शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
2
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
3
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
4
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
5
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
6
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
7
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
8
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
9
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
10
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
11
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
12
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
13
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
14
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
15
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
16
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
17
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
18
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
19
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
20
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भवानीदास आणि अंबादास दंग; ऐनवेळी रंगाचा केला भंग

By सुधीर महाजन | Updated: August 8, 2019 19:10 IST

दोन्ही उमेदवारांनी स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणूक लढविण्याचे पत्रक जाहीर करून मतांचे दलाल आणि मतदार यांची पंचाईत केली.

- सुधीर महाजन

भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी आणि अंबादास दानवे या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांनी स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणूक लढविण्याचे पत्रक जाहीर करून मतांचे दलाल आणि मतदार यांचीच पंचाईत केली. पंगतीत आशेने बसलेल्यांच्या पात्रावर वाढायचेच नाही, असा हा प्रकार आहे. खरे तर ‘याचसाठी केला होता अट्टहास’ आणि आता हे यजमानच तोंडचा घास काढत आहेत. विधान परिषदेची ही निवडणूक घोडेबाजारासाठी प्रसिद्ध; पण या दोघांनीही खोगीर ऐन मोक्याला काढून घेतल्याने आता या निवडणुकीत कोणता रंग भरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीतील घोडेबाजाराच्या बातम्या चवीने चघळल्या जात होत्या. काही नेते आपल्याकडील ‘गठ्ठा’ मतांची बोली वाढवत होते. त्यावेळी या दोघांनी अवसानघात केला. 

औरंगाबाद- जालना या दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या निवडणुकीत सध्या तरी शिवसेना-भाजप यांच्यातच कुरघोडी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी हे पक्षासाठी एकनिष्ठ असलेले. अंबड नगरपालिकेच्या राजकारणातील सक्रिय, तर शिवसेनेचे अंबादास दानवे हे जिल्हाप्रमुख अगदी खासदारकीपासून ते आमदारकीपर्यंत सगळ्याच पदांसाठी दावा सांगणारे. अर्जुन खोतकरांना बाजूला सारून त्यांना सेनेने उमेदवारी दिली ती पक्षनिष्ठा या गुणांवर. नसता या उमेदवारीसाठी अनेक जण बाशिंग बांधून तयार होते. ६५७ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. पक्षीय बलाबलाचा विचार केला, तर भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १६९, राष्ट्रवादी ८७, एमआयएम २८, अपक्ष ४५, अशी स्थिती असताना सेना-भाजप युती म्हणून दानवेंसाठी ही निवडणूक वरकरणी सोपी दिसते; पण या दोन पक्षांतील रुसव्या-फुगव्यांचे राजकारण कोणते वळण घेते, यावर बरेच काही अवलंबून आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेस सोबत, तर जालना जि.प.मध्ये राष्ट्रवादीशी गाठ बांधून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. औरंगाबादमधील काँग्रेसशी नाते तोडा, या मुद्यावर भाजप अडून बसली. त्यामुळे दानवे वेगळी मोट बांधण्याच्या प्रयत्नात दिसतात. आ. अब्दुल सत्तार यांनी काँगे्रस पक्ष सोडला असला तरी किमान ५० मते त्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे काल दानवे सत्तार यांची भेट झाली. सत्तार सध्या भाजपमध्ये प्रवेशासाठी धडपडत आहेत. २० आॅगस्ट रोजी भाजपची महाजनादेश यात्रा सिल्लोडला येणार असल्याने त्याच मुहूर्तावर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे, असे घडले तर ते आपले वजन भाजपकडेच टाकतील.

इकडे कॉंग्रेसचे बाबूराव कुलकर्णीसुद्धा जमवाजमवीत मागे नाहीत. एमआयएम, अपक्षांकडे त्यांचे प्रयत्न आहेत. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात प्रथमच ही उमेदवारी मिळाल्याने गणित बदलू शकते. १९९९ साली अब्दुल सत्तार, २००७ साली भाजपचे किशन तनवाणी, तर २०१३ साली काँग्रेसचे सुभाष झांबड यापूर्वी विजयी झाले होते. पक्षनिहाय बलाबलाचा विचार केला, तर वर म्हटल्याप्रमाणे समीकरण मांडले जाऊ शकते; परंतु या निवडणुकीत पक्षनिष्ठा ही अतिशय दुय्यम आहे. त्यापेक्षा ‘लक्ष्मीनिष्ठा’ नेहमीच प्रभावी ठरते. कारण नगरसेवक, जि.प. सदस्य, अशा मतदारांच्या अल्पायुषी राजकीय कारकीर्दीत अना मणिकांचन योग दुर्लभ येतो. त्यामुळे हा योग साधण्याची सगळ्यांची घाई असते. काही नेत्यांकडे आपले निष्ठावान मतदार असतात. त्यासाठी नेत्यांसमवेत मांडवली करावी लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत खर्चावर बंधन नसल्याने घोडेबाजार तेजीत असतो. शिवाय प्रवास, देवदर्शन, रिसॉर्टमधील ऐशोआराम, असाही अतिरिक्त लाभ मतदारांच्या पदरात अलगद पडतो. गेल्या निवडणुकीत दिलेली ‘लक्ष्मी’ पावली की नाही, याची पडताळणी घेण्यासाठी एका उमेदवाराने आपल्या मतदारांना कॅमेरा असलेले पेन मतदानासाठी दिले होते. हा एक वादाचा मुद्दा घडला होता. आता तंत्रज्ञानाचाही वेगाने विकास झाला आहे. त्यामुळे उमेदवार मत पदरात पाडून घेण्यासाठी काय क्लृप्त्या लढवतात, ही माहिती रंजक असेल. सेना-भाजप युतीचे तळयात-मळ्यात असल्याने बाबूराव कुलकर्णी काय चमत्कार दाखवतात, हे पाहावे लागेल. नाही तरी म्हाताऱ्याला संधी हवीच आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसVidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक