शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

जातीनिहाय जनगणना : इरादा सोपा, कृती मात्र कठीण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 07:11 IST

जात, गोतावळा, गोत्र, आडनावे यातील संदिग्धता हा सगळ्यात मोठा अडथळा. उत्तर देणारे अनेकदा असंगत, अपुरी माहिती देतात. या गुंतागुंतीचे काय करणार?

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली

आपले टीकाकार आणि समर्थक अशा दोघांनाही आश्चर्याचा धक्का देण्याची किमया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा साधली आहे. यावेळी मुद्दा होता जातीनिहाय जनगणनेचा. अशी शेवटची जनगणना ब्रिटिश राजवटीत वर्ष १९३१ मध्ये झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात जातीनिहाय जनगणना करणे सातत्याने टाळले गेले. जनता पक्षाच्या काळात वर्ष १९८० मध्ये मंडल आयोग आणला गेला. इतर मागासवर्गीयांच्या १२५७ जाती त्यावेळी निश्चित केल्या गेल्या होत्या. मंडल आयोगाचा खरा प्रयोग १९८९-९० मध्ये झाला. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणसंस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्याची मंडल आयोगाची शिफारस पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी राबविली. काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांकडून त्याला प्रखर विरोध झाला. परिणामस्वरूप सरकारही पडले. वर्ष २०११ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने आर्थिक निकषांवर आधारलेली जनगणना केली. कल्याणकारी योजनांचा काय परिणाम होतो, याचे मूल्यमापन करण्यासाठी पुन्हा एकदा जातीनिहाय आकडेवारी गोळा केली गेली. या जनगणनेतून हजारो जाती आणि उपजाती समोर आल्या. जातींच्या उपवर्गीकरणाशी संबंधित रोहिणी आयोग नेमला गेला; परंतु या आयोगाचा अहवाल कधीच प्रसिद्ध झाला नाही. 

‘कोविड’च्या साथीमुळे वर्ष २०२१ मध्ये जनगणना लांबली. वर्ष २०२४ साठी निवडणुका व्हावयाच्या होत्या; त्यामुळे राजकीय कारणाने ती झाली नाही. आता जाती आणि उपजातींची आकडेवारी गोळा करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. याला ‘मोदी यांचा मंडल २ प्रयोग’ संबोधले जाते. आजवर जातविरहित समाजाचा पुरस्कार करत आलेल्या संघपरिवाराच्या मूळ विचारसरणीलाच या जनगणनेतून आव्हान मिळेल.  जातीनिहाय जनगणना करण्यात अनेक आव्हाने आहेत. सर्वांत पहिला मुद्दा अशा गणनेच्या कायदेशीरपणाचा येईल. विद्यमान जनगणना कायदा आणि संबंधित नियम याच्यात जातीचा उल्लेख करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्या लागतील का, हे पाहावे लागेल. 

जात, गोतावळा, गोत्र आणि आडनावे यांच्यात बरीच संदिग्धता असते, हा सगळ्यात मोठा मूलभूत अडथळा यात येतो. उत्तर देणारे अनेकदा असंगत, अपुरी माहिती देत असतात. वर्ष २०११ मध्ये आर्थिक निकषावर जातींची गणना केली गेली. दशवार्षिक गणनेपेक्षा ती स्वतंत्र होती. त्यावेळी ही सगळी गुंतागुंत लक्षात आलेली आहे. ४६  लाखांहून अधिक जातींशी संबंधित नोंदी या गणनेने समोर आणल्या. आडनावे, उपजाती, समानार्थी उल्लेख, गोतावळा, नावे या सगळ्यांचा त्या मोजणीत समावेश केला गेल्यामुळे अचूक निष्कर्ष काढणे खूपच कठीण होऊन बसले. ही माहिती स्वाभाविकच विश्वास ठेवण्याजोगी राहिली नाही. हा गोंधळ दूर करण्यासाठी नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. आर्थिक निकषांवर केलेल्या गणनेतून मिळालेली माहिती त्यांच्या नेतृत्वाखालील  गटाने तपासून पाहावयाची होती. या समितीचा अहवाल मात्र उघड करण्यात आला नाही. 

मुस्लीम, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांच्या बाबतीत ही जातवार जनगणना करावयाची किंवा कसे,  हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असेल. कारण या समाजातही जातींची अंतर्गत उतरंड आहे. धार्मिक पंथांचा समावेश, अनुसूचित जाती-जमातीबरोबरच इतर मागासवर्गीयांचा वेगळा उल्लेख, जातीय समूहांचे आणखी उपवर्गीकरण करावयाचे का? पसमंदा मुस्लिमांची गणना इतर मागासवर्गीयांत करावी अशाही मागण्या आहेत. यामुळे जात जनगणनेतून  नेमकी माहिती मिळेल का, याविषयी  साधार चिंता व्यक्त होते. इतर मागासवर्गीयांची संख्या ६० ते ६५ टक्के असताना त्यांच्याकडून संसदेत अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी होऊ शकते. नोकरी आणि शिक्षणात ४९ टक्के आरक्षणाची मर्यादा आहे; ती वाढविण्याचेही दडपण येईल. जाती आणि उपजाती नोंदविण्याचे काम जनगणना आयोगाला प्रामाणिकपणे करावयाचे असेल तर  याआधी ज्या कारणांनी ते होऊ शकले नाही ती कारणे त्रास देतीलच. जातवार जनगणनेतून धोरणामध्येही लक्षणीय बदल होतील. साधनसामग्री, कायदा तसेच राजकीय गुंतागुंतही वाढेल.     harish.gupta@lokmat.com