शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

दृष्टिकोन - कायदेभंगाचे दु:ख आणि वीज दरवाढीचा बोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 07:47 IST

महाराष्ट्रातील वीजदर शेजारील सर्व राज्यांपेक्षा जास्त असतानाही पुन्हा दरवाढ लादली गेल्यामुळे राज्यातील तमाम २.५ कोटी वीजग्राहक नाराज आणि उद्विग्न आहेत.

प्रताप होगाडे महाराष्ट्रातील वीजदर शेजारील सर्व राज्यांपेक्षा जास्त असतानाही पुन्हा दरवाढ लादली गेल्यामुळे राज्यातील तमाम २.५ कोटी वीजग्राहक नाराज आणि उद्विग्न आहेत. विशेषत: उद्योग, यंत्रमाग, शेतकरी व सर्वसामान्य घरगुती वीजग्राहक या सर्वांनाच दरवाढीच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. दरवाढीच्या निकालाचा आनंद फक्त महावितरण परिवार आणि परिसरापुरताच मर्यादित आहे. महावितरण कंपनी राज्य सरकारला आणि आयोगाला पटविण्यात संपूर्ण यशस्वी झाली आहे असेच चित्र दिसून येत आहे. किंबहुना महावितरण, राज्य सरकार आणि आयोग या तिघांनी संयुक्तरीत्या नियोजनपूर्वक महावितरणला हवे असलेले दान त्यांच्या पदरी टाकले आहे आणि ग्राहकांच्या वाट्याला कायदेभंगाचे दु:ख आणि दरवाढीचा बोजा दिलेला आहे.

महावितरणची २ वर्षांत महसुली तूट भरपाईची मागणी ३४,६४६ कोटी रुपये म्हणजे २३ टक्के. आयोगाने मान्यता दिलेली तूट भरपाई रक्कम २०,६५१ कोटी रुपये म्हणजे १५ टक्के. दरवाढीच्या रूपाने २ वर्षांत ग्राहकांकडून जादा वसुली ८,२६८ कोटी रुपये म्हणजे ६ टक्के. नियामक मत्ता म्हणून मंजुरी दिलेली रक्कम १२,३८२ कोटी रुपये म्हणजे ९ टक्के. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की एकूण २०,६५१ कोटी रुपये म्हणजे १५ टक्के वाढीला मंजुरी दिलेली असली तरी २ वर्षांत वाढलेल्या दरातून त्यापैकी ६ टक्के म्हणजे ८,२६८ कोटी रुपये वसूल करण्यात येतील व राहिलेली ९ टक्के म्हणजे १२,३८२ कोटी रक्कम ही नियामक मत्ता म्हणजे ग्राहकांकडून वसूल करावयाची थकीत रक्कम अथवा साध्या भाषेत येणे बाकी ठेवली जाईल आणि या रकमेची वसुली व्याजासह एप्रिल २०२० पासून पुढील एक-दोन वर्षांत अथवा सहा-सात वर्षांत केली जाईल. याचाच अर्थ एप्रिल २०२० पासून अथवा त्या वेळच्या आदेशानंतर वीज बिलात नियामक मत्ता आकार या नावाने एक नवीन आकार सुरू होईल.१९९८ मध्ये वीज नियामक आयोग कायदा आला. त्यानंतर जून २००३ पासून वीज कायदा लागू झाला. वीजक्षेत्रात स्पर्धा, कार्यक्षमता, ग्राहकांना परवडणाऱ्या रास्त दरात २४ तास गुणवत्तापूर्ण वीज आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण या चार मूलभूत सूत्रांच्या आधारे संपूर्ण कायद्याची रचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कायद्यामधून ग्राहक संघटना व ग्राहक प्रतिनिधींचा सहभाग, ग्राहक गाºहाणे निवारण यंत्रणा, कृतीची मानके, ग्राहकांना नुकसानभरपाई, मुक्त प्रवेशाद्वारे वीज खरेदीस परवानगी अशा अनेक संकल्पना प्रत्यक्षात आलेल्या आहेत. हा कायदा आल्यामुळे ग्राहकांनाही या क्षेत्रात परिवर्तन होऊ शकेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आणि ती रास्तही होती व आहे. मोबाइलमध्ये स्पर्धा आली, त्यामुळे एकेकाळी कॉलसाठी प्रति मिनिट ३२ रुपये असणारा दर आता प्रति मिनिट ३० पैसे झाला आहे. त्याप्रमाणे वीजक्षेत्रातही रास्त दरात दर्जेदार सेवा मिळण्याची शक्यता दिसू लागली. वीज धोरण, दर धोरण जाहीर झाले. वीज वितरण कंपन्यांच्या एकाधिकारशाही व ठोकशाही प्रवृत्तीवर काही प्रमाणामध्ये नियंत्रण येऊ लागले.

तथापि या सर्व चांगल्या बाबींवर पाणी फिरवण्याचे काम महावितरण कंपनीने आणि तत्कालीन राज्य सरकारने २०११-१२ पासून चालू केले. आॅगस्ट २०१२ मध्ये किमान २५ टक्क्यांहून अधिक दरवाढ झाली. पुन्हा सप्टेंबर २०१३ मध्ये २५ टक्क्यांहून अधिक नवीन आकार लागू झाले. महत्त्वाची बाब म्हणजे नाशिक येथे आजचे मुख्यमंत्री व तत्कालीन भाजप अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे स्वत: वीजबिल होळी आंदोलनात सहभागी होते. आॅगस्ट २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष म्हणून भाजपचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले. या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये समावेश असलेल्या वीजविषयक आश्वासनांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र प्रकाशमय, ६ महिन्यांत संपूर्ण भारनियमन मुक्ती, वीजनिर्मिती आणि वीज वितरण क्षेत्रात नवीन धोरण, रास्त दरात वीज खरेदी करून खरेदी खर्चावर नियंत्रण, वीज कंपनीतील अधिकारी आयोगात जाणार नाही अशी तरतूद करू, उत्पादन खर्च व वीजगळती कमी करून आणखी स्वस्त दराने वीज देऊ, ग्राहकांना उत्पन्नावर आधारित वीजदर लावू, वीजक्षेत्राचे २० वर्षाचे नियोजन करू इत्यादींचा समावेश होता.आज ४ वर्षांनंतर मागे वळून पाहिले तर केवळ वीज खरेदी खर्चावर नियंत्रण एवढी एक बाब सोडली तर अन्य कोणत्याही बाबतीत एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. याचाच अर्थ वीजक्षेत्रातील सर्वच आघाड्यांवर मागच्या सरकारप्रमाणेच हेही सरकार संपूर्ण अपयशी ठरलेले आहे.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी