शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन: नोंदणीकृत कामगारांना दिलासा; पण वंचित, सर्वहारा वर्गाचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 01:24 IST

केरळ, दिल्ली, छत्तीसगड सरकार यावर काम करीत असल्याचे दिसते. महाराष्ट्र सरकारनेही उपाययोजना कराव्यात.

धनाजी कांबळे‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नव्हे, तर श्रमिक, कष्टकरी जनतेच्या तळहातावर तरलेली आहे,’ असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी सांगून ठेवले आहे. अर्थातच जगात ज्या काही भांडवली उत्पादक कंपन्या, कारखाने आहेत. शेतीत राबणाऱ्यांचे हजारो हात आहेत. त्यांच्यामुळेच आज मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मुखी अन्नाचा घास मिळत आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. ‘कामगारांच्या कष्टानं जगाला नटवलं... दलाल, मक्तेदारांनी आजवर यांना फसवलं...’ असं एक श्रमिकांचं गीत आजही आंदोलनांमध्ये ऐकायला मिळतं.

शोषण अजूनही संपलेले नाही. श्रम आणि मोबदला यातील दरी तशीच आहे. मुद्दा आहे जग बदलण्याचा! केवळ चालक बदलून व्यवस्था बदलत नाही, त्यासाठी गाडीच बदलण्याची वेळ आल्याचे कोरोना आणि लॉकडाऊनने दाखवून दिले आहे. हजारो हातांचे बळ एकत्र आणून काळ््या मातीत सोनं पिकवणारा बळिराजा श्रमिकांप्रमाणेच खेड्यांपासून शहरात राहणाऱ्यांचा तारणहार म्हणून पुढे आलेला आहे. मात्र, ज्यांच्याकडे जमीन नाही, उदरनिर्वाहाचं मजुरी हेच एकमेव साधन आहे, अशा कष्टकरी सफाई कामगार समुदायाचा विचार आताच्या संकटकाळात शाश्वत पद्धतीने झालेला नाही. विशेष म्हणजे केंद्र सरकारने केवळ मुकादमाची भूमिका बजावली.

राज्य सरकारनेच नोंदणीकृत कामगारांना दोन हजार रुपये देऊन दिलासा दिला. तरीही असंघटित क्षेत्रात अनेक वर्षांपासून ज्यांनी जिंदगी कुर्बान केली आहे, अशा मजुरांबाबत कोणतीच उपाययोजना झालेली नाही. विशेषत: अंगमेहनतीची कामे करणाºया समूहांमध्ये दलित, आदिवासी कष्टकरी माणसं जास्त आहेत. शेतकºयांकडे नुकसान दाखवायला शेती आहे; पण उघड्यावर बेघर जिंदगी जगणाºयांकडे नुकसान दाखवायलाही काही नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार संवेदनशील आहे. अनेक आव्हानांचा सामना करीत कोरोना संकटाच्या काळात खंबीरपणे जनतेसोबत उभे आहे, ही आश्वस्त करणारी बाब आहे. त्यामुळेच सरकारने अशा असंघटित, कष्टकरी बांधवांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक निर्णय घ्यायला हवा.

‘डोंगर फोडतो आम्ही, दगड जोडतो आम्ही...’ असे म्हणत गगनचुंबी टॉवर्स उभारणाºया या मजुरांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. याचा मोठा फटका हातावर पोट असणाºया, कष्ट करून कुटुंब पोसणाºया स्थलांतरित मजुरांना बसला आहे. हाताला काम नाही. मजुरी नाही. एकेका खोलीत २५-३० जण भरउकाड्यात दाटीवाटीने राहतात. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोक अशा परिस्थितीत जगत आहेत. राष्ट्रीय उत्पन्नात त्यांच्या श्रमाचा वाटा ६० टक्के आहे; पण त्यांच्या श्रमांना संरक्षण नाही. नोकरदारांच्या नोकºया व पगार सुरक्षित आहेत; पण यांचे काय? रेशनकार्डधारकांना कमी दरात व काहींना मोफत धान्य दिले जात आहे, पण रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांची अवस्था भीषण आहे. एनजीओ व कंपन्यांनी त्यांना मदत केली; पण ती पुरेशी नाही. भूक माणसाला काहीही करायला भाग पाडते, त्यामुळे आताच व्यवस्था केली नाही, तर भूकमारीच्या समस्येला तोंड द्यावे लागेल.

केरळ, दिल्ली, छत्तीसगड सरकार यावर काम करीत असल्याचे दिसते. महाराष्ट्र सरकारनेही उपाययोजना कराव्यात. सरकारची ती संविधानिक जबाबदारी आहे. या जबाबदारीचे सरकारचे भान जागवण्यासाठी संविधानप्रेमी नागरिकांनी महाराष्ट्रदिनी उपोषण केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, सुभाष लोमटे, उल्का महाजन, मुक्ता श्रीवास्तव, आदी कार्यकर्त्यांनी या लक्षवेधी आंदोलनाचे आवाहन केले होते. ‘जगात जो बदल घडावा असे तुम्हाला वाटते, तो बदल आधी तुमच्यात झाला पाहिजे, त्यामुळे बदलासाठीचे प्रयत्न स्वत:पासून सुरू करा,’ असे महात्मा गांधींनी म्हटलेले आहे. आता यापुढे जाऊन प्रत्येक राबणाºया माणसाच्या जगण्याच्या चळवळीमध्ये आपल्याला सहभागी होणे, हेच शहाणपणाचे आता ठरणार आहे.

(लेखक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक आहेत)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या