शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

आमले महाराज...लोकसेवेचा विरक्त प्रपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 02:50 IST

आमले महाराज अत्यंत प्रसन्न आयुष्य जगले. नात्यांच्या पाशात ते अडकले नाहीत पण आपल्या फाटक्या संसाराला मोडूही दिले नाही. त्यांच्यातील कुटुंबवत्सलतेची आणि साधुत्वाची ती कसोटी होती. त्यांनी प्रपंच केला खरा पण त्यात समाजाच्या सुखाचा ध्यास होता आणि तो आपला वाटणार नाही, असे एक त्रयस्थपणही होते.

- गजानन जानभोरआमले महाराज अत्यंत प्रसन्न आयुष्य जगले. नात्यांच्या पाशात ते अडकले नाहीत पण आपल्या फाटक्या संसाराला मोडूही दिले नाही. त्यांच्यातील कुटुंबवत्सलतेची आणि साधुत्वाची ती कसोटी होती. त्यांनी प्रपंच केला खरा पण त्यात समाजाच्या सुखाचा ध्यास होता आणि तो आपला वाटणार नाही, असे एक त्रयस्थपणही होते.आमले महाराज परवा गेले. गुरुदेव सेवा मंडळातील ते आद्य कीर्तनकार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांच्या सहवासाने त्यांचे आयुष्य समृद्ध झाले. अखेरच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते. आमले महाराज कमालीचे परखड होते. मागच्या आठवड्यात महाराजांचे कीर्तन झाले. कुणीतरी म्हणाले, ‘महाराज बसून बोला, थकवा येईल.’ काहीशा रागानेच महाराज त्याला म्हणाले, ‘मी मरेपर्यंत थकणार नाही’ असा परखडपणा यायला निष्कलंक चारित्र्य आणि निर्मोही आयुष्य वाट्याला येणे आवश्यक असते. आमले महाराजांना तसे जगता आले.अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात राजंदा नावाचे एक खेडे आहे. तिथे एका झोपडीत आमले महाराज राहायचे. पण, पायाला भिंगरी लागलेली. त्यामुळे एका गावात ते कधी थांबत नसत. १९४३ ची गोष्ट आहे, अकोल्यात राष्ट्रसंतांचा चातुर्मास होता. या चातुर्मासात आमले महाराजही सहभागी झाले. इथेच राष्ट्रसंतांशी स्रेह जुळला. भारत-चीन युद्धाच्यावेळी राष्ट्रसंतांसोबत ते सीमेवरही गेले. मोझरीच्या गुरुकुंज आश्रमातील प्रार्थना मंदिराचे बांधकाम सुरू असताना राष्ट्रसंत स्वत: कामावर होते. आमले महाराज त्यांच्यासोबत खड्डे खणायचे, माती भरायचे. हा तरुण बायको-पोरांना सोडून सेवाकार्यात असतो या गोष्टीचे तुकडोजी महाराजांना अप्रूप वाटायचे. त्यांच्याएवढाच गाडगेबाबांचाही आमले महाराजांवर जीव होता. बाबांचे कीर्तन सुरू झाले की, ते आमले महाराजांना उभे करायचे. मग आमले महाराज खंजेरीवर भजन म्हणायचे. गाडगेबाबांच्या भ्रमंतीचा आणि माणसे पारखण्याचा तो काळ. सुरुवातीला काही सोबतीला होते, काही मध्येच सोडून गेले. आमले महाराज मात्र बाबांना घट्ट बिलगून राहिले. एखाद्या गावात गेल्यानंतर बाबांचा मुक्काम मंदिराशेजारी असायचा. आमले महाराज खंजेरी वाजवत गावात फिरायचे आणि भाकरी घेऊन यायचे. महाराजांचे आयुष्य नि:संग. त्यांना बायको-पोरांची चिंता नव्हती. अशावेळी पत्नी निर्मलाबार्इंची घालमेल व्हायची. त्या मजुरीला जायच्या. मुलीसुद्धा मजुरीवर जाऊ लागल्या. मजुरी करून त्यांनी स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. आज त्या सर्व सुखात आहेत.आमले महाराज शेवटपर्यंत जाणीवपूर्वक कफल्लक राहिले. कीर्तनाचे मानधनही त्यांनी घेतले नाही. आलेवाडीच्या भीमराव वानखडे पाटलांनी २० एकर शेती त्यांना देऊ केली. परंतु ‘माझी खंजेरीच सोबत राहू द्या’, असे सांगून महाराजांनी हा मोहही टाळला. त्यांचा संसार हा असा फाटका आणि जागोजागी ठिगळ लागलेला. पण, बायको-पोरांनी कधी आदळआपट केली नाही. उलट त्यांना या फकिराच्या कफल्लकतेचा अभिमानच वाटायचा. या वैराग्याच्या लोकसेवेतच घरच्यांनी आयुष्याचे समाधान शोधले. महाराजांची पत्नी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत कामावर जायच्या. ‘जीवात जीव आहे तोपर्यंत मी कामावर जाईन’ निर्मलाबार्इंच्या चेहºयावर फाटक्या संसाराचे त्रासिकपण कधी जाणवले नाही. राष्ट्रसंतांचे एक प्रसिद्ध भजन आहे ‘यह संसार लोभ का हंडा, जीवनभर नही भरता’! आमले महाराज ते सतत गुणगुणायचे. त्यांच्या अनासक्त प्रपंचाचा अर्थ या भजनातून मग हळूहळू उलगडत जायचा. महाराज अत्यंत प्रसन्न आयुष्य जगले. या जगाचा निरोप घेताना त्यांच्या चेहºयावर कृतार्थता होती. नात्यांच्या पाशात ते अडकले नाहीत पण आपल्या फाटक्या संसाराला मोडूही दिले नाही. त्यांच्यातील कुटुंबवत्सलतेची आणि साधुत्वाची ती कसोटी होती. त्यांनी प्रपंच केला खरा पण त्यात समाजाच्या सुखाचा ध्यास होता आणि तो आपला वाटणार नाही, असे एक त्रयस्थपणही होते. 

टॅग्स :social workerसमाजसेवक