शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्याचे स्तोत्रकार

By admin | Updated: August 4, 2016 05:26 IST

कला आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अभेद्य नाते आहे. सौंदर्याची अनुभूती आणि त्याच्याही पुढे जाऊन सौंदर्याचा आविष्कार म्हणूनच कलेकडे पाहावे लागेल.

कला आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अभेद्य नाते आहे. सौंदर्याची अनुभूती आणि त्याच्याही पुढे जाऊन सौंदर्याचा आविष्कार म्हणूनच कलेकडे पाहावे लागेल. या विश्वात जर कोणती रचना नसती, सुसंगती नसती तर माणूस अस्वस्थ झाला असता. त्यामुळे कुठे व्यवस्था, रचना, तालबद्धता, सुसंगती दिसली की, तो आनंदित होतो आणि या विसंगत जीवनात आपल्याही प्रतिभेप्रमाणे काही रचना करावी, सुसंगती निर्मावी असे त्याला वाटते. त्याच्या या आर्त इच्छाशक्तीतूनच मानवी संस्कृतीचा आणि त्याच्या पुढे सर्व कलांचा जन्म झाला. कलावंत हे निसर्गाच्या सौंदर्याचे खरे पुजारी आहेत, उपासक आहेत. तेच सौंदर्याचे स्तोत्रकार आहेत आणि सौंदर्याचे भाष्यकारही, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ते जगातील सौंदर्य स्वत: समजावून घेतात आणि कलेच्या माध्यमातून त्या सौंदर्याचा अर्थ जगाला सांगतात. सौंदर्य म्हणजे काही एक वस्तू नाही तर सौंदर्याच्या अनेक जाती असल्याचे दिसून येते. सौंदर्य हे निरनिराळ्या स्थळी निरनिराळ्या रुपात प्रकट होत असते. याचा शोध आणि बोध घ्यायला हवा. उंच उंच पर्वतांची बर्फाने आच्छादलेली आणि गगनाचे चुंबन घेणारी उत्तुंग शिखरे. खळखळत जाणाऱ्या विस्तीर्ण नद्या, त्यांच्या काठावरील फुललेली वनश्री, त्या वनश्रीत-हिरवाईत राहून निसर्गात संगीत निर्माण करणारे पशु-पक्षी, वर्षाकाळामध्ये पृथ्वीच्या मस्तकावर अभिषेक करणाऱ्या मेघांच्या रांगा, त्या कृष्णमेघांच्या विविध छटा आणि आकार, निरनिराळ्या ऋतुंमध्ये पृथ्वीच्या हृदयातून फुलांच्या, फळांच्या, पिकांच्या रुपाने निर्माण होणारी रंगाची, गंधाची, रुचीची अनंत दौलत ही निसर्गाच्या सौंदर्याची मनमोहक दालनेच. निसर्ग सौंदर्याबरोबरच मानवनिर्मित सौंदर्यही मनाला किती आकर्षित करते, हे वेगळे सांगायला नकोच.ग्रामीण संस्कृतीतील पाणवठ्यावर झऱ्याच्या झुळझुळण्याबरोबर पाणी पिण्यासाठी थोपलेला गुरांचा तांडा, हातातली घुंगुरकाठी फिरवीत त्यांच्यामागे शीळ घालणारा गुराखी, खेडेगावातील पाणवठ्यावरून डोक्यावर घागरीवर घागरी घेऊन हसत-खेळत चाललेल्या स्त्रिया, पांदीच्या वाटेतून घुंगरांचा आवाज करीत निघालेली बैलगाडी हे सारे सौंदर्यच नाही का? पण ते टिपायला रसिकतेची दृष्टी असावी लागते. ग्रामीण संस्कृतीतील हे सौंदर्य नागर संस्कृतीत दुरापास्त झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे रसिकताही कमी झाली आहे. कला, सौंदर्य दृष्टी निर्माण करण्याची गरज आहे.रसिकतेने विश्वाचे ते सौंदर्य अनुभवणे हीच आनंदाची दृष्टी असते आणि तीच आनंदाची सृष्टी निर्माण करते. त्यामुळे माणसाने आनंद द्यायला आणि घ्यायलाही शिकायला हवे. कलादृष्टी विकसित करायला हवी.-डॉ. रामचंद्र देखणे