शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

भवानीदास आणि अंबादास दंग; ऐनवेळी रंगाचा केला भंग

By सुधीर महाजन | Updated: August 8, 2019 19:10 IST

दोन्ही उमेदवारांनी स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणूक लढविण्याचे पत्रक जाहीर करून मतांचे दलाल आणि मतदार यांची पंचाईत केली.

- सुधीर महाजन

भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी आणि अंबादास दानवे या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांनी स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणूक लढविण्याचे पत्रक जाहीर करून मतांचे दलाल आणि मतदार यांचीच पंचाईत केली. पंगतीत आशेने बसलेल्यांच्या पात्रावर वाढायचेच नाही, असा हा प्रकार आहे. खरे तर ‘याचसाठी केला होता अट्टहास’ आणि आता हे यजमानच तोंडचा घास काढत आहेत. विधान परिषदेची ही निवडणूक घोडेबाजारासाठी प्रसिद्ध; पण या दोघांनीही खोगीर ऐन मोक्याला काढून घेतल्याने आता या निवडणुकीत कोणता रंग भरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीतील घोडेबाजाराच्या बातम्या चवीने चघळल्या जात होत्या. काही नेते आपल्याकडील ‘गठ्ठा’ मतांची बोली वाढवत होते. त्यावेळी या दोघांनी अवसानघात केला. 

औरंगाबाद- जालना या दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या निवडणुकीत सध्या तरी शिवसेना-भाजप यांच्यातच कुरघोडी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी हे पक्षासाठी एकनिष्ठ असलेले. अंबड नगरपालिकेच्या राजकारणातील सक्रिय, तर शिवसेनेचे अंबादास दानवे हे जिल्हाप्रमुख अगदी खासदारकीपासून ते आमदारकीपर्यंत सगळ्याच पदांसाठी दावा सांगणारे. अर्जुन खोतकरांना बाजूला सारून त्यांना सेनेने उमेदवारी दिली ती पक्षनिष्ठा या गुणांवर. नसता या उमेदवारीसाठी अनेक जण बाशिंग बांधून तयार होते. ६५७ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. पक्षीय बलाबलाचा विचार केला, तर भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १६९, राष्ट्रवादी ८७, एमआयएम २८, अपक्ष ४५, अशी स्थिती असताना सेना-भाजप युती म्हणून दानवेंसाठी ही निवडणूक वरकरणी सोपी दिसते; पण या दोन पक्षांतील रुसव्या-फुगव्यांचे राजकारण कोणते वळण घेते, यावर बरेच काही अवलंबून आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेस सोबत, तर जालना जि.प.मध्ये राष्ट्रवादीशी गाठ बांधून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. औरंगाबादमधील काँग्रेसशी नाते तोडा, या मुद्यावर भाजप अडून बसली. त्यामुळे दानवे वेगळी मोट बांधण्याच्या प्रयत्नात दिसतात. आ. अब्दुल सत्तार यांनी काँगे्रस पक्ष सोडला असला तरी किमान ५० मते त्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे काल दानवे सत्तार यांची भेट झाली. सत्तार सध्या भाजपमध्ये प्रवेशासाठी धडपडत आहेत. २० आॅगस्ट रोजी भाजपची महाजनादेश यात्रा सिल्लोडला येणार असल्याने त्याच मुहूर्तावर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे, असे घडले तर ते आपले वजन भाजपकडेच टाकतील.

इकडे कॉंग्रेसचे बाबूराव कुलकर्णीसुद्धा जमवाजमवीत मागे नाहीत. एमआयएम, अपक्षांकडे त्यांचे प्रयत्न आहेत. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात प्रथमच ही उमेदवारी मिळाल्याने गणित बदलू शकते. १९९९ साली अब्दुल सत्तार, २००७ साली भाजपचे किशन तनवाणी, तर २०१३ साली काँग्रेसचे सुभाष झांबड यापूर्वी विजयी झाले होते. पक्षनिहाय बलाबलाचा विचार केला, तर वर म्हटल्याप्रमाणे समीकरण मांडले जाऊ शकते; परंतु या निवडणुकीत पक्षनिष्ठा ही अतिशय दुय्यम आहे. त्यापेक्षा ‘लक्ष्मीनिष्ठा’ नेहमीच प्रभावी ठरते. कारण नगरसेवक, जि.प. सदस्य, अशा मतदारांच्या अल्पायुषी राजकीय कारकीर्दीत अना मणिकांचन योग दुर्लभ येतो. त्यामुळे हा योग साधण्याची सगळ्यांची घाई असते. काही नेत्यांकडे आपले निष्ठावान मतदार असतात. त्यासाठी नेत्यांसमवेत मांडवली करावी लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत खर्चावर बंधन नसल्याने घोडेबाजार तेजीत असतो. शिवाय प्रवास, देवदर्शन, रिसॉर्टमधील ऐशोआराम, असाही अतिरिक्त लाभ मतदारांच्या पदरात अलगद पडतो. गेल्या निवडणुकीत दिलेली ‘लक्ष्मी’ पावली की नाही, याची पडताळणी घेण्यासाठी एका उमेदवाराने आपल्या मतदारांना कॅमेरा असलेले पेन मतदानासाठी दिले होते. हा एक वादाचा मुद्दा घडला होता. आता तंत्रज्ञानाचाही वेगाने विकास झाला आहे. त्यामुळे उमेदवार मत पदरात पाडून घेण्यासाठी काय क्लृप्त्या लढवतात, ही माहिती रंजक असेल. सेना-भाजप युतीचे तळयात-मळ्यात असल्याने बाबूराव कुलकर्णी काय चमत्कार दाखवतात, हे पाहावे लागेल. नाही तरी म्हाताऱ्याला संधी हवीच आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसVidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक