शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

दृष्टिकोन - कायदेभंगाचे दु:ख आणि वीज दरवाढीचा बोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 07:47 IST

महाराष्ट्रातील वीजदर शेजारील सर्व राज्यांपेक्षा जास्त असतानाही पुन्हा दरवाढ लादली गेल्यामुळे राज्यातील तमाम २.५ कोटी वीजग्राहक नाराज आणि उद्विग्न आहेत.

प्रताप होगाडे महाराष्ट्रातील वीजदर शेजारील सर्व राज्यांपेक्षा जास्त असतानाही पुन्हा दरवाढ लादली गेल्यामुळे राज्यातील तमाम २.५ कोटी वीजग्राहक नाराज आणि उद्विग्न आहेत. विशेषत: उद्योग, यंत्रमाग, शेतकरी व सर्वसामान्य घरगुती वीजग्राहक या सर्वांनाच दरवाढीच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. दरवाढीच्या निकालाचा आनंद फक्त महावितरण परिवार आणि परिसरापुरताच मर्यादित आहे. महावितरण कंपनी राज्य सरकारला आणि आयोगाला पटविण्यात संपूर्ण यशस्वी झाली आहे असेच चित्र दिसून येत आहे. किंबहुना महावितरण, राज्य सरकार आणि आयोग या तिघांनी संयुक्तरीत्या नियोजनपूर्वक महावितरणला हवे असलेले दान त्यांच्या पदरी टाकले आहे आणि ग्राहकांच्या वाट्याला कायदेभंगाचे दु:ख आणि दरवाढीचा बोजा दिलेला आहे.

महावितरणची २ वर्षांत महसुली तूट भरपाईची मागणी ३४,६४६ कोटी रुपये म्हणजे २३ टक्के. आयोगाने मान्यता दिलेली तूट भरपाई रक्कम २०,६५१ कोटी रुपये म्हणजे १५ टक्के. दरवाढीच्या रूपाने २ वर्षांत ग्राहकांकडून जादा वसुली ८,२६८ कोटी रुपये म्हणजे ६ टक्के. नियामक मत्ता म्हणून मंजुरी दिलेली रक्कम १२,३८२ कोटी रुपये म्हणजे ९ टक्के. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की एकूण २०,६५१ कोटी रुपये म्हणजे १५ टक्के वाढीला मंजुरी दिलेली असली तरी २ वर्षांत वाढलेल्या दरातून त्यापैकी ६ टक्के म्हणजे ८,२६८ कोटी रुपये वसूल करण्यात येतील व राहिलेली ९ टक्के म्हणजे १२,३८२ कोटी रक्कम ही नियामक मत्ता म्हणजे ग्राहकांकडून वसूल करावयाची थकीत रक्कम अथवा साध्या भाषेत येणे बाकी ठेवली जाईल आणि या रकमेची वसुली व्याजासह एप्रिल २०२० पासून पुढील एक-दोन वर्षांत अथवा सहा-सात वर्षांत केली जाईल. याचाच अर्थ एप्रिल २०२० पासून अथवा त्या वेळच्या आदेशानंतर वीज बिलात नियामक मत्ता आकार या नावाने एक नवीन आकार सुरू होईल.१९९८ मध्ये वीज नियामक आयोग कायदा आला. त्यानंतर जून २००३ पासून वीज कायदा लागू झाला. वीजक्षेत्रात स्पर्धा, कार्यक्षमता, ग्राहकांना परवडणाऱ्या रास्त दरात २४ तास गुणवत्तापूर्ण वीज आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण या चार मूलभूत सूत्रांच्या आधारे संपूर्ण कायद्याची रचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कायद्यामधून ग्राहक संघटना व ग्राहक प्रतिनिधींचा सहभाग, ग्राहक गाºहाणे निवारण यंत्रणा, कृतीची मानके, ग्राहकांना नुकसानभरपाई, मुक्त प्रवेशाद्वारे वीज खरेदीस परवानगी अशा अनेक संकल्पना प्रत्यक्षात आलेल्या आहेत. हा कायदा आल्यामुळे ग्राहकांनाही या क्षेत्रात परिवर्तन होऊ शकेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आणि ती रास्तही होती व आहे. मोबाइलमध्ये स्पर्धा आली, त्यामुळे एकेकाळी कॉलसाठी प्रति मिनिट ३२ रुपये असणारा दर आता प्रति मिनिट ३० पैसे झाला आहे. त्याप्रमाणे वीजक्षेत्रातही रास्त दरात दर्जेदार सेवा मिळण्याची शक्यता दिसू लागली. वीज धोरण, दर धोरण जाहीर झाले. वीज वितरण कंपन्यांच्या एकाधिकारशाही व ठोकशाही प्रवृत्तीवर काही प्रमाणामध्ये नियंत्रण येऊ लागले.

तथापि या सर्व चांगल्या बाबींवर पाणी फिरवण्याचे काम महावितरण कंपनीने आणि तत्कालीन राज्य सरकारने २०११-१२ पासून चालू केले. आॅगस्ट २०१२ मध्ये किमान २५ टक्क्यांहून अधिक दरवाढ झाली. पुन्हा सप्टेंबर २०१३ मध्ये २५ टक्क्यांहून अधिक नवीन आकार लागू झाले. महत्त्वाची बाब म्हणजे नाशिक येथे आजचे मुख्यमंत्री व तत्कालीन भाजप अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे स्वत: वीजबिल होळी आंदोलनात सहभागी होते. आॅगस्ट २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष म्हणून भाजपचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले. या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये समावेश असलेल्या वीजविषयक आश्वासनांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र प्रकाशमय, ६ महिन्यांत संपूर्ण भारनियमन मुक्ती, वीजनिर्मिती आणि वीज वितरण क्षेत्रात नवीन धोरण, रास्त दरात वीज खरेदी करून खरेदी खर्चावर नियंत्रण, वीज कंपनीतील अधिकारी आयोगात जाणार नाही अशी तरतूद करू, उत्पादन खर्च व वीजगळती कमी करून आणखी स्वस्त दराने वीज देऊ, ग्राहकांना उत्पन्नावर आधारित वीजदर लावू, वीजक्षेत्राचे २० वर्षाचे नियोजन करू इत्यादींचा समावेश होता.आज ४ वर्षांनंतर मागे वळून पाहिले तर केवळ वीज खरेदी खर्चावर नियंत्रण एवढी एक बाब सोडली तर अन्य कोणत्याही बाबतीत एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. याचाच अर्थ वीजक्षेत्रातील सर्वच आघाड्यांवर मागच्या सरकारप्रमाणेच हेही सरकार संपूर्ण अपयशी ठरलेले आहे.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी