शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

भाजपाची युतीची धडपड लोकसभेसाठी!

By यदू जोशी | Published: April 16, 2018 12:35 AM

काहीही करून लोकसभा निवडणुकीत युती झाली पाहिजे म्हणून भाजपाची धडपड चाललेली दिसते. विधानसभेत युती झाली तर दोन्ही बाजूंच्या ३०-३५ आमदारांना घरी बसावे लागेल. दोघांनाही ते परवडणार नाही.

शिवसेनेबरोबर युतीसाठी आसुललेली भाजपा आणि भाजपाची आॅफर पार धुडकावणारी शिवसेना असे सध्याचे चित्र आहे. मोदी सरकारला आधी लोकसभेच्या परीक्षेला बसायचे आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी ४८ खासदार देणारे महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. गेल्यावेळी युती होती आणि तब्बल $४१ जागा युतीने जिंकल्या होत्या. काँग्रेस २, राष्ट्रवादी ४ आणि स्वाभिमानी पक्ष १ असे बलाबल होते. भाजपा आता जो काही युतीसाठी मोठा आग्रह धरत आहे तो लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांची ही धडपड आहे. कारण एकदा लोकसभेचे मैदान मारले की मग उद्या विधानसभा स्वबळावर लढूनही सर्वाधिक जागा आपल्याच येणार हा भाजपाचा होरा असणार.लोकसभेसाठी आपली साथ घेतील आणि विधानसभेला वाऱ्यावर सोडतील. विधानसभेत भाजपाला आपल्यापेक्षा अधिक जागा मिळाल्या तर पुन्हा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा असेल. आपल्याला परत एकदा दुय्यम भूमिकेत राहावे लागेल ही खरी मातोश्रीची चिंता असणार. आधी लोकसभेचे जागावाटप करू, असा पवित्रा भाजपा घेईल पण लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागावाटपाचा सातबारा लिहा असा शिवसेनेचा आग्रह असेल. काँग्रेस-राष्ट्रवादी हे युतीपेक्षा मनाने आजतरी एकमेकांच्या जवळ गेलेले आहेत. मोदींविरोधी केंद्रातील राजकारणाचे नेतृत्व शरद पवार करू पाहत आहेत. त्यामुळे दोघे एकत्रितपणे निवडणूक लढण्यात फार अडचण दिसत नाही. फक्त राष्ट्रवादीचा जन्मापासून राग करणाºया काँग्रेसच्या एकदोन नेत्यांना आघाडीबाबत चर्चेच्या वेळी थंड हवेच्या ठिकाणी पाठवावे लागेल. लोकसभेच्या जागा वाटपात भाजपा-शिवसेनेचे जमेल. कारण, गेल्यावेळच्या वाटपाचा फॉर्म्युला तयार आहे. फारतर दोनतीन जागांची अदलाबदल होऊ शकेल. युतीमध्ये वादळ येईल ते विधानसभेच्या जागा वाटपावेळी. युतीचे किमान ३०-३५ आमदार असे आहेत की जे भाजपा वा शिवसेनेच्या २०१४ मध्ये असलेल्या आमदारांना पराभूत करून जिंकले होते. नागपूर, नाशिक, पुणे ही अशी काही शहरे आहेत जिथे भाजपाने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. तेथील तिढा सोडवताना दमछाक होईल.त्यामुळे लोकसभेत एकी आणि विधानसभेत बेकी असेच पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या वेळी एकत्र नांदतील आणि विधानसभेच्य वेळी युती तोडल्याचे खापर एकमेकांवर फोडतील.जाता जाता : राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक या महिनाअखेर निवृत्त होत आहेत. प्रामाणिक सेवेचा आदर्श त्यांनी आपल्या दीर्घ प्रशासकीय सेवेत निर्माण केला आणि निवृत्तीपर्यंत जपला. पत्नीला शासकीय गाडी वापरू न देणारा आणि आलेल्या गिफ्ट कार्यालयातील कर्मचाºयांना वाटून देणारा हा निराळा अधिकारी. ते मूळ पश्चिम बंगालचे. त्यांचे वडीलही मुख्य सचिव राहिले आणि प्रामाणिकपणाला पर्यायी शब्द म्हणून त्यांचे नाव घेतले जाई. त्यांच्या घराण्याचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते हे फार कमी जणांना माहिती असेल. संवेदनशील मनाचे सुमित मलिक उत्तम लेखकही आहेत. आता ते राज्याचे मुख्य माहिती आयुक्त होत आहेत. त्यांना खूप शुभेच्छा. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक