शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन: नोंदणीकृत कामगारांना दिलासा; पण वंचित, सर्वहारा वर्गाचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 01:24 IST

केरळ, दिल्ली, छत्तीसगड सरकार यावर काम करीत असल्याचे दिसते. महाराष्ट्र सरकारनेही उपाययोजना कराव्यात.

धनाजी कांबळे‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नव्हे, तर श्रमिक, कष्टकरी जनतेच्या तळहातावर तरलेली आहे,’ असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी सांगून ठेवले आहे. अर्थातच जगात ज्या काही भांडवली उत्पादक कंपन्या, कारखाने आहेत. शेतीत राबणाऱ्यांचे हजारो हात आहेत. त्यांच्यामुळेच आज मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मुखी अन्नाचा घास मिळत आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. ‘कामगारांच्या कष्टानं जगाला नटवलं... दलाल, मक्तेदारांनी आजवर यांना फसवलं...’ असं एक श्रमिकांचं गीत आजही आंदोलनांमध्ये ऐकायला मिळतं.

शोषण अजूनही संपलेले नाही. श्रम आणि मोबदला यातील दरी तशीच आहे. मुद्दा आहे जग बदलण्याचा! केवळ चालक बदलून व्यवस्था बदलत नाही, त्यासाठी गाडीच बदलण्याची वेळ आल्याचे कोरोना आणि लॉकडाऊनने दाखवून दिले आहे. हजारो हातांचे बळ एकत्र आणून काळ््या मातीत सोनं पिकवणारा बळिराजा श्रमिकांप्रमाणेच खेड्यांपासून शहरात राहणाऱ्यांचा तारणहार म्हणून पुढे आलेला आहे. मात्र, ज्यांच्याकडे जमीन नाही, उदरनिर्वाहाचं मजुरी हेच एकमेव साधन आहे, अशा कष्टकरी सफाई कामगार समुदायाचा विचार आताच्या संकटकाळात शाश्वत पद्धतीने झालेला नाही. विशेष म्हणजे केंद्र सरकारने केवळ मुकादमाची भूमिका बजावली.

राज्य सरकारनेच नोंदणीकृत कामगारांना दोन हजार रुपये देऊन दिलासा दिला. तरीही असंघटित क्षेत्रात अनेक वर्षांपासून ज्यांनी जिंदगी कुर्बान केली आहे, अशा मजुरांबाबत कोणतीच उपाययोजना झालेली नाही. विशेषत: अंगमेहनतीची कामे करणाºया समूहांमध्ये दलित, आदिवासी कष्टकरी माणसं जास्त आहेत. शेतकºयांकडे नुकसान दाखवायला शेती आहे; पण उघड्यावर बेघर जिंदगी जगणाºयांकडे नुकसान दाखवायलाही काही नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार संवेदनशील आहे. अनेक आव्हानांचा सामना करीत कोरोना संकटाच्या काळात खंबीरपणे जनतेसोबत उभे आहे, ही आश्वस्त करणारी बाब आहे. त्यामुळेच सरकारने अशा असंघटित, कष्टकरी बांधवांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक निर्णय घ्यायला हवा.

‘डोंगर फोडतो आम्ही, दगड जोडतो आम्ही...’ असे म्हणत गगनचुंबी टॉवर्स उभारणाºया या मजुरांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. याचा मोठा फटका हातावर पोट असणाºया, कष्ट करून कुटुंब पोसणाºया स्थलांतरित मजुरांना बसला आहे. हाताला काम नाही. मजुरी नाही. एकेका खोलीत २५-३० जण भरउकाड्यात दाटीवाटीने राहतात. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोक अशा परिस्थितीत जगत आहेत. राष्ट्रीय उत्पन्नात त्यांच्या श्रमाचा वाटा ६० टक्के आहे; पण त्यांच्या श्रमांना संरक्षण नाही. नोकरदारांच्या नोकºया व पगार सुरक्षित आहेत; पण यांचे काय? रेशनकार्डधारकांना कमी दरात व काहींना मोफत धान्य दिले जात आहे, पण रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांची अवस्था भीषण आहे. एनजीओ व कंपन्यांनी त्यांना मदत केली; पण ती पुरेशी नाही. भूक माणसाला काहीही करायला भाग पाडते, त्यामुळे आताच व्यवस्था केली नाही, तर भूकमारीच्या समस्येला तोंड द्यावे लागेल.

केरळ, दिल्ली, छत्तीसगड सरकार यावर काम करीत असल्याचे दिसते. महाराष्ट्र सरकारनेही उपाययोजना कराव्यात. सरकारची ती संविधानिक जबाबदारी आहे. या जबाबदारीचे सरकारचे भान जागवण्यासाठी संविधानप्रेमी नागरिकांनी महाराष्ट्रदिनी उपोषण केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, सुभाष लोमटे, उल्का महाजन, मुक्ता श्रीवास्तव, आदी कार्यकर्त्यांनी या लक्षवेधी आंदोलनाचे आवाहन केले होते. ‘जगात जो बदल घडावा असे तुम्हाला वाटते, तो बदल आधी तुमच्यात झाला पाहिजे, त्यामुळे बदलासाठीचे प्रयत्न स्वत:पासून सुरू करा,’ असे महात्मा गांधींनी म्हटलेले आहे. आता यापुढे जाऊन प्रत्येक राबणाºया माणसाच्या जगण्याच्या चळवळीमध्ये आपल्याला सहभागी होणे, हेच शहाणपणाचे आता ठरणार आहे.

(लेखक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक आहेत)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या