शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

चीनला शह देण्याचा मंत्र; 'शत्रू'च्या मित्राशी मैत्री करण्याचं तंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 00:21 IST

चीनबरोबरच्या सीमेवरच्या कुरापती नव्या नाहीत. उलट ती सतत घडणारी बाब आहे.

कोरोना संकटाच्या काळात चीनने सीमेवर सैनिकांची जमवाजमव केली; पण आपणही त्याच तयारीनिशी उभे आहोत, हे लक्षात येताच माघार घेतली. भारत-चीनच्या या ताणल्या जात असलेल्या संबंधात सलोखा निर्माण करण्याची तत्परता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखविली. तीन-चार दिवसांचा हा घटनाक्रम आंतरराष्ट्रीय संंबंधातील मुत्सद्देगिरीची चुणूक दाखवणारा ठरला आणि कालपासून चीनलगतच्या सीमेवर स्थिती पूर्वपदावर आली. पडद्यावरील नाट्य संपले असले, तरी त्याच्या तालमी बऱ्याच अगोदरपासून चालू आहेत आणि उत्तरेच्या सीमेवर यापुढेही सजग राहण्याची आवश्यकता आहे. एकटा हिमालय आता सीमेचे रक्षण करू शकत नाही.

चीनबरोबरच्या सीमेवरच्या कुरापती नव्या नाहीत. उलट ती सतत घडणारी बाब आहे. या ना त्या कारणाने सीमेवरच्या कलागती वाढविण्याचा प्रयत्न ‘लालसेना’ करीत असतेच. २०१७च्या डोकलाम प्रकरणानंतर हे नाट्य घडले; पण त्यापूर्वी एक उपनाट्यही घडले असून, ते अजून संपलेले नाही. पूर्वीच्या मराठी चित्रपटामध्ये खलनायकाच्या चिथावणीवरून एखादे पाप्याचे पितर चिमटलेल्या बेडकुळ्या दाखवत नायकालाच आव्हान देताना दिसत असे. त्याचप्रमाणे पंधरवड्यापूर्वी नेपाळचे वर्तन होते आणि त्यांचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावली या दोघांनीही भारतावर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडली नाही. चीनच्या वुहान आणि इटलीपेक्षासुद्धा भारताचा ‘कोरोना’ घातक असल्याची टीकाही त्यांनी केली.

सर्वच बाबतीत भारतावर अवलंबून असणारा नेपाळ अशी टोकाची भाषा करतो, त्यावेळी त्याचा बोलविता धनी दुसराच कोणी असल्याचे सांगण्याची गरज उरत नाही. नेपाळने भारताशी सीमातंटा उकरून काढला. भारताने कैलास मानस सरोवराला जाण्यासाठी कालापाणी भागातील लिपुलेख खिंडीपर्यंत रस्ता तयार केला आणि त्यानंतर नेपाळने त्याला आक्षेप घेतला. रस्ता तयार होईपर्यंत नेपाळ गप्प बसला आणि नंतर हा प्रश्न उपस्थित केला. भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमाप्रश्न सोडविण्याचा आधार हा १८१५-१६ मध्ये उभय देशांत झालेल्या सुगोली करारात आहे.

पश्चिमेकडे महाकाली आणि पूर्वेकडे मेची या दोन नद्या ही सीमा आहे; पण महाकाली नदीला भारताच्या कुमाऊं भागातील उपनद्या मिळत असल्याने हे उपनद्यांचे क्षेत्रही आपलेच आहे, असा दावा नेपाळ करते. मोगल साम्राज्याच्या अस्तानंतर नेपाळमधील गोरखा राजांनी कुमाऊं गढवाल, तर सिक्कीमपर्यंत आपल्या सीमा वाढवून प्रदेश ताब्यात घेतला; पण १८१४ ते १६ या काळात इंग्रजांशी युद्ध होऊन त्यात नेपाळचा पराभव झाला आणि पुन्हा सुगोली करारानुसार सीमा निश्चित झाल्या. जो लिपुलेख वादग्रस्त ठरला तो भाग पूर्वीपासून भारताच्या कुमाऊंचा घटक आहे. तरीही नेपाळने कागाळ्या केल्याच. पंधरा दिवसांपूर्वी हा वाद रंगला. भारताने नेपाळला कायमच मदत केली आहे. अगदी परवाच हा वाद उद्भवण्यापूर्वी कोरोनाशी लढता यावे म्हणून आपण नेपाळला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या आणि डॉक्टरांसाठीचे कीटस् मदत स्वरूपात पाठविले होते. याच गोळ्यांची विक्री आपण अमेरिकेला केली. तरी या मदतीची जाणीव न ठेवता नेपाळने बेछूट आरोप केले. नेपाळ आणि चीन यांच्यामध्ये जवळीक वाढली आहे. या सर्व घडामोडींची जुळवाजुवळ केली, तर नेपाळच्या माध्यमातून चीनच कारवाया करीत असल्याचे दिसते.

भारत कोरोना संकटाशी सामना करण्यात गुंतला असल्याने सीमेवर लक्ष देऊ शकणार नाही, अशी त्यांची अटकळ होती; पण येथे आपणही जोरदार तयारी केली. अमेरिका मध्यस्थीसाठी स्वत:हून तयार होती, हे पाहून चीनने शांततेचे धोरण स्वीकारले; पण ही परिस्थिती तात्पुरती समजली पाहिजे. नेपाळला हाताशी धरून चीन भविष्यात कुरबुरी वाढवू शकतो. हे दोन्ही देश अधिक जवळ येणे हे आपल्या हिताचे नाही. कारण, नेपाळमार्गे चीनचे सैन्य सहजपणे भारतीय सीमेवर पोहोचू शकते. हा प्रश्न सीमेवरील संघर्षात सुटणारा नसून, याला राजनैतिक मुत्सद्देगिरीच उपयोगी ठरू शकते. म्हणून नेपाळसारखा शेजारीही सांभाळावा लागेल. चीनला कलागती वाढवायच्या आहेत; पण त्यासाठी नेपाळला भरीस पाडले जाणार नाही, याची दक्षता आपल्यालाच घ्यावी लागेल. शेजारधर्म व्यापक करीत करीत मुत्सद्देगिरीतून शह देण्याची तयारी करावी लागेल. चीन तर नथीतून तीर मारणारच.

नेपाळमधील एकूण परकीय गुंतवणुकीत चीनची गुंतवणूक ८० टक्के आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान ओली यांचे सरकार कम्युनिस्ट असून, त्यांची चीनबरोबर जवळीक वाढली आहे.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतchinaचीन