शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

गरिबांची मुले शिक्षण मंत्र्याच्या तावडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:40 IST

शिक्षण ही एक शक्ती आहे. मानव हा इतर सजीवापेक्षा वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण ठरला तो त्याच्या ज्ञान साधनेमुळेच! शिक्षण समाज बदलविण्याचे प्रभावी साधन आहे. बदलत्या समाजाबरोबर मानवी इतिहासात शिक्षणाचा मूळ झरा अधिक व्यापक बनला. त्याने अनेक देशात नवजीवनाची उभारणी केली. रूढी, परंपरा, दैववाद, गरिबी यामध्ये खचून गेलेल्या कष्टकरी जनतेला स्वत्वाची जाणीव करून दिली. समाजातील तळागाळातील लोकांच्या जीवनातील कोंडी फोडल्याशिवाय खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकणार नाही, या जाणिवा निर्माण झाल्या.

ठळक मुद्देदेशातील गरिबी नैसर्गिक नसून मानव निर्मितशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून विरोध करण्याची गरज

शिक्षण ही एक शक्ती आहे. मानव हा इतर सजीवापेक्षा वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण ठरला तो त्याच्या ज्ञान साधनेमुळेच! शिक्षण समाज बदलविण्याचे प्रभावी साधन आहे. बदलत्या समाजाबरोबर मानवी इतिहासात शिक्षणाचा मूळ झरा अधिक व्यापक बनला. त्याने अनेक देशात नवजीवनाची उभारणी केली. रूढी, परंपरा, दैववाद, गरिबी यामध्ये खचून गेलेल्या कष्टकरी जनतेला स्वत्वाची जाणीव करून दिली. समाजातील तळागाळातील लोकांच्या जीवनातील कोंडी फोडल्याशिवाय खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकणार नाही, या जाणिवा निर्माण झाल्या.प्राचीन शिक्षण पद्धती : प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती ‘गुरुकुल’ स्वरूपाची होती. गुरुजींच्या आश्रमात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असत. आयुष्याचा १२ वर्षांचा कालखंड गुरूच्या आश्रमात शिक्षणासाठी घालवावा लागत असे. अर्थात अशा शिक्षणाचे माध्यम संस्कृत भाषा असे. प्राचीन स्थिती परंपरांचा खोटा अभिमान बाळगणाऱ्यांना ‘गुरुकुल’ची मने मोहित करणारी स्वप्ने पडत असली तरी ते शिक्षण आजच्याप्रमाणे सर्वांसाठी खुले नव्हते. राजे-रजवाडे व सम्राटांची मुलेच आपल्या आयुष्याचा काही काळ या शिक्षणासाठी देऊ शकत होते. हे शिक्षण घेण्यासाठी चांगल्या आर्थिक स्थितीची जशी गरज होती, तशीच चांगल्या कुळात जन्म घेण्याचीही गरज होती. अर्थात या दोन्ही गोष्टी जनसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. आपल्या प्राचीन परंपरांच्या बऱ्याच कालखंडाने शिक्षणाचे जसे दरवाजे बंद केले होते, तसेच स्त्रियांनाही ही संधी नाकारली होती.सर्वांना शिक्षण : १८४८ मध्ये सर्वांना शिक्षणाचा आग्रह व प्रामुख्याने मागास, महिलांना शिक्षण या संकल्पनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय पुढाकाराने वंचितांसाठी शिक्षणाची दारे उघडी झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील कलम ४६ प्रमाणे मोफत व सक्तीच्या शिक्षणाची संकल्पना उदयास आणली.गरिबी, शिक्षण व क्षमता : गरिबीला ‘शाप’ म्हटले तर तो शाप एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस दिलेला असा खचितच नाही. कारण हजारो वर्षाच्या वर्ण व्यवस्थेने जातीच्या उतरंडीत वरच्या स्तरातील समूहाने खालच्या स्तरातील समूहाला शिक्षण, साधन, संपत्तीपासून दूर ठेवण्याचे अक्षम्य पाप केलेले आहे. याच व्यवस्थेने निर्माण केलेला, टिकविलेला व वाढविलेला असा हा ‘शाप’ आहे. किंबहुना गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून पुढील पिढीला बहुधा गरिबीचा वारसा प्राप्त होतो, असे आपल्याला म्हणता येईल.याच व्यवस्थेने निर्माण केलेला, टिकविलेला व वाढविलेला असा हा ‘शाप’ आहे. किंबहुना गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून पुढील पिढीला बहुधा गरिबीचा वारसा प्राप्त होतो, असे आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे या देशातील गरिबी ही नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे. त्यामुळे साहजिकच गरिबी निर्मूलनाची जबाबदारी माणसाला व या शासन व्यवस्थेला कदापिही टाळता येणार नाही.गरिबीतील दुख:, व्यथा, वेदना, कुपोषण, विशिष्ट असे घरचे व परिसरातील वातावरण, तसेच शाळेत अशा मुलांकडे पाहण्याची दृष्टी व त्यातून मिळणारे दुय्यमतेचे दुर्भाग्य या साऱ्यांचा या मुलांच्या मेंदूवर लहान वयातच विपरीत परिणाम होऊन मुलांच्या शिकण्याच्या क्षमताच अडचणीत येतात. अशा प्रकारच्या अनिष्ट परिणामामुळे मुलांची शाळांमधील कामगिरी व इतर सबळ आर्थिक परिस्थितीतील मुलांच्या तुलनेत २० टक्क्यापर्यंत कमी असू शकते. सदैव जातीय, धर्मीय, वंशीय ताणांचे प्रभाव वातावरणात असतातच. अनेकदा बोचक खोचक अभिप्रायही मुलांना सोसावे लागतात. नेहमीच मिळणारा ‘कमीपणा’ मानसिक खच्चीकरण करीत असतो. गरिबीत जन्मलेल्या व वाढलेल्या मुलांच्या बाबतीत शिक्षणास उपयुक्त असे वातावरण नसल्यामुळे अशी मुले व अन्य मुलांच्या विकासात फारच अंतर दिसते. गरीब मुलांच्या जीवनात सततच्या व्यथा व ताणतणाव यामुळे कोवळ्या वयात त्यांच्या मेंदूवर अनिष्ट परिणाम होत असतात.अशावेळी अमरावती येथे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रशांत राठोड या विद्यार्थ्याला ‘तुला झेपत नसेल तर तू शिकू नकोस, नोकरी कर’ असे सुनावले आहे. हजारो वर्षांपासून गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या या व्यवस्थेने पुन्हा अशा प्रकारचे शिक्षणमंत्र्याद्वारे बोलणे म्हणजे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण करण्याची मानसिकता व्यक्त करणे होय. त्यांनी दाखवून दिले की ते एका विशिष्ट व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत व तीच व्यवस्था गरीब व मागासांवर लादू इच्छित असल्याचे त्यांच्या मनातले ओठावर येत आहे. एकंदरीत राज्यातील गरिबांची मुले पूर्णत: शिक्षण मंत्र्याच्या तावडीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. तेव्हा या मानसिकतेला पूर्ण ताकदीने सर्व स्तरातून विरोध करण्याची गरज आहे.दिनानाथ वाघमारेसंघर्ष वाहिणी, भटक्या विमुक्तांचा लढा लढणारे कार्यकर्ते

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेEducationशिक्षण