शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

बुलेट ट्रेन की वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 09:48 IST

बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाचा आहेच; पण विदर्भाच्या विकासासाठी नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य द्यावे की बुलेट ट्रेनला, हा विचार निश्चितपणे झाला पाहिजे.

- प्रा. डॉ. संजय खडक्कार (माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ)

आजच्या परिस्थितीत विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्दैवाने अजून थांबल्या नाहीत. प्रामुख्याने त्या पश्चिम विदर्भात घडताना दिसतात. जानेवारी २०२२ पासून पाच महिन्यांत अकोला जिल्ह्यातील ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याचे प्रामुख्याने मुख्य कारण सिंचनाचा अभाव.

१९९४ च्या निर्देशांक व अनुशेष समितीच्या अहवालानुसार अजून विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष १.६० लक्ष हेक्टर बाकी आहे. हा अनुशेष प्रामुख्याने पश्चिम विदर्भाचा आहे. १९९४ नंतर महाराष्ट्रात विभागवार सिंचनाचा तुलनात्मक अभ्यास झालेला नाही. सिंचन विभाग दरवर्षी सरासरीने जास्तीत जास्त दहा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणते. त्यातून १५ ते २० टक्केच सिंचनाचे उद्दिष्ट साध्य होत आहे. या अनुषंगाने अजून पंधरा वर्षे तरी सिंचनाचा अनुशेष दूर होईल, असे दिसत नाही. 

वैनगंगा- नळगंगा नदीजोड योजना ही गोसी खुर्द प्रकल्पांतर्गत उपखोऱ्यातील शिल्लक पाण्यापासून साकार होऊ शकते. दरवर्षी वैनगंगातून गोसी खुर्दमध्ये आलेले पाणी पुढे वाहून जाते, यावर हा प्रकल्प होऊ शकतो. पूर्व विदर्भात वैनगंगा खोऱ्यातील ११७ टीएमसी पाण्यापैकी केवळ ५७ टीएमसी पाणी अडवले आहे व उर्वरित ६० टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पांतर्गत ४७८ किलोमीटर पाइपद्वारे बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा नदी सोडल्यास अमरावती विभागाच्या आर्थिक प्रगतीसाठी ते वरदान ठरेल. या प्रकल्पामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांतील गावांना फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्षपणे १० लाखांच्यावर विदर्भातील जनतेला व १५ लाखांच्यावर लोकांना अप्रत्यक्षपणे फायदा होऊ शकेल. जवळपास ४.५ लक्ष हेक्टर सिंचन या प्रकल्पाने अपेक्षित आहे. विदर्भातील सुमारे १० हजारांपेक्षा जास्त गावांना या प्रकल्पामुळे पिण्याचे पाणी मिळेल. 

एकीकडे महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होत आहे; पण तो असमतोलतेकडे झुकलेला आहे. अमरावती विभाग हा महाराष्ट्रात सर्वात ‘गरीब’ विभाग म्हणून गणला जातो. अमरावती विभाग कृषिप्रधान विभाग आहे. वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प हा येथील विभागाच्या आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक बाब आहे. या प्रकल्पाची लांबी ४७८ किलोमीटर आहे. प्रकल्पाचा खर्च आजच्या स्थितीला ६५ हजार कोटी रुपये आहे. म्हणजेच संपूर्ण प्रकल्पाला अंदाजे १५० कोटी रुपये प्रति किलोमीटर पाणी वाहिनीचा खर्च अपेक्षित आहे.

आज प्रस्तावित मुंबई -नागपूर बुलेट ट्रेनचा खर्च २३० कोटी रुपये प्रति किलोमीटर इतका अपेक्षित आहे. येथे नमूद करावेसे वाटते की वाहतुकीसाठी नागपूर- मुंबई हा चार पदरी राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आहे. तसेच नागपूर- मुंबई समृद्धी एक्स्प्रेस हायवेचे कामही जोरात चालू आहे. समृद्धी महामार्गाचा खर्च जवळपास ५५ हजार कोटी रुपये अपेक्षित आहे. बुलेट ट्रेनमुळे नागपूर-मुंबई प्रवास चार ते पाच तासांत पूर्ण होईल.  पण आता समृद्धी महामार्ग असताना वाहतुकीसाठी बुलेट ट्रेन कशाला, हा प्रश्न जनसामान्यांच्या मनात आहे. या बुलेट ट्रेनचा अंदाजे खर्च १.३ लाख कोटी रुपये आहे. हा प्रकल्प महत्त्वाचा आहे; पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, विदर्भाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य द्यावे की बुलेट ट्रेनला, हा विचार निश्चितपणे झाला पाहिजे.

टॅग्स :riverनदी