शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

भवानीदास आणि अंबादास दंग; ऐनवेळी रंगाचा केला भंग

By सुधीर महाजन | Updated: August 8, 2019 19:10 IST

दोन्ही उमेदवारांनी स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणूक लढविण्याचे पत्रक जाहीर करून मतांचे दलाल आणि मतदार यांची पंचाईत केली.

- सुधीर महाजन

भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी आणि अंबादास दानवे या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांनी स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणूक लढविण्याचे पत्रक जाहीर करून मतांचे दलाल आणि मतदार यांचीच पंचाईत केली. पंगतीत आशेने बसलेल्यांच्या पात्रावर वाढायचेच नाही, असा हा प्रकार आहे. खरे तर ‘याचसाठी केला होता अट्टहास’ आणि आता हे यजमानच तोंडचा घास काढत आहेत. विधान परिषदेची ही निवडणूक घोडेबाजारासाठी प्रसिद्ध; पण या दोघांनीही खोगीर ऐन मोक्याला काढून घेतल्याने आता या निवडणुकीत कोणता रंग भरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीतील घोडेबाजाराच्या बातम्या चवीने चघळल्या जात होत्या. काही नेते आपल्याकडील ‘गठ्ठा’ मतांची बोली वाढवत होते. त्यावेळी या दोघांनी अवसानघात केला. 

औरंगाबाद- जालना या दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या निवडणुकीत सध्या तरी शिवसेना-भाजप यांच्यातच कुरघोडी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी हे पक्षासाठी एकनिष्ठ असलेले. अंबड नगरपालिकेच्या राजकारणातील सक्रिय, तर शिवसेनेचे अंबादास दानवे हे जिल्हाप्रमुख अगदी खासदारकीपासून ते आमदारकीपर्यंत सगळ्याच पदांसाठी दावा सांगणारे. अर्जुन खोतकरांना बाजूला सारून त्यांना सेनेने उमेदवारी दिली ती पक्षनिष्ठा या गुणांवर. नसता या उमेदवारीसाठी अनेक जण बाशिंग बांधून तयार होते. ६५७ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. पक्षीय बलाबलाचा विचार केला, तर भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १६९, राष्ट्रवादी ८७, एमआयएम २८, अपक्ष ४५, अशी स्थिती असताना सेना-भाजप युती म्हणून दानवेंसाठी ही निवडणूक वरकरणी सोपी दिसते; पण या दोन पक्षांतील रुसव्या-फुगव्यांचे राजकारण कोणते वळण घेते, यावर बरेच काही अवलंबून आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेस सोबत, तर जालना जि.प.मध्ये राष्ट्रवादीशी गाठ बांधून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. औरंगाबादमधील काँग्रेसशी नाते तोडा, या मुद्यावर भाजप अडून बसली. त्यामुळे दानवे वेगळी मोट बांधण्याच्या प्रयत्नात दिसतात. आ. अब्दुल सत्तार यांनी काँगे्रस पक्ष सोडला असला तरी किमान ५० मते त्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे काल दानवे सत्तार यांची भेट झाली. सत्तार सध्या भाजपमध्ये प्रवेशासाठी धडपडत आहेत. २० आॅगस्ट रोजी भाजपची महाजनादेश यात्रा सिल्लोडला येणार असल्याने त्याच मुहूर्तावर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे, असे घडले तर ते आपले वजन भाजपकडेच टाकतील.

इकडे कॉंग्रेसचे बाबूराव कुलकर्णीसुद्धा जमवाजमवीत मागे नाहीत. एमआयएम, अपक्षांकडे त्यांचे प्रयत्न आहेत. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात प्रथमच ही उमेदवारी मिळाल्याने गणित बदलू शकते. १९९९ साली अब्दुल सत्तार, २००७ साली भाजपचे किशन तनवाणी, तर २०१३ साली काँग्रेसचे सुभाष झांबड यापूर्वी विजयी झाले होते. पक्षनिहाय बलाबलाचा विचार केला, तर वर म्हटल्याप्रमाणे समीकरण मांडले जाऊ शकते; परंतु या निवडणुकीत पक्षनिष्ठा ही अतिशय दुय्यम आहे. त्यापेक्षा ‘लक्ष्मीनिष्ठा’ नेहमीच प्रभावी ठरते. कारण नगरसेवक, जि.प. सदस्य, अशा मतदारांच्या अल्पायुषी राजकीय कारकीर्दीत अना मणिकांचन योग दुर्लभ येतो. त्यामुळे हा योग साधण्याची सगळ्यांची घाई असते. काही नेत्यांकडे आपले निष्ठावान मतदार असतात. त्यासाठी नेत्यांसमवेत मांडवली करावी लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत खर्चावर बंधन नसल्याने घोडेबाजार तेजीत असतो. शिवाय प्रवास, देवदर्शन, रिसॉर्टमधील ऐशोआराम, असाही अतिरिक्त लाभ मतदारांच्या पदरात अलगद पडतो. गेल्या निवडणुकीत दिलेली ‘लक्ष्मी’ पावली की नाही, याची पडताळणी घेण्यासाठी एका उमेदवाराने आपल्या मतदारांना कॅमेरा असलेले पेन मतदानासाठी दिले होते. हा एक वादाचा मुद्दा घडला होता. आता तंत्रज्ञानाचाही वेगाने विकास झाला आहे. त्यामुळे उमेदवार मत पदरात पाडून घेण्यासाठी काय क्लृप्त्या लढवतात, ही माहिती रंजक असेल. सेना-भाजप युतीचे तळयात-मळ्यात असल्याने बाबूराव कुलकर्णी काय चमत्कार दाखवतात, हे पाहावे लागेल. नाही तरी म्हाताऱ्याला संधी हवीच आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसVidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक