शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खाणे आणि खरकटे : ऐन सणासुदीच्या काळात सर्वपक्षीय तमाशा; आता खऱ्या अर्थानं वग सुरू झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 08:28 IST

म्हटले तर महाराष्ट्रातील जनतेचे जोरदार मनोरंजन सुरू आहे, अन् झालेच तर एकमेकांचे कपडे फाडण्याच्या सर्वपक्षीय कार्यक्रमामुळे लोक खूषही आहेत.

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आधीचे आरोप-प्रत्यारोप गणगवळण वाटावी, आता खऱ्या अर्थाने वग सुरू झाला, अशा स्वरूपाचा सर्वपक्षीय राजकीय तमाशा ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्रात सुरू आहे. अलिबाग ते वाशिम अन् नाशिक ते कोल्हापूर, मध्येच दिल्ली अशी पायपीट करणारे किरीट सोमय्या, त्यांना बळ देणारे चंद्रकांतदादा पाटील, दादांच्या भाषेत शंभर अजितदादा खिशात ठेवणारे दबंग नेते देवेंद्र फडणवीस, या सगळ्यांना उत्तरे देता देता ज्यांना सूर्य कधी मावळतो तो कळत नाही असे संजय राऊत, कोल्हापूरच्या तालमीत शड्डू ठोकणारे हसन मुश्रीफ अन् आतापर्यंत आपल्यापैकी एकावरही आरोप झाला नसल्याने बांधावर बसून मजा पाहणारे काँग्रेसचे मंत्री, हे सगळे मान्यवर या वगनाट्यात वेगवेगळ्या भूमिकेत आहेत. 

म्हटले तर महाराष्ट्रातील जनतेचे जोरदार मनोरंजन सुरू आहे, अन् झालेच तर एकमेकांचे कपडे फाडण्याच्या सर्वपक्षीय कार्यक्रमामुळे लोक खूषही आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर किरीट सोमय्या अधिक जोमाने पक्षकार्याला लागले. भ्रष्टाचारविरोधी लढाई त्यांनी तीव्र केली. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली अन् युती करून लढलेले भाजप, शिवसेना निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावर एकमेकांच्या विरोधात गेले. शिवसेेनेने दोन्ही काँग्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून सोमय्यांच्या तोफेतला दारूगोळा जरा अधिकच विध्वंसक बनला आहे. किंबहुना तसे चित्र ते उभे करीत आहेत. भाजपच्या तोफेला परमबीरसिंग, रश्मी शुक्ला वगैरे पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बत्ती लावली व त्यात अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रिपदाचा बळी गेला. दरम्यान, वेगळ्याच नाजूक प्रकरणात संजय राठोड यांची विकेट गेली. आता पुढचे कोण, या प्रश्नाचे उत्तर सोमय्या व त्यांचे झिलकरी रोज वेगवेगळे देत राहतात. (All-Party's spectacle during the festival season; Now the real Vag has started!)

प्रत्यक्ष अनिल देशमुखांच्या विरोधातील खटला अजून उभा राहिलेला नाही. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात तूर्त त्यांचे नाव नाही. आधीच्या लोकशाही आघाडी सरकारच्या अंतिम टप्प्यात भ्रष्टाचाराचा आरोप झालेले छगन भुजबळ हे पुतणे समीर यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताकाळात दोन वर्षे तुरुंगात राहिले. नुकतेच न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केल्यामुळे राजकीय नेत्यांनी चिखलफेकीच्या स्वरूपात केलेल्या आरोपांचे पुढे काय होते, याचेही उत्तर जनतेला मिळाले आहे. सोमय्या म्हणतात तशी मुख्यमंत्री, त्यांचे कुटुंब किंवा सहायकांची बेनामी मालमत्ता ऑक्टोबर २०१९ नंतर तयार झालेली नसेल. तेव्हा, भाजप-शिवसेना युतीच्या काळात त्यांनी ठाकरे कुटुंबावर किंवा त्यांच्या विश्वासातील मंत्र्यांवर आरोप का केले नाहीत? हसन मुश्रीफ यांच्या ज्या भानगडींची दवंडी आता मुंबईपासून कोल्हापूरपयर्यंत पिटली जातेय त्यादेखील काल-परवाच्या नक्की नाहीत. 

यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या पार्टिकल बोर्ड कारखान्याची नोंद दोन-अडीच दशकांपूर्वीची, त्यांच्या दिवंगत खासदार वडिलांच्या काळातील आहे. मग ही सगळी प्रकरणे आताच बाहेर येण्याचे कारण लहान पोरालाही समजण्यासारखे आहे. सोमय्या व भाजपचे नेते आदल्या दिवशी आरोप करतात व दुसऱ्या दिवशी ईडी व सीबीआयची पथके संबंधितांच्या कार्यालयावर धडकतात. जणू ती मुंबईच्या विमानतळावरच वाट पाहत बसलेली असावीत, हे तर्कट न समजायला लोक काही दुधखुळे नाहीत. स्वत: सोमय्या किंवा त्यांचे नेते आधी नारायण राणे प्रभृतींसारख्या ज्यांच्याविरोधात कडाडले होते, ते भले लोक भाजपमध्ये गेल्यानंतर कसे काय पवित्र होतात, हेदेखील लोकांना चांगले समजते. तरीदेखील केंद्रात सत्तेत असलेला पक्ष राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचे कपडे फाडत असेल व राज्यातली सत्ताधारी आघाडी आधीच्या सरकारच्या भानगडी खोदायचा इशारा देत असेल तर सामान्य माणसांना मनोरंजनापलीकडे एक वेगळेच समाधान लाभते. फाडा, फाडा, एकमेकांचे कपडे फाडा, असे ओरडून सांगावे असे सामान्यांना वाटते.  पैशासाठी सत्ता व सत्तेतून अधिक पैसा, त्या पैशाचा वापर करून पुन्हा सत्ता, त्यात कुणी आडवे आले तर मात्र लगेच राजा हरिश्चंद्राचा अवतार बनून एकमेकांचे खाणे चव्हाट्यावर आणायचे, हे अत्यंत किळसवाणे दुष्टचक्र सामान्य मतदारांच्या वाट्याला आले आहे. यातूनच मग जे अधिक काळ सत्तेवर असतील त्यांचे खाणेही अधिक अन् त्या खाण्यादरम्यान ताटाभोवती सांडणारे खरकटेही अधिक. ज्यांना सत्ताच अल्पकाळ लाभली त्यांचे खाणे कमी, त्यांच्या ताटाभोवती पडणारे खरकटेही चार शितांपुरते मर्यादित, हा या खाद्यसंस्कृतीचा उपभाग. तेव्हा पुन्हा पंगती बसविण्यासाठी जरी हे होत असले तरी या निमित्ताने निघणारे खाणे व खरकटे स्वच्छतेसाठी चांगलेच आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणKirit Somaiyaकिरीट सोमय्याHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस