शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दृष्टिकोन: चिमुकल्यांचा आश्वासक ‘वन्स मोअर’ दुर्लक्षू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 04:33 IST

वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शन्सने मुलांचा बदलता कल लक्षात घेऊन अनेक परीकथा अ‍ॅनिमेटेड किंवा प्रत्यक्ष चित्रीकरणाद्वारे पडद्यावर साकार केल्या.

संदीप प्रधानअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे जुने समीकरण आहे. त्यामुळे ९३व्या संमेलनातही अध्यक्षांच्या निवडीपासून ठरावांच्या विषयांपर्यंत वादविवाद झडलेच. मात्र, या वादविवादांच्या वावटळीत एक गोष्ट दुर्लक्षित राहिली आणि ती म्हणजे बालकुमार मेळाव्यात बालकविता, गोष्टी यांना लहानग्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद. मोठ्यांच्या वादांचा लवलेश त्या मेळाव्याला नव्हता. अनेक कवितांना छोट्यांनी ‘वन्स मोअर’ दिला आणि कवींनी ही आग्रहाची मागणी अव्हेरली नाही.

आपल्याकडे बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते व त्याचे व्यासपीठ हे बालसाहित्याच्या चर्चेकरिता उपलब्ध असते. मात्र, अखिल भारतीय संमेलनातही एक कोपरा बालसाहित्यिक व बालरसिक यांना लाभला, हे स्वागतार्ह आहे. बालसाहित्याचा विचार केला तर सानेगुरुजी किंवा विंदा करंदीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांचा उल्लेख टाळणे अशक्यच आहे. आजही बालसाहित्याचा विचार करायचा तर राजीव तांबे, माधुरी पुरंदरे, दिलीप प्रभावळकर, विजया वाड, अनंत भावे, एकनाथ आव्हाड यांच्याच साहित्यकृती बालगोपाळांमध्ये लोकप्रिय आहेत. मुळात बालसाहित्य लिहिणे, हे प्रचंड आव्हानात्मक आहे. बालकांच्या मनोव्यापाराचा विचार करून त्यांना भावेल, रुचेल, आवडेल असे लिहिणे हे वाटते तितके सोपे नाही. मुलांकरिता पुस्तके प्रसिद्ध करायची तर ती रंगीबेरंगी चित्रांनी नटलेली, आकर्षक असायला हवी. छपाईचा खर्च आणि पुस्तकांचा खप हे गणित जुळणे गेल्या काही वर्षांत अवघड झाल्याने मोठ्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीवरच सावट असताना लहानग्यांची गुळगुळीत कागदावरील, रंगीत पुस्तके छापणे टाळण्याकडे कल वाढला आहे.

श्यामची आई यांसारखे पुस्तकही एकेकाळी शाळाशाळांमध्ये हेतुत: खपवल्याने खपाचे व लोकप्रियतेचे विक्रम करू शकले. नाटकांची पुस्तके नाटकांचे प्रयोग होतात तेथे किंवा लहान मुलांची पुस्तके शाळाशाळांमध्ये खपवण्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. बऱ्याचदा प्रकाशक पुस्तके छापतात, मात्र त्याच्या खपाकरिता प्रयत्न करीत नाहीत. त्याचा फटका लेखकांना व चांगल्या पुस्तकांना बसतो. बालसाहित्याबाबत हेच दुखणे आहे.

गेल्या काही वर्षांत बहुतांश मुले ही टीव्ही, मोबाइल, गेम्स या विश्वात रमलेली दिसतात. अनेकदा मुलांच्या प्रश्नांची सरबत्ती नको किंवा त्यांनी मस्ती करू नये, याकरिता पालकही त्यांच्या हातात मोबाइल देतात किंवा कार्टून्स लावून देतात. त्यामुळे मुलांनी पुस्तके वाचावीत, ही मुळात पालकांचीच मानसिकता नसेल, तर मुलांच्या हाती पुस्तके कशी दिसणार? अनेक उच्चमध्यमवर्गीय मराठी घरांमध्ये मुलांना मराठी बोललेले समजते. मात्र, ती इंग्रजी शाळांमध्ये शिकत असल्याने त्यांना मराठी वाचता येत नाही. किंबहुना, एकेकाळी गणित हा विषय अनेक मुलांचा शत्रू नंबर एक असायचा, तर आता या मराठी मुलांना मराठी हा शत्रू नंबर एक वाटू लागला आहे. त्यामुळे जर अशी परिस्थिती असेल, तर बालसाहित्य कुणी व कुणाकरिता प्रसिद्ध करायचे, असा प्रश्न निर्माण होतो.

शहरात अशी परिस्थिती असली, तरी उस्मानाबादमध्ये बालकुमार मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद आश्वासक आहे. त्यामुळे राज्याच्या अन्य काही भागांत मराठी बालसाहित्याची भूक असलेला एक वर्ग निश्चित आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी ‘वंचितांचा रंगमंच’ ही कल्पना यशस्वीरीत्या राबवली व सध्या वेगवेगळ्या नाटकांचे शेकडो प्रयोग होत आहेत. ज्या मुलांना नाटक म्हणजे काय? ते सादर करण्याकरिता नाट्यगृहे असतात, याची गंधवार्ता नव्हती, अशा मुलांना नाट्य चळवळीशी जोडण्याचे काम या उपक्रमाने केले आहे. वंचित घटकांमधील मुलांना साहित्य, नाट्यविषयक आवड आहे. परंतु, पोटाची भ्रांत त्यांना त्याकडे वळण्यास मज्जाव करते. ज्या वर्गाकडे पोटाची भ्रांत नाही, त्या वर्गाची बालसाहित्याची आवड शुष्क झाली आहे, असा पेच निर्माण झाला आहे. तरीही, वंचितांच्या रंगमंचावरील नाटकांची पुस्तके अलीकडेच प्रकाशित झाली असून त्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे.

वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शन्सने मुलांचा बदलता कल लक्षात घेऊन अनेक परीकथा अ‍ॅनिमेटेड किंवा प्रत्यक्ष चित्रीकरणाद्वारे पडद्यावर साकार केल्या. मुलांच्या अभिरुचीमधील बदल लक्षात घेऊन बालसाहित्य हे अशा पद्धतीने छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर आणण्याकरिता मातब्बर लेखक, निर्माते यांनी प्रयत्न करायला हवे. तरच, बालगोपाळांना काही दिल्याचा आनंद आपल्याला लाभेल.

(लेखक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन