शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या जागांचे मुल्यांकन कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:33 IST

जिल्हा परिषदेच्या जागांचा प्रश्न निर्माण झाला तो दोंडाईचा येथील श्रेणी १चा पशुवैद्यकीय दवाखाना दोंडाईचा - वरवाडे नगरपालिकेला देण्याच्या मुद्द्यावरून. ...

जिल्हा परिषदेच्या जागांचा प्रश्न निर्माण झाला तो दोंडाईचा येथील श्रेणी १चा पशुवैद्यकीय दवाखाना दोंडाईचा - वरवाडे नगरपालिकेला देण्याच्या मुद्द्यावरून. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. हा विषय राजकीय हेतूने सभेत आला असला तरी शासकीय मालमत्तेचे कसे अवमूल्यन होत आहे, हे यातून स्पष्ट झाले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जागेची किंमत कोट्यवधी असल्याचे सांगण्यात येते. नगर परिषदेला या दवाखान्याची जागा द्यायची तर नगर परिषद जिल्हा परिषदेला किती रक्कम देणार, याचा काहीच उल्लेख नाही. यामुळे जिल्हा परिषदेचे मोठे नुकसान होणार हे निश्चित. मात्र, सत्ता असली की, काहीही निर्णय घ्यायचे, हे यातून दिसून येते. एका स्थानिक स्वराज्य संस्थेकडून दुसऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जागा हस्तांतरीत होत आहे, हा सत्ताधाऱ्यांचा दावा बुद्धीला न पटणाराच आहे. जिल्हा परिषदेचे आर्थिक नुकसान न होता फायदा झाला पाहिजे, अशा पद्धतीने सत्ताधारी व विरोधकांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे.

दरम्यान, या दवाखान्याच्या जागेवर तब्बल २०० घरांचे अतिक्रमण झाल्याचे पशुवैद्यकीय विभागातर्फे सांगण्यात आले. अतिक्रमण होत असतांना संबंधित विभागाने केवळ बघ्याची भूमिकाच घेतल्याचे दिसून येते. कुठलेही अतिक्रमण काढणे सोपे नाही. मग, आता हे २०० घरांचे अतिक्रमण कसे निघणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या अशा अनेक जागांवर आजपर्यंत अतिक्रमण झालेले आहे. अनेकांनी या जागा हडपल्याचा संशय आहे. आपल्या किती व कुठे कुठे जागा आहेत, याचा जिल्हा परिषदेलाही थांगपत्ता नाही. अधिकारी तीन-चार वर्षांसाठी येतात काम करून निघून जातात. आपण प्रयत्न केल्यास आपल्याच माथी हे अतिक्रमण शोधण्याचे काम पडेल, असे समजून कर्मचारीही दुर्लक्ष करतात. जिल्हा परिषदेचे सदस्यही जिल्हा परिषदेच्या मालमत्ता शोधण्याची मागणी करतात. नंतर विषयावर पडदा पडतो. मात्र, मागच्या सभेत ज्या विषयावर चर्चा झाली होती, त्याचे काय झाले? याचा पाठपुरावा कोणी करीत नाही. त्यामुळे अशा महत्वपूर्ण विषयांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या मालमत्ता किती ही माहिती उपलब्ध नाही, ही शोकांतिकाच आहे. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सदस्यांनीही सजग राहणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांचा शोध घेतला पाहिजे. ज्यांनी अतिक्रमण केले असेल ते काढण्यासाठी प्रयत्न झाले? पाहिजे. या जागा ताब्यात घेऊन त्या भाड्याने दिल्यास जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात नक्कीच भर पडणार आहे. शिवाय चांगल्या कामांसाठीही या जागांचा वापर होऊ शकेल. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून सदस्यांनी त्याला साथ दिली पाहिजे. तरच जिल्हा परिषदेच्या जागांचा शोध लागेल. अन्यथा प्रत्येकवेळी हा विषय उपस्थित होईल. त्यावर थातुरमातूर उत्तरे मिळत राहतील.