शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 07:37 IST

देशामधील एकही संघटना स्वत:ला ‘अर्बन नक्षल’ म्हणवत नाही. मुळात अशी विचारसरणी अस्तित्वातच नाही. ‘अर्बन नक्षल’ ही फक्त एक शिवी आहे.

योगेंद्र यादव, अध्यक्ष, स्वराज इंडिया, सदस्य, जय किसान आंदोलन परवा मला कुणीतरी विचारले, ‘हे अर्बन नक्षल  काय प्रकरण आहे?’  मी म्हणालो, “ते एक भूत आहे. म्हणजे डोळे उघडून नीट पाहिले तर काहीच दिसणार नाही. पण मनात भय  असेल आणि डोळे बंद असतील तर ते सावलीसारखे सतत पछाडत असलेले दिसेल.” 

- यावर भारत जोडो अभियानातील एक तरुण साथीदार म्हणाला, “असे कोड्यात बोलू नका. नक्षलवाद म्हणजे काय आणि अर्बन नक्षल म्हणजे काय, हे जरा आम्हाला समजावून सांगा.”महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यान  देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारत जोडो अभियानातील लोकांची विचारधारा आणि कामाची पद्धत अर्बन नक्षलवादी आहे. अर्बन नक्षलवाद म्हणजे लोकांची मने गढूळ करणे, त्यांच्या मनात संशय उत्पन्न करणे.  देशातील विविध संस्था, येथील व्यवस्था याविषयी संशय निर्माण करून देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणे.” नरेंद्र मोदींचा आरोप असा, की काँग्रेस पक्ष अर्बन नक्षली लोकांकडून चालवला जातो. त्यामुळे  माझ्या या तरुण साथीदाराला मी म्हणालो, “नक्षल आणि नक्षलवाद म्हणजे काय हे  मला माहीत आहे. पण अर्बन नक्षल ही संकल्पना समजणे थोडे कठीण आहे. तरीही मी प्रयत्न करतो.”

नक्षलवाद हा भारताच्या डाव्या आंदोलनातील, ६०-७० च्या दशकात जन्मलेला एक उपप्रवाह. त्याचे मूळ स्वरूप आता जवळजवळ नष्ट झाले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात साम्यवादी राजकारणाची मुख्य धुरा भारतीय कम्युनिस्ट पक्ष  वाहत होता. परंतु चीनबरोबरच्या युद्धानंतर हा पक्ष फुटला. त्यातील थोडा मवाळ आणि रशिया समर्थक घटक मूळ पक्षात राहिला आणि काहीसा जहाल आणि चीनकडे झुकलेला घटक १९६४ मध्ये पक्षातून फुटून त्याने भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) या नावाने  एक नवा पक्ष स्थापन केला. आपण आज त्याला CPM या नावाने ओळखतो. याच सीपीएममधून फुटून बाहेर पडलेल्या अधिकच जहाल उपप्रवाहाला  नक्षलवादी आंदोलन म्हणून ओळखले जाते. हे आंदोलन उत्तर बंगालमधील नक्षलबाडी नावाच्या एका गावातून सुरू झाले म्हणून त्याला त्या गावाचे नाव मिळाले. खेड्यापाड्यातील गरीब शेतकरी आणि शेतमजुरांना जमीनदारांविरुद्ध संघटित करणे हीच भारतीय क्रांतीची प्रमुख रणनीती असायला हवी असा या गटाचा विचार होता.

सर्व  प्रस्थापित कम्युनिस्ट पक्षांनी  व्यवस्थेबरोबर तडजोड केलेली आहे आणि आता व्यवस्था बदलायची तर सशस्त्र क्रांतिशिवाय तरणोपाय नाही, अशी नक्षलवाद्यांची भूमिका होती. सत्तरच्या दशकात  या संघटनांनी ग्रामीण विभागात हिंसक बंड करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हळूहळू डझनावारी नक्षली संघटना आणि पक्ष स्थापन झाले आणि ते सारे भूमिगत पद्धतीने काम करीत राहिले. त्यांचे  बंडाचे प्रयत्न सरकारने बळाचा वापर करून मोडून काढले. कालांतराने बहुतेक नक्षली संघटनांनी हिंसात्मक मार्गाचा त्याग केला. त्या संघटना लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीत किंवा लोकशाही पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या  जनआंदोलनांच्या प्रवाहात सामील झाल्या. 

एके काळी अनेक आदर्शवादी तरुण, लेखक, कवी आणि कलावंत नक्षली आंदोलनाने प्रभावित झाले होते. परंतु   या हिंसक क्रांतीत सामील झालेल्या नक्षलींचेही हळूहळू अध:पतन होऊ लागले. त्यात  अकारण हिंसा, दांडगाई आणि खंडणीखोरीचा प्रादुर्भाव झाला. छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि झारखंडमधील  काही जिल्ह्यांत त्यांच्या भूमिगत हिंसक कारवाया चालू असतात. परंतु देशातील बहुतेक जनआंदोलनांनी आणि खुद्द नक्षली विचारधारेने प्रभावित संघटनांनीदेखील  हिंसक कार्यपद्धतीचा आता संपूर्ण त्याग केला आहे.  नक्षली आंदोलन आज  केवळ गतकालीन अवशेषांच्या स्वरूपातच शिल्लक राहिलेले आहे. ‘मग हे अर्बन नक्षल कोण आहेत?’ असे माझ्या तरुण साथीदाराने विचारले. “देशामधील एकही संघटना स्वत:ला अर्बन नक्षल म्हणवत नाही. मुळात  अशी कोणतीही विचारसरणी अस्तित्वातच नाही. अर्बन नक्षल ही फक्त एक शिवी आहे. मनाला येईल तेव्हा,  मनाला येईल त्या व्यक्तीला किंवा संघटनेला ही शिवी दिली जाते. भारत जोडो अभियानात अनेक गांधीवादी, समाजवादी, उदारमतवादी आणि आंबेडकरवादी संघटना सामील झाल्या आहेत. या सर्व संघटना  हिंसक राजकारणाला सातत्याने विरोध करत आलेल्या आहेत. पण त्यांच्यासाठीही ही शिवी वापरली जाते,” असे मी माझ्या साथीदाराला समजावून सांगितले. खुद्द मोदी सरकारनेच संसदेच्या सभागृहात अनेक वेळा सांगितले आहे, की अर्बन नक्षल नावाची कोणतीही गोष्ट सरकारी शब्दकोशात अस्तित्वात नाही. १२ मार्च २०२० ला तृणमूल काँग्रेसच्या खासदार  शांता छेत्री यांच्या प्रश्नाला गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी आणि ९ फेब्रुवारी २०२२ ला भाजप खासदार राजेश सिन्हा यांच्या प्रश्नाला  गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी लेखी उत्तरे दिली, की अर्बन नक्षलनावाचा शब्द भारत सरकार कधीच वापरत नाही. सरकारला त्याबद्दल काहीही माहिती नाही. 

खरे तर ‘अर्बन नक्षल’ हे केवळ भाजपच्या मनातील भय आहे. आपल्या मनातील भयच भूत होऊन शेवटी आपलीच मानगूट धरते, ते हे असे!yyopinion@gmail.com

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा