शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

राजकारणाची जात अन् जातीचं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:06 IST

मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर समाजातील वंचित घटकांना आरक्षण मिळाले. जातीजातींचे ध्रुवीकरण सुरू झाले आणि राजकारणाचा पोत बदलत गेला. यामुळे काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मतपेढीला ओहोटी लागली.

अवघे राजकारण आणि समाजकारण जातीभोवती केंद्रिभूत झाले असताना, अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर या गावाची प्रकर्षाने आठवण झाली. महाराष्ट्रातल्या तमाम गावांसारखं वळचणीला पडलेले गाव काही वर्षांपूर्वी एका बातमीने प्रकाशझोतात आले. या गावात जात नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. प्रत्येक रहिवाशाच्या जातीच्या रकाण्यापुढे ‘अजात’ अशी नोंद केलेली, असे वेगळेपण जपणारे हे आगळेवेगळे गाव देशातील एकमेव असावे. आता झेंडे, रंग, मोर्चे, आघाड्या, पुतळे अशा जातीपातीच्या राजकारणात हे वेगळेपण किती टिकवून ठेवले असावे, असा हा प्रश्न आहे.राजकारणात प्रभावी घटक असणारी जात कितीही झटकण्याचा प्रयत्न केला, तरी ती पुन्हा दुप्पट वेगाने तुम्हाला चिकटतेच. ईश्वरानंतरच सर्वव्यापी ठरलेल्या जातीच्या इतिहासाचा धांडोळा घेतला, तर पार बुद्धकाळापर्यंत पायपीट करावी लागते. कारण वर्णसंस्थेच्या समाज बांधणीचे काम बुद्ध काळापर्यंत संपले होते. आपल्या कौशल्यानुसार वर्णाश्रम स्थिर झाला आणि तेच उपजीविकेचे साधन बनल्याने, तो पिढीजात व्यवसाय बनल्याने जात हा घटक उदयाला आला आणि कालौघात जातीची उतरंड निर्माण होत भक्कम बनत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जातीच्या उतरंडीला जिना नसलेला मनोरा म्हणत असत.राजकारणात जात हा महत्त्वाचा घटक बनण्याची प्रक्रिया स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झाली. सत्ता या घटकाचे आकलन झाल्यानंतर ती टिकविण्यासाठी ज्या काही लांड्या-लबाड्यांना प्रारंभ झाला, त्यातून जात ही बलवान बनत गेली. त्यामुळे आज जातीच्या आधारावर मत बँका बनविणे त्याच आधारावर उमेदवार ठरविताना कोणत्याही राजकीय पक्षाला विधिनिषेध वाटत नाही. किंबहुना, जात या एकाच आधारावर निवडणुकीचे राजकारण ठरते. पूर्वी जातीपेक्षा धर्म महत्त्वाचा होता; पण आता तो दुय्यम ठरला आहे. ही स्थिती केवळ राजकारणापुरतीच मर्यादित नाही, तर समाजकारण, अर्थकारणही तिने व्यापले आहे. प्रत्येक जातीने आपली संस्कृती निश्चित केली.

जात संपविण्यासाठी प्रयत्नही झाले. दक्षिणेतील द्रविड चळवळ, महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ, एक गाव एक पाणवठा, आंतरजातीय विवाह चळवळ, उत्तरेतील ‘जनेऊ तोडो आंदोलन’, अशा चळवळींनी सत्तरच्या दशकापर्यंत सामाजिक घुसळण केली होती; परंतु पुढे मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर समाजातील वंचित घटकांना आरक्षण मिळाले आणि जातीजातींचे ध्रुवीकरण सुरू झाले व राजकारणाचा पोत बदलत गेला. यामुळे काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मतपेढीला ओहोटी लागली आणि या पक्षांचा सत्तेतील टक्का कमी होत गेला.
पुढे खुल्या अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे सगळी चौकटच खिळखिळी झाली. याच वेळी उजव्या विचारसरणीच्या भाजपसारख्या पक्षांनी उचल खाल्ली आणि राममंदिराचे राजकारण केंद्रबिंदू बनले. या आंदोलनाने धर्म हा महत्त्वाचा घटक राजकारणात बनला. सर्वधर्म समभाव ही संकल्पना हळूहळू अडगळीत पडल्याने, छोट्या-छोट्या जाती वेगाने संघटित झाल्या आणि आपल्या जातीच्या हिताचे रक्षण हा त्यांचा प्राधान्यक्रम झाला. संख्याबळाच्या जोरावर उघडउघड राजकीय सौदेबाजी सुरू झाली. यातूनच जातींचे संघटन वेगवान बनले आणि निवडणुकीत जात महत्त्वाची बनली. तिने समाजजीवन उद्ध्वस्त केले. यातूनच स्थलांतर आणि शहरीकरणाला मदत झाली. अल्पसंख्य जातींना चेहरा नसणारे शहर सुरक्षित वाटायला लागले.
एके काळी आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात ‘ऑनर किलिंग’च्या घडणाऱ्या घटनाच जातीच्या प्राबल्याचे निर्देश आहेत. मराठा आंदोलनाच्या मोर्चानंतर तर जातीय ध्रुवीकरण वेगाने घडले आणि केवळ आरक्षण या मुद्द्यावर ब्राह्मणांसह सर्वच जातींनी मोर्चे काढले. जातीच्या आधारावर समाज एकवटणे म्हणजे, एक प्रकारचे सामाजिक अध:पतनच म्हणता येईल. या अध:पतनाच्या कडेलोटापर्यंत फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आला आहे. वारकरी संप्रदायाच्या सर्वसमावेशक विचारधारेवर परिपोष झालेल्या महाराष्ट्राची ही अवस्था आहे आणि हे सगळे केवळ सत्तेसाठी, सत्तेचा हा अट्टहास आणखी कोणत्या गर्तेत लोटणार?

टॅग्स :PoliticsराजकारणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा