्या चाचण्यांसाठी लोकसेवकांकडून घेतला जात असलेला पुढाकार लोकचळवळीचे स्वरूप धारण करताना दिसत आहे. जागोजागी तसे झाले तर उत्तमच, कारण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तपासणी म्हणजे ट्रेसिंग होणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या