शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

सामाजिक सलोख्यासाठी ‘सद्भावना यात्रा’! जातीयवाद, गुन्हेगारी विरोधात आवाज उठवणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 09:16 IST

लोकांना वाद नको आहे, भाईचारा हवा आहे, सामाजिक तेढ नको, द्वेष, मत्सर नको आहे, तर सामाजिक सद्भाव हवा आहे, हे स्पष्ट जाणवले.

मोहन जोशी, माजी आमदार

राज्यात वाढत चाललेला जातीयवाद, धर्मांधता, वाढती राजकीय गुन्हेगारी याविरोधात आवाज उठवणे गरजेचे होते. ही आपलीच नैतिक, राजकीय, सामाजिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेत काँग्रेस पक्षाने अशा घटना घडलेल्या ठिकाणीच दोन दिवसांची सद्भावना यात्रा काढली. त्याविषयी...

विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व बदलले व गांधीवादी, सर्वोदयी विचाराचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती सुकाणू देण्यात आले.  प्रांताध्यक्ष होताच त्यांनी ‘सद्भावना यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला. मागील तीन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील घटनांनी राज्याची देशात नाचक्की होत आहे. जाती-जातीत विष कालवण्याचे काम एका बाजूने केले जात असताना, सर्वांना बरोबर घेऊन ही यात्रा काढण्याचा धाडसी निर्णय हर्षवर्धन यांनी घेतला व तो यशस्वीपणे पार पाडला. बीड जिल्ह्यातील या घटनेचे केंद्रबिंदू असलेल्या मस्साजोग गावातूनच सद्भावना यात्रा काढण्याचा निर्णय झाला. यात्रेत २०० ते ३०० लोक तरी येतील का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. पण, चांगल्या कार्यात महाराष्ट्रातील लोक नक्कीच सहभागी होतील, असा आम्हाला विश्वास होता. तो खरा ठरला. मार्च महिन्यातील कडक उन्हात ४ ते ५ हजार लोकांनी या यात्रेत सहभाग घेतला. मार्गावर जागोजागी, गावागावात या सद्भावना पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.  या यात्रेची गरज होती हे अनेकांनी बोलून दाखवले. एका फळ विक्रेत्या महिलेने हर्षवर्धन सपकाळ यांना या यात्रेबद्दल धन्यवाद दिले. लोकांना वाद नको आहे, भाईचारा हवा आहे, सामाजिक तेढ नको, द्वेष, मत्सर नको आहे, तर सामाजिक सद्भाव हवा आहे, हे स्पष्ट जाणवले.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, चक्रधर स्वामी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या पूज्य संतांचा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी आदर्शांनी देशाला नेहमीच मार्गदर्शन केले आहे, परंतु अलीकडच्या काळात राज्याची सामाजिक जडणघडण बिघडत चालली आहे.  यामागे ज्या शक्ती आहेत, त्या अत्यंत विखारी, विकृत व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. एखाद्या व्यक्तीची क्रूरपणे हत्या करून त्याच्यावर लघुशंका करणे, हसणे हा अत्यंत माणुसकीशून्य प्रकार आहे. या हत्येनंतर दोन जातीत तणाव निर्माण झाला. समाजासमाजात मोठी दरी निर्माण झाली. महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरा पाहता, एकता मजबूत करण्याची आणि महाराष्ट्र धर्माचे पुनरुज्जीवन करण्याची नितांत गरज आहे.

बीड जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातच सद्भावना आणि बंधुता वाढावी, समाजात निर्माण झालेली दरी नष्ट व्हावी, हा या सद्भावना यात्रेचा हेतू होता. तो काही अंशी का होईना सफल झाला. काँग्रेस पक्षाला स्थापनेपासूनच जाती भेदाच्या पलीकडे पाहण्याचा वारसा लाभलेला आहे.  समाजातील तळाच्या माणसाचा विचार हा महात्मा गांधीजींचा आदर्श काँग्रेस पक्ष नेहमीच पाळत आला आहे.  सामाजिक सद्भावनेचा तोच वारसा आपल्या संविधानातही आलेला आहे. बीडसारख्या घटनांनी त्याला ठेच पोहचते.  सद्भावना यात्रेची सुरुवात करण्याआधी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कानिफनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन स्थानिक  दुकानदारांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली.

काही दिवसांपूर्वी मढीच्या ग्रामपंचायतीने एक बेकायदेशीर ठराव करून मढीच्या यात्रेत मुस्लीम समाजाच्या दुकानदारांना दुकाने लावण्याची परवानगी देणार नाही असे म्हटले होते आणि  सत्ताधारी पक्षातील एका मंत्र्याने या असंवैधानिक आणि बेकायदेशीर ठरावाचे समर्थनही केले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या दुकानदारांशी चर्चा करून, ‘घाबरू नका, काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे’, असा विश्वास दिला. 

कानिफनाथांची समाधी, भगवानगड येथे संत श्री भगवानबाबा आणि नारायणगड येथे भगवान नगद नारायणाचे दर्शन घेऊन सामाजिक एकोप्यासाठी साकडे घातले. सद्भावना यात्रा ही काँग्रेस पक्षाने आयोजित केली असली, तरी ती राजकीय पदयात्रा नाही, तर एक सामाजिक उपक्रम म्हणून हाती घेतली होती. महाराष्ट्रातील आजची परिस्थिती पाहता अशा प्रकारच्या सद्भावना यात्रेची नितांत गरज होती. मस्साजोग ते बीड या ५१ किलोमीटरच्या सद्भावना यात्रेने महाराष्ट्रात सामाजिक सद्भावनेचा जागर सुरू केला आहे, आता हा जागर थांबणार नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस