शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजातील मृताची अंत्ययात्रा अडविल्याचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST

धुळे : मातंग समाजाची अंत्ययात्रा अडविल्याची संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली असून, या घटनेचे धुळे जिल्ह्यातही पडसाद उमटत आहेत. ...

धुळे : मातंग समाजाची अंत्ययात्रा अडविल्याची संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली असून, या घटनेचे धुळे जिल्ह्यातही पडसाद उमटत आहेत. भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतर्फे नुकतीच निदर्शने करण्यात आली. अंत्ययात्रा अडविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यात मातंग समाजाचे पनाजी अनंता साठे यांची अंत्ययात्रा पाेलिसात दिलेल्या तक्रारीचा राग मनात ठेवून अडवण्यात आली. पाेलिसात दिलेली तक्रार मागे घेत असल्याचे लेखी द्या, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी मृताचे नातेवाईक साठे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. अंत्ययात्रा अडवण्याच्या ठिकाणी पाेलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पाेलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी उपस्थित हाेते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी हा प्रश्न सोडवण्याची गरज होती. पण त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला. या प्रकरणी दाेषींवर कारवाई करावी, पीडितांना संरक्षण द्यावे, त्यांचे पुनर्वसन करावे, पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत करावी, अधिकारांचा गैरवापर करणारे पाेलीस अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पानपाटील, प्रदेश सरचिटणीस महेंद्र खैरनार, नगरसेवक नागसेन बाेरसे, विनायक अहिरे, प्रकाश पाेळ, माेहित चित्ते, मनुकुमार गाेयर, वानखेडकर, गणेश आगलावे, विक्की थाेरात, बंटी मंगळे उपस्थित होते.

घटनेची सखोल चाैकशी करण्याची मागणी

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात बोरगाव येथे मातंग समाजातील साठे नावाच्या व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील रस्त्याने त्यांची अंत्ययात्रा नेली जात असताना गावातील जातीयवादी मानसिकतेच्या काही लोकांनी अंत्ययात्रा रोखून धरली आणि मज्जाव केला. या घटनेचा गुरू रविदास विचार मंचासह मोची चर्मकार समाजाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या घटनेच्या सखोल चाैकशीची मागणी केली आहे. तसेच दोषींना त्वरित अटक करण्याचीही मागणी केली आहे. यावेळी कन्हैया शामलाल साखरे, रामेश्वर चत्रे, देवेंद्र जपसरे, विवेक जपसरे, हर्षल शिंदे, शिवा चत्रे आदी उपस्थित होते.