- संजीव उन्हाळे(ज्येष्ठ पत्रकार)अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची नुकत्याच झालेल्या भारत भेटीत मोठी अवघडल्यासारखी स्थिती झाली. एका बाजूला जगातील मोठी आॅनलाइन बाजारपेठ अन् दुसऱ्या बाजूला सरकारचा नाराजीचा सूर अन् त्यात देशातील अनेक शहरांत किरकोळ व्यापाऱ्यांनी केलेला निषेध. त्यातून मोठ्या संयमाने बेझोस यांनी येत्या पाच वर्षांत १० लाख डॉलर्सची गुंतवणूक, शंभर नवी व्यापारी केंद्रे अन् १० लाख रोजगार उपलब्ध करून देण्याची शाही घोषणा केली.२०१४ मध्ये हेच बेझोस भारतात आले तेव्हा लाल पायघड्या घालून स्वागत झाले आणि या भेटीत पुरते बेदखल. पंतप्रधानांनी तर अगोदरच भेट नाकारली होती. तथापि, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी भारतात अॅमेझॉन गुंतवणूक करीत आहे म्हणजे उपकार करीत नाही, अशी तिखट प्रतिक्रिया दिली. बेझोसच्या आगमनापूर्वी राष्ट्रीय स्पर्धा आयोगाने अॅमेझॉनच्या वेबसाइटच्या चौकशीचे आदेश दिले.
अनुचित व्यापारी प्रघात अॅमेझॉनच्या माध्यमातून पाडले जातात, असा ठपका ठेवण्यात आला. अॅमेझॉन आणि वॉलमार्टचलित फ्लिपकार्ड व्यापारी सेवेने तटस्थ बाजारपेठ म्हणून काम करावे, अशी अपेक्षा आहे. ई-वाणिज्य सेवेच्या माध्यमातून व्यापारी वस्तूंची यादी नियंत्रित करणे किंवा त्याच्या किमती प्रभावित करणे अपेक्षित नाही अन् सध्या नेमके हेच घडत आहे.अॅमेझॉनने भारतात ३७ टक्के व्यापारी जम बसवला आहे. तरुणांत हे फॅड आणखीन वाढतच आहे. त्यामुळे ७ कोटी छोटे व्यापारी अन् त्यांची कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अगदी पहिल्या फटक्यातच मोबाइल, रेडिमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, सौंदर्य प्रसाधने, किराणा आणि जनरल स्टोअर्स, अशी अनेक क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. या बदल्यात अॅमेझॉन रोजगार म्हणून पार्सल वितरण करणारी मुले आणि आॅपरेटर्सच्या नोकºया देण्याचे मधाचे बोट दाखवत आहे.वस्तुस्थिती अशी आहे की, देशी रिलायन्सचे जाळे ६ हजार ७०० शहरांत ११ हजार वितरक आहेत. केवळ भारतीय कंपनीला पाठिंबा देण्यासाठी अॅमेझॉनला निश्चितच विरोध झालेला नाही. असा कयास आहे की, जेफ बेझोस यांच्याकडे वॉशिंग्टन पोस्ट या आघाडीच्या वर्तमानपत्राची मालकी आहे. या वृत्तपत्राने सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीविरोधी भूमिका घेतली आहे. ‘वड्याचे तेल वांग्यावर काढायचे’ याप्रमाणे वॉशिंग्टन पोस्टच्या भूमिकेचा राग बेझोस यांच्यावर तर काढला नाही ना, अशी शंका विदेशनीतीचे तज्ज्ञ विजय चौथाईवाले यांच्या प्रतिक्रियेवरून येते.खरी गोम अशी आहे की, भाजप सत्तेच्या दुसºया टर्ममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘अजेंडा’ तंतोतंत राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७०, नागरिकत्व सुधारणा कायदा अशा अनेक गोष्टींची राबवणूक करून अप्रत्यक्षपणे ‘हिंदू रिपब्लिक’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आता अशीच स्वदेशी अजेंडा विशद करणारी संघभूमिका अर्थनीतीबद्दल घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट परदेशी गुंतवणुकीला विरोध नसल्याचे सांगितले; पण ही गुंतवणूक आम्हाला गरज असलेल्या क्षेत्रातच व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय व्यापार कोणत्याही परिस्थितीत प्रभावित होऊ नये व या व्यापाराचे नियंत्रण भारतीयांकडेच असावे, असे सूचित केले आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने नोव्हेंबर २०१९ मध्ये आशिया खंडातील तब्बल १४ देशांशी होणाºया महत्त्वपूर्ण प्रादेशिक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली नाही.