शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

भवानीदास आणि अंबादास दंग; ऐनवेळी रंगाचा केला भंग

By सुधीर महाजन | Updated: August 8, 2019 19:10 IST

दोन्ही उमेदवारांनी स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणूक लढविण्याचे पत्रक जाहीर करून मतांचे दलाल आणि मतदार यांची पंचाईत केली.

- सुधीर महाजन

भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी आणि अंबादास दानवे या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांनी स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणूक लढविण्याचे पत्रक जाहीर करून मतांचे दलाल आणि मतदार यांचीच पंचाईत केली. पंगतीत आशेने बसलेल्यांच्या पात्रावर वाढायचेच नाही, असा हा प्रकार आहे. खरे तर ‘याचसाठी केला होता अट्टहास’ आणि आता हे यजमानच तोंडचा घास काढत आहेत. विधान परिषदेची ही निवडणूक घोडेबाजारासाठी प्रसिद्ध; पण या दोघांनीही खोगीर ऐन मोक्याला काढून घेतल्याने आता या निवडणुकीत कोणता रंग भरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीतील घोडेबाजाराच्या बातम्या चवीने चघळल्या जात होत्या. काही नेते आपल्याकडील ‘गठ्ठा’ मतांची बोली वाढवत होते. त्यावेळी या दोघांनी अवसानघात केला. 

औरंगाबाद- जालना या दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या निवडणुकीत सध्या तरी शिवसेना-भाजप यांच्यातच कुरघोडी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी हे पक्षासाठी एकनिष्ठ असलेले. अंबड नगरपालिकेच्या राजकारणातील सक्रिय, तर शिवसेनेचे अंबादास दानवे हे जिल्हाप्रमुख अगदी खासदारकीपासून ते आमदारकीपर्यंत सगळ्याच पदांसाठी दावा सांगणारे. अर्जुन खोतकरांना बाजूला सारून त्यांना सेनेने उमेदवारी दिली ती पक्षनिष्ठा या गुणांवर. नसता या उमेदवारीसाठी अनेक जण बाशिंग बांधून तयार होते. ६५७ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. पक्षीय बलाबलाचा विचार केला, तर भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १६९, राष्ट्रवादी ८७, एमआयएम २८, अपक्ष ४५, अशी स्थिती असताना सेना-भाजप युती म्हणून दानवेंसाठी ही निवडणूक वरकरणी सोपी दिसते; पण या दोन पक्षांतील रुसव्या-फुगव्यांचे राजकारण कोणते वळण घेते, यावर बरेच काही अवलंबून आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेस सोबत, तर जालना जि.प.मध्ये राष्ट्रवादीशी गाठ बांधून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. औरंगाबादमधील काँग्रेसशी नाते तोडा, या मुद्यावर भाजप अडून बसली. त्यामुळे दानवे वेगळी मोट बांधण्याच्या प्रयत्नात दिसतात. आ. अब्दुल सत्तार यांनी काँगे्रस पक्ष सोडला असला तरी किमान ५० मते त्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे काल दानवे सत्तार यांची भेट झाली. सत्तार सध्या भाजपमध्ये प्रवेशासाठी धडपडत आहेत. २० आॅगस्ट रोजी भाजपची महाजनादेश यात्रा सिल्लोडला येणार असल्याने त्याच मुहूर्तावर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे, असे घडले तर ते आपले वजन भाजपकडेच टाकतील.

इकडे कॉंग्रेसचे बाबूराव कुलकर्णीसुद्धा जमवाजमवीत मागे नाहीत. एमआयएम, अपक्षांकडे त्यांचे प्रयत्न आहेत. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात प्रथमच ही उमेदवारी मिळाल्याने गणित बदलू शकते. १९९९ साली अब्दुल सत्तार, २००७ साली भाजपचे किशन तनवाणी, तर २०१३ साली काँग्रेसचे सुभाष झांबड यापूर्वी विजयी झाले होते. पक्षनिहाय बलाबलाचा विचार केला, तर वर म्हटल्याप्रमाणे समीकरण मांडले जाऊ शकते; परंतु या निवडणुकीत पक्षनिष्ठा ही अतिशय दुय्यम आहे. त्यापेक्षा ‘लक्ष्मीनिष्ठा’ नेहमीच प्रभावी ठरते. कारण नगरसेवक, जि.प. सदस्य, अशा मतदारांच्या अल्पायुषी राजकीय कारकीर्दीत अना मणिकांचन योग दुर्लभ येतो. त्यामुळे हा योग साधण्याची सगळ्यांची घाई असते. काही नेत्यांकडे आपले निष्ठावान मतदार असतात. त्यासाठी नेत्यांसमवेत मांडवली करावी लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत खर्चावर बंधन नसल्याने घोडेबाजार तेजीत असतो. शिवाय प्रवास, देवदर्शन, रिसॉर्टमधील ऐशोआराम, असाही अतिरिक्त लाभ मतदारांच्या पदरात अलगद पडतो. गेल्या निवडणुकीत दिलेली ‘लक्ष्मी’ पावली की नाही, याची पडताळणी घेण्यासाठी एका उमेदवाराने आपल्या मतदारांना कॅमेरा असलेले पेन मतदानासाठी दिले होते. हा एक वादाचा मुद्दा घडला होता. आता तंत्रज्ञानाचाही वेगाने विकास झाला आहे. त्यामुळे उमेदवार मत पदरात पाडून घेण्यासाठी काय क्लृप्त्या लढवतात, ही माहिती रंजक असेल. सेना-भाजप युतीचे तळयात-मळ्यात असल्याने बाबूराव कुलकर्णी काय चमत्कार दाखवतात, हे पाहावे लागेल. नाही तरी म्हाताऱ्याला संधी हवीच आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसVidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक