शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

बैल गेला आणि...

By admin | Updated: December 13, 2015 23:02 IST

राजधानी दिल्लीतील प्रदूषण हा काही आजच समोर आलेला आणि भेडसावणारा प्रश्न नव्हे. भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेतील दिल्लीतला सामना खेळण्यास पाहुण्यांनी नकार दिला

राजधानी दिल्लीतील प्रदूषण हा काही आजच समोर आलेला आणि भेडसावणारा प्रश्न नव्हे. भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेतील दिल्लीतला सामना खेळण्यास पाहुण्यांनी नकार दिला त्यालाही आता बरीच वर्षे लोटून गेली. पण आता बहुधा साऱ्यांनाच खडबडून जाग आलेली दिसते. आधी ती दिल्ली सरकारला आली आणि त्या सरकारने नववर्ष दिनापासून सम आणि विषम क्रमांकाच्या मोटारी आलटून पालटून राजधानीच्या रस्त्यांवर धावतील असे फर्मान काढले. त्यावर टीका होऊ लागल्यानंतर हे निर्बंध केवळ सकाळी आठ ते रात्री आठपर्यंतच अंमलात राहतील असे जाहीर केले. दरम्यान बंगळुरूच्या अभियांत्रिकी संस्थेने असे जाहीर केले की, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला स्वयंचलित दुचाकी वाहनेच मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. अर्थात त्यांना दिल्ली बंद करण्याची मागणी मात्र अद्याप कुणी केली नाही. दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकारच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आणि त्या उपायाने काहीही होणार नाही असा निष्कर्ष काढून एक वेगळाच उपाय सुचविला. या उपायानुसार दिल्ली शहरात एकाही नवीन डिझेल वाहनाची नोंदणी करायची नाही आणि आधीच नोंदणी झालेल्या वाहनांचे दहा वर्षांनंतर केले जाणारे नूतनीकरण पूर्णपणे बंद करायचे. याचा थोडक्यात अर्थ सर्व वाहन प्रकारांमध्ये डिझेलवर चालणारी वाहने सर्वाधिक प्रदूषणकारी असतात. खरे तर हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही. परंतुु नव्वदनंतर देशात मुक्ततेचे जे धोरण अंमलात येण्यास सुरुवात झाली आणि मोटार निर्मिती व्यवसायातील अनेक परदेशी कंपन्या भारतात आल्या तेव्हाच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीवर बंधने लागू करावयास हवी होती. तसे झाले नाही कारण सारे काही मुक्त. मालवाहतुकीसाठी पेट्रोलवर चालणारी वाहने परवडत नसल्याने त्याबाबत काही करता येणे अशक्यच होते. पण किमान आरामदायी मोटारींच्या निर्मितीबाबत तरी हात आखडता घ्यावयास हवा होता. तसे न झाल्याने डिझेलवर चालणाऱ्या ऐषोआरामी गाड्यांचा सुळसुळाट झाला. एकीकडे या मोटारी प्रदूषणात भर टाकीत असतानाच डिझेलवरील अनुदानदेखील फस्त करीत होत्या. आजही डिझेलच्या किमतीची सांगड सरकार आंतरराष्ट्रीय दराशी घालू शकत नाही कारण त्याचा संबंध थेट महागाईशी असतो. डिझेल वाढले तर वाहतुकीचे दर वाढून साऱ्या वस्तू महाग होतात म्हणून तसे करता येत नाही. पण त्याचा गैरफायदा मात्र भलतेच लोक घेत असतात.