शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - जुगाडासाठी वाव!

By admin | Updated: January 12, 2017 00:17 IST

निश्चलनीकरणाचा शिमगा संपला असला तरी कवित्व अद्याप बाकी आहे. निश्चलनीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले की नाही, यावर सध्या चर्वितचर्वण सुरू आहे

निश्चलनीकरणाचा शिमगा संपला असला तरी कवित्व अद्याप बाकी आहे. निश्चलनीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले की नाही, यावर सध्या चर्वितचर्वण सुरू आहे आणि आणखी काही दिवस तरी सुरूच राहणार, असे दिसते. परवा माध्यमांमध्ये झळकलेल्या बातम्या त्याच चर्वितचर्वणाचा भाग म्हणाव्या लागतील. हजार व पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी दिलेल्या मुदतीदरम्यान, सुमारे तीन ते चार लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बँकांमध्ये जमा झाला, ही त्यापैकी पहिली बातमी, तर निश्चलनीकरणानंतर सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे व्यवहार रोकडीऐवजी डिजिटल स्वरूपात झाल्याच्या सर्वेक्षण निष्कर्षाची दुसरी बातमी! स्टेट बँक आॅफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाने हे सर्वेक्षण केले होते. त्यातून हाती आलेला निष्कर्ष असा आहे, की एरवी रोख स्वरूपात होणारे सुमारे १५ टक्के व्यवहार निश्चलनीकरणानंतर डिजिटल स्वरूपात झाले. ही एक चांगली सुरुवात आहे, हे कुणीही नाकारणार नाही. वस्तू विनिमयापासून सुरू झालेल्या व त्यानंतर नाणी, चलनी नोटा असा प्रवास झालेल्या आर्थिक व्यवहारांचे भविष्य डिजिटल पेमेंट हेच आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. अखेरीस सर्वच अर्थव्यवस्थांना तेथपर्यंत पोहोचावेच लागेल. त्यामुळे आपला तो प्रवास इतरांपेक्षा जलद गतीने होणार असेल, तर त्याचे स्वागतच व्हायला हवे; पण करचुकवेगिरीला आळा घालण्याचे उद्दिष्ट, मर्यादित स्वरूपातील डिजिटल व्यवहारांमुळे कसे साध्य होईल? सध्याच्या घडीला प्रामुख्याने मध्यमवर्गीयच डिजिटल व्यवहारांकडे वळले आहेत. त्यांच्याकडे काळा पैसा नसल्यामुळे आणि असलाच तरी फार कमी प्रमाणात असल्यामुळे, त्यांना डिजिटल व्यवहार करण्याची भीती नाही; पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, ते कशाला डिजिटल व्यवहारांच्या फंदात पडतील? उलट ज्यांच्याकडे पांढरा पैसा आहे, ते अधिकाधिक व्यवहार डिजिटल स्वरूपात करू लागल्यास, काळा पैसा बाळगणाऱ्यांना अधिक प्रमाणात चलनी नोटा उपलब्ध होतील, जे त्यांना हवेच आहे. थोडक्यात, जोपर्यंत डिजिटल व्यवहार अनिवार्य होणार नाहीत व बड्या चलनी नोटा हद्दपार होणार नाहीत, तोपर्यंत डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून काळ्या पैशास आळा घालण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहील. उलट ‘जुगाडू’ भारतीयांना जुगाडासाठी वाव मिळेल. दोन्ही व्यवस्था एकत्र कायम राहिल्यास, दोन्ही व्यवस्थांचे आपल्यापुरते लाभ कसे उपटायचे आणि करचुकवेगिरी करून सरकारी तिजोरीला कसा चुना लावायचा, याचे मार्ग लवकरच शोधल्या जातील. त्यामुळे सरकारला खरोखरच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काळ्या पैशाची निर्मिती थांबवायची असेल, तर त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांची जलद निर्मिती करून, आर्थिक व डिजिटल साक्षरता वाढवून, बड्या चलनी नोटा कायमस्वरुपी बाद कराव्या लागतील; अन्यथा ‘शेळी गेली जिवानिशी....’ अशी गत होईल!