शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

आमले महाराज...लोकसेवेचा विरक्त प्रपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 02:50 IST

आमले महाराज अत्यंत प्रसन्न आयुष्य जगले. नात्यांच्या पाशात ते अडकले नाहीत पण आपल्या फाटक्या संसाराला मोडूही दिले नाही. त्यांच्यातील कुटुंबवत्सलतेची आणि साधुत्वाची ती कसोटी होती. त्यांनी प्रपंच केला खरा पण त्यात समाजाच्या सुखाचा ध्यास होता आणि तो आपला वाटणार नाही, असे एक त्रयस्थपणही होते.

- गजानन जानभोरआमले महाराज अत्यंत प्रसन्न आयुष्य जगले. नात्यांच्या पाशात ते अडकले नाहीत पण आपल्या फाटक्या संसाराला मोडूही दिले नाही. त्यांच्यातील कुटुंबवत्सलतेची आणि साधुत्वाची ती कसोटी होती. त्यांनी प्रपंच केला खरा पण त्यात समाजाच्या सुखाचा ध्यास होता आणि तो आपला वाटणार नाही, असे एक त्रयस्थपणही होते.आमले महाराज परवा गेले. गुरुदेव सेवा मंडळातील ते आद्य कीर्तनकार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांच्या सहवासाने त्यांचे आयुष्य समृद्ध झाले. अखेरच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते. आमले महाराज कमालीचे परखड होते. मागच्या आठवड्यात महाराजांचे कीर्तन झाले. कुणीतरी म्हणाले, ‘महाराज बसून बोला, थकवा येईल.’ काहीशा रागानेच महाराज त्याला म्हणाले, ‘मी मरेपर्यंत थकणार नाही’ असा परखडपणा यायला निष्कलंक चारित्र्य आणि निर्मोही आयुष्य वाट्याला येणे आवश्यक असते. आमले महाराजांना तसे जगता आले.अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात राजंदा नावाचे एक खेडे आहे. तिथे एका झोपडीत आमले महाराज राहायचे. पण, पायाला भिंगरी लागलेली. त्यामुळे एका गावात ते कधी थांबत नसत. १९४३ ची गोष्ट आहे, अकोल्यात राष्ट्रसंतांचा चातुर्मास होता. या चातुर्मासात आमले महाराजही सहभागी झाले. इथेच राष्ट्रसंतांशी स्रेह जुळला. भारत-चीन युद्धाच्यावेळी राष्ट्रसंतांसोबत ते सीमेवरही गेले. मोझरीच्या गुरुकुंज आश्रमातील प्रार्थना मंदिराचे बांधकाम सुरू असताना राष्ट्रसंत स्वत: कामावर होते. आमले महाराज त्यांच्यासोबत खड्डे खणायचे, माती भरायचे. हा तरुण बायको-पोरांना सोडून सेवाकार्यात असतो या गोष्टीचे तुकडोजी महाराजांना अप्रूप वाटायचे. त्यांच्याएवढाच गाडगेबाबांचाही आमले महाराजांवर जीव होता. बाबांचे कीर्तन सुरू झाले की, ते आमले महाराजांना उभे करायचे. मग आमले महाराज खंजेरीवर भजन म्हणायचे. गाडगेबाबांच्या भ्रमंतीचा आणि माणसे पारखण्याचा तो काळ. सुरुवातीला काही सोबतीला होते, काही मध्येच सोडून गेले. आमले महाराज मात्र बाबांना घट्ट बिलगून राहिले. एखाद्या गावात गेल्यानंतर बाबांचा मुक्काम मंदिराशेजारी असायचा. आमले महाराज खंजेरी वाजवत गावात फिरायचे आणि भाकरी घेऊन यायचे. महाराजांचे आयुष्य नि:संग. त्यांना बायको-पोरांची चिंता नव्हती. अशावेळी पत्नी निर्मलाबार्इंची घालमेल व्हायची. त्या मजुरीला जायच्या. मुलीसुद्धा मजुरीवर जाऊ लागल्या. मजुरी करून त्यांनी स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. आज त्या सर्व सुखात आहेत.आमले महाराज शेवटपर्यंत जाणीवपूर्वक कफल्लक राहिले. कीर्तनाचे मानधनही त्यांनी घेतले नाही. आलेवाडीच्या भीमराव वानखडे पाटलांनी २० एकर शेती त्यांना देऊ केली. परंतु ‘माझी खंजेरीच सोबत राहू द्या’, असे सांगून महाराजांनी हा मोहही टाळला. त्यांचा संसार हा असा फाटका आणि जागोजागी ठिगळ लागलेला. पण, बायको-पोरांनी कधी आदळआपट केली नाही. उलट त्यांना या फकिराच्या कफल्लकतेचा अभिमानच वाटायचा. या वैराग्याच्या लोकसेवेतच घरच्यांनी आयुष्याचे समाधान शोधले. महाराजांची पत्नी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत कामावर जायच्या. ‘जीवात जीव आहे तोपर्यंत मी कामावर जाईन’ निर्मलाबार्इंच्या चेहºयावर फाटक्या संसाराचे त्रासिकपण कधी जाणवले नाही. राष्ट्रसंतांचे एक प्रसिद्ध भजन आहे ‘यह संसार लोभ का हंडा, जीवनभर नही भरता’! आमले महाराज ते सतत गुणगुणायचे. त्यांच्या अनासक्त प्रपंचाचा अर्थ या भजनातून मग हळूहळू उलगडत जायचा. महाराज अत्यंत प्रसन्न आयुष्य जगले. या जगाचा निरोप घेताना त्यांच्या चेहºयावर कृतार्थता होती. नात्यांच्या पाशात ते अडकले नाहीत पण आपल्या फाटक्या संसाराला मोडूही दिले नाही. त्यांच्यातील कुटुंबवत्सलतेची आणि साधुत्वाची ती कसोटी होती. त्यांनी प्रपंच केला खरा पण त्यात समाजाच्या सुखाचा ध्यास होता आणि तो आपला वाटणार नाही, असे एक त्रयस्थपणही होते. 

टॅग्स :social workerसमाजसेवक