शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

जातीनिहाय जनगणना : इरादा सोपा, कृती मात्र कठीण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 07:11 IST

जात, गोतावळा, गोत्र, आडनावे यातील संदिग्धता हा सगळ्यात मोठा अडथळा. उत्तर देणारे अनेकदा असंगत, अपुरी माहिती देतात. या गुंतागुंतीचे काय करणार?

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली

आपले टीकाकार आणि समर्थक अशा दोघांनाही आश्चर्याचा धक्का देण्याची किमया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा साधली आहे. यावेळी मुद्दा होता जातीनिहाय जनगणनेचा. अशी शेवटची जनगणना ब्रिटिश राजवटीत वर्ष १९३१ मध्ये झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात जातीनिहाय जनगणना करणे सातत्याने टाळले गेले. जनता पक्षाच्या काळात वर्ष १९८० मध्ये मंडल आयोग आणला गेला. इतर मागासवर्गीयांच्या १२५७ जाती त्यावेळी निश्चित केल्या गेल्या होत्या. मंडल आयोगाचा खरा प्रयोग १९८९-९० मध्ये झाला. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणसंस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्याची मंडल आयोगाची शिफारस पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी राबविली. काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांकडून त्याला प्रखर विरोध झाला. परिणामस्वरूप सरकारही पडले. वर्ष २०११ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने आर्थिक निकषांवर आधारलेली जनगणना केली. कल्याणकारी योजनांचा काय परिणाम होतो, याचे मूल्यमापन करण्यासाठी पुन्हा एकदा जातीनिहाय आकडेवारी गोळा केली गेली. या जनगणनेतून हजारो जाती आणि उपजाती समोर आल्या. जातींच्या उपवर्गीकरणाशी संबंधित रोहिणी आयोग नेमला गेला; परंतु या आयोगाचा अहवाल कधीच प्रसिद्ध झाला नाही. 

‘कोविड’च्या साथीमुळे वर्ष २०२१ मध्ये जनगणना लांबली. वर्ष २०२४ साठी निवडणुका व्हावयाच्या होत्या; त्यामुळे राजकीय कारणाने ती झाली नाही. आता जाती आणि उपजातींची आकडेवारी गोळा करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. याला ‘मोदी यांचा मंडल २ प्रयोग’ संबोधले जाते. आजवर जातविरहित समाजाचा पुरस्कार करत आलेल्या संघपरिवाराच्या मूळ विचारसरणीलाच या जनगणनेतून आव्हान मिळेल.  जातीनिहाय जनगणना करण्यात अनेक आव्हाने आहेत. सर्वांत पहिला मुद्दा अशा गणनेच्या कायदेशीरपणाचा येईल. विद्यमान जनगणना कायदा आणि संबंधित नियम याच्यात जातीचा उल्लेख करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्या लागतील का, हे पाहावे लागेल. 

जात, गोतावळा, गोत्र आणि आडनावे यांच्यात बरीच संदिग्धता असते, हा सगळ्यात मोठा मूलभूत अडथळा यात येतो. उत्तर देणारे अनेकदा असंगत, अपुरी माहिती देत असतात. वर्ष २०११ मध्ये आर्थिक निकषावर जातींची गणना केली गेली. दशवार्षिक गणनेपेक्षा ती स्वतंत्र होती. त्यावेळी ही सगळी गुंतागुंत लक्षात आलेली आहे. ४६  लाखांहून अधिक जातींशी संबंधित नोंदी या गणनेने समोर आणल्या. आडनावे, उपजाती, समानार्थी उल्लेख, गोतावळा, नावे या सगळ्यांचा त्या मोजणीत समावेश केला गेल्यामुळे अचूक निष्कर्ष काढणे खूपच कठीण होऊन बसले. ही माहिती स्वाभाविकच विश्वास ठेवण्याजोगी राहिली नाही. हा गोंधळ दूर करण्यासाठी नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. आर्थिक निकषांवर केलेल्या गणनेतून मिळालेली माहिती त्यांच्या नेतृत्वाखालील  गटाने तपासून पाहावयाची होती. या समितीचा अहवाल मात्र उघड करण्यात आला नाही. 

मुस्लीम, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांच्या बाबतीत ही जातवार जनगणना करावयाची किंवा कसे,  हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असेल. कारण या समाजातही जातींची अंतर्गत उतरंड आहे. धार्मिक पंथांचा समावेश, अनुसूचित जाती-जमातीबरोबरच इतर मागासवर्गीयांचा वेगळा उल्लेख, जातीय समूहांचे आणखी उपवर्गीकरण करावयाचे का? पसमंदा मुस्लिमांची गणना इतर मागासवर्गीयांत करावी अशाही मागण्या आहेत. यामुळे जात जनगणनेतून  नेमकी माहिती मिळेल का, याविषयी  साधार चिंता व्यक्त होते. इतर मागासवर्गीयांची संख्या ६० ते ६५ टक्के असताना त्यांच्याकडून संसदेत अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी होऊ शकते. नोकरी आणि शिक्षणात ४९ टक्के आरक्षणाची मर्यादा आहे; ती वाढविण्याचेही दडपण येईल. जाती आणि उपजाती नोंदविण्याचे काम जनगणना आयोगाला प्रामाणिकपणे करावयाचे असेल तर  याआधी ज्या कारणांनी ते होऊ शकले नाही ती कारणे त्रास देतीलच. जातवार जनगणनेतून धोरणामध्येही लक्षणीय बदल होतील. साधनसामग्री, कायदा तसेच राजकीय गुंतागुंतही वाढेल.     harish.gupta@lokmat.com