शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५८ तासांसाठी जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात आतापर्यंत १०,६५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १७९ कोरोना ...

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात आतापर्यंत १०,६५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १७९ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे.

आग्रा रोडवर शनिवारी नेहमी प्रमाणे गजबजलेला दिसून आला. येथील हातगाडी व फेरीवाले विक्रेत्यांनी पोलिसांकडून कारवाई होऊ नये, यासाठी नावालाच मास्क लावलेला दिसून आला. तर काहींनी कारवाईच होत नाही. म्हणून दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षा चालकांना प्रवासी संख्या कमी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना अनेक रिक्षांमध्ये प्रवासी संख्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले तर काही जण विनामास्क फिरतानाही दिसून आले.

महानगरात सायंकाळी साडेपाच वाजेपासून शुकशुकाट

संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने सायंकाळी ७ वाजेपासून पोलीस पथकाकडून व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. सायंकाळी ७ वाजेनंतर शहरातील आग्रा रोड, फुलवाला चाैक, पारोळा रोड, पाचकंदील, बारापत्थर, माैलवीगंज अशा भागात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान फाशी पूलकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच बसस्थानक व पेट्रोल पंपावरदेखील शुकशुकाट दिसून आला. संचारबंदी लागू झाल्याने, सायंकाळपासून पोलिसांनी गस्त वाढवली होती. या कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोलियम पदार्थ, दूध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे आदींच्या वाहतुकीसाठी सवलत देण्यात आली आहे.

होळी व धूलिवंदन साध्या पद्धतीने साजरा करा

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने जनता कर्फ्यू लागू केका आहे. या कालावधीत येणारी होळी व धूलिवंदन साध्या पद्धतीने साजरा करावे, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळावे तसेच गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाण, हॉटेल्स, रिसॉर्ट, सभागृहे, खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांच्या मोकळ्या जागा आदी ठिकाणी साजरी होणारी होळी, धूलिवंदन आणि शबे बारात उत्सव साजरा करण्यास मनाई आहे.

पोलिसांची राहणार लक्ष

नियमांचे पालन होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पाेलिसांचे पथक नियुक्त केले आहे. या कालावधीत नियमाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा व मनपा प्रशासनाकडून केले आहे.