शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा अपयशी मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद होण्यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्यांचेच फावेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 05:30 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संबोधनादरम्यान उभे केलेले चित्र आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये दुर्दैवाने बरेच अंतर आहे. इतर देशांमध्ये जे झाले ते महाराष्ट्रात होऊ द्यायचे नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोविड-१९ महासाथ आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्रात घोषित केलेली टाळेबंदी ३१ मेपर्यंत तरी हटविण्यात येणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. महासाथीला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने योजलेल्या उपाययोजना, अर्थकारण व इतर काही संबंधित मुद्द्यांवरही मुख्यमंत्री बोलले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संबोधनादरम्यान उभे केलेले चित्र आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये दुर्दैवाने बरेच अंतर आहे. इतर देशांमध्ये जे झाले ते महाराष्ट्रात होऊ द्यायचे नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. टीकेचा धनी झालो तरी चालेल, महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहोत, ही त्यांची नेहमीची वाक्येही अर्थातच जोडीला होतीच! ही सर्वमान्य वस्तुस्थिती आहे की, जगातील बहुतांश देशांच्या तुलनेत कोविडबाधितांची संख्या आणि मृत्युदर यासंदर्भात भारताची स्थिती खूप चांगली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची त्या देशांसोबत तुलना करणे अनाठायीच! तुलना करायचीच झाल्यास ती देशातील अन्य राज्यांसोबत करायला हवी आणि इथे महाराष्ट्राचे पितळ उघडे पडते.वस्तुस्थिती ही आहे की, कोविड-१९संदर्भात महाराष्ट्राची स्थिती देशात सर्वांत वाईट आहे. महाराष्ट्राने नेहमीच इतर राज्यांसमोर आदर्श प्रस्थापित केले आहेत. महाराष्ट्राने जे केले त्याच्या अनुकरणाचा प्रयत्न बहुतांश राज्ये करीत असतात. यावेळी मात्र इतर छोट्या व तुलनेत अविकसित राज्यांना जे जमले, ते महाराष्ट्राला जमू शकले नाही, ही कटू वस्तुस्थिती आहे. कोविड-१९ हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरले, ही वस्तुस्थिती उघड होत आहे. कोरोनाच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी म्हणून अर्थव्यवस्थेच्या नरडीला नख लावणारा टाळेबंदीचा उपाय योजण्यात आला. मात्र, आज टाळेबंदी जारी होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत आला असतानाही राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत घातांकी वाढ सुरूच आहे.याच काळात केरळसारखी काही राज्ये कोरोनामुक्त झाली. औषध नाही आणि प्रतिबंधात्मक लसही उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदीशिवाय पर्यायच नव्हता. मात्र, ती यशस्वी ठरण्यासाठी कठोर अंमलबजावणीलाही पर्याय नव्हता! दुर्दैवाने राज्यातील प्रशासन त्यामध्ये सर्वथा अपयशी ठरल्याची वस्तुस्थिती ही रुग्ण व मृत्यूची वाढती आकडेवारी ठसठशीतपणे अधोरेखित करीत आहे. या आकडेवारीचा बारकाईने अभ्यास केल्यास असे दिसते की, शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात ‘कोविड-१९’चा प्रसार नगण्य आहे. प्रशासनाच्या अपयशामुळे टाळेबंदी, जिल्हाबंदी झुगारून आज जवळपास प्रत्येक गावात महानगरांत कामास असलेली मंडळी पोहोचली आहेत. मात्र, बहुतांश गावांना गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिबंधित क्षेत्र बनविले आहे. गावाला उर्वरित जगाशी जोडणारे सर्व रस्ते अडथळे उभारून बंद केलेत. तेथे पहारा देऊन बाहेरच्या व्यक्तीस प्रवेश वर्ज्य केला आहे. गावातील मूळचा रहिवासी परत आला, तर त्याला शाळांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. गावकऱ्यांच्या या स्वयंस्फूर्त दक्षतेमुळेच बहुतांश खेड्यांमध्ये कोरोनाला शिरकाव करता आलेला नाही.दुसरीकडे बहुतांश शहरांमध्ये मात्र महसूल प्रशासन, पालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखविण्यात व जबाबदारी ढकलण्यातच मश्गुल आहेत. रस्त्यावर कर्तव्य बजावणाºया पोलिसांनी खूप चांगले काम केले. मात्र, वरिष्ठांच्या नियोजनशून्यतेमुळे त्यांच्या चांगल्या कामावर पाणी फेरले, ही वस्तुस्थिती आहे. ‘लोकमत’ने अलीकडेच अकोला जिल्ह्यात चेकपोस्टवर केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये असे निदर्शनास आले की, रात्री ९ नंतर बहुतांश चेकपोस्टवर पोलीस नसतात. परिणामी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण झाले. जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी नसलेल्या आॅटो रिक्षांमधून प्रवास करीत कामगार मुंबईपासून विदर्भातील गावांपर्यंत पोहोचले. हे प्रशासनाचे अपयश नव्हे तर दुसरे काय? प्रशासनावर ज्यांची पक्की मांड हवी, ते सत्ताधारीच स्वत:ला घरात कोंडून घेऊन बसले असतील, तर दुसरी अपेक्षा तरी काय करायची? या संकटसमयी काही पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्याला भेट देण्यासाठीही सवड मिळू नये? मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रामाणिक हेतूबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. मात्र, प्रशासनाच्या अकर्मण्यतेमुळे काही मंडळींना तशी संधी मिळत आहे. त्यास अटकावासाठी मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा लागेल; अन्यथा अपयशी मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद होण्यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्यांचेच फावेल! 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र