शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

तीन ते चार सिगारेट तुम्ही रोज ओढताय; वेळीच यावर योग्य नियंत्रण मिळवणं आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 05:30 IST

दररोज तीन ते चार सिगारेट ओढण्यासारखाच दुष्परिणाम या धूलिकणांमुळे आपल्या शरीरावर होऊ शकतो व आपले आयुष्यमान कमी होऊ शकते.

डॉ. अविनाश फडके प्रख्यात मायक्रोबायोलॉजिस्ट 

सध्या हवेचे प्रदूषण हा एक चर्चेचा विषय झाला आहे. ज्यांना दम्याचा विकार वा फुप्फुसाचे आजार आहेत त्यांना या प्रदूषणाचा त्रास जास्त जाणवतो. लहान मुलांमध्ये सतत घशाचा त्रास होणे, सर्दी, खोकला होणे व दम्याचे प्रमाण आता वाढत चालले आणि त्यामुळे नेब्युलायझर वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे.सध्या मुंबई व उपनगरांत प्रदूषणाचे प्रमाण ज्याला आपण (एक्यूआय-एअर क्वालिटी इंडेक्स) किंवा हवेची गुणवत्ता मोजण्याचे प्रमाण म्हणतो, ते एक्यूआय १५०-२०० यामध्ये आढळून येते. एक्यूआय १५० ते २०० इतका असणे हे रेड झोनमध्ये येते. २०० च्या वरती ते पर्पल झोनमध्ये म्हणजे धोकादायक समजले जाते. अनेक वेळेला मुंबईमध्ये एक्यूआय २०० पेक्षा जास्त म्हणजे धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. 

एक्यूआय मोजताना हवेतील ओझोनचे प्रमाण, धूलिकणांचे प्रमाण, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड व नायट्रोजन डाय-ऑक्साइडचे प्रमाण असे अनेक मापदंड वापरले जातात. एक्यूआय वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे बांधकामाचे वाढते प्रमाण, वाहनांमधून होणारे प्रदूषण, हवेतील वाऱ्याचे व आर्द्रतेचे प्रमाण, कचरा जाळण्याचे प्रमाण आणि विविध कारखान्यांतून हवेत जाणारे दूषित वायू! या सर्वांवर योग्य नियंत्रण आवश्यक झाले आहे .

पार्टिकल साइज (धुळीचा कण) दहा मायक्रॉनच्या वर असेल तर सहसा तो आपल्या फुप्फुसांमध्ये जात नाही. दहा मायक्रॉनपेक्षा लहान धूलिकण आपल्याला घशाचा त्रास, खोकला येणे असा त्रास देऊ शकतात; पण सगळ्यात धोकादायक २.५ मायक्रॉनच्या आकारापेक्षा कमी असणारे धूलिकण आहेत. हे धूलिकण आपल्या फुप्फुसांमध्ये सहजपणे जाऊ शकतात व रक्तांपर्यंतसुद्धा पोहोचू शकतात. त्यामुळे दमा, फुप्फुसाचे आजार, हृदयविकार आणि कॅन्सर असे विविध दुष्परिणाम होऊ शकतात.

दररोज तीन ते चार सिगारेट ओढण्यासारखाच दुष्परिणाम या धूलिकणांमुळे आपल्या शरीरावर होऊ शकतो व आपले आयुष्यमान कमी होऊ शकते. काही धूलिकण ज्यांना बॅक्टेरिया, फंगस किंवा इतर जीवित जंतू चिकटले असतील तर हे सजीव धूलिकण न्यूमोनियासारखा आजार पसरवू शकतात. रस्त्यावरचे मलमूत्र, दूषित पाणी किंवा ओला कचरा यामुळे या सजीव धूलिकणांचे प्रमाण वाढते. यामध्ये चीनमधील बीजिंग शहराचे उदाहरण आपल्याला शिकण्यासारखे आहे. त्यांनी २००० सालामध्ये अत्यंत दूषित झालेल्या हवामानावर परिणामकारक उपाय शोधायला सुरुवात केली. कोळसा जाळणे कमी करणे, दूषित वायू तयार करणारे कारखाने बंद करणे व वाहनांची संख्या कमी करणे असे उपाय त्यांनी दहा ते पंधरा वर्षे राबवले. आता तेथील प्रदूषण ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. सर्व नागरिकांचा, उद्योजकांचा, बांधकाम करणाऱ्या बिल्डरचा, वाहने निर्माण करणाऱ्या कारखान्यांचा सहयोग त्यात असणे आवश्यक आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषण