शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

मंजूर वीज उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करा

By admin | Published: January 10, 2017 11:57 PM

मालपूर येथे उपकेंद्रासाठी जागा मंजूर असतानाही उपकेंद्र कार्यान्वित केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहे.

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे विद्युत वितरण कंपनीचे वीज उपकेंद्र मंजूर असून ते त्वरित कार्यान्विय करून येथील शेतक:यांचा रब्बी हंगाम वाचवावा,  अशी मागणी येथील शेतक:यांनी केली आहे. उपकेंद्रासाठी जागा मंजूर असतानाही उपकेंद्र कार्यान्वित केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहे. तालुक्यातील मालपूर येथे 33-11 क्षमतेचे वीज उपकेंद्र गेल्या वर्षभरापासून मंजूर आहे. मात्र विद्युत वितरण कंपनीच्या कारभारामुळे ते अजून कार्यान्वित होताना दिसून येत नाही. याचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार असल्यामुळे शेतक:यांच्या चेह:यावर चिंता दिसून येत आहे.मालपूरसह परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड व पेरणी पूर्ण झाली असून या पिकांना आता पाणी देण्याची गरज येऊन ठेपली आहे. रब्बीतील पीक हे विहिरींच्या पाण्यावरच अवलंबून असतात, यासाठी अखंडित व पूर्ण दाबाने वीज आवश्यक आहे, मात्र येथे उपकेंद्र नसल्यामुळे दोंडाईचा येथून विजेचा पुरवठा केला जातो.दोंडाईचा येथून 20 कि.मी. दूर्पयत हा विजेचा पुरवठा होतो. ज्या विद्युत तारेतून पुरवठा होत असतो त्या खूप जुन्या व जीर्ण झाल्यामुळे तारा तुटून तांत्रिक बिघाड हा सतत होत असल्यामुळे मालपूर येथील मंजूर उपकेंद्र त्वरित कार्यान्वित होणे गरजेचे झाले आहे. झालेला तांत्रिक बिघाड शोधण्यासाठीदेखील खूप वेळ लागतो. यातच कधीकधी तर दिवस जातो. यामुळे शेती पिकांचेदेखील नुकसान होत आहे. तसेच 132 केव्ही दोंडाईचा येथून हा पुरवठा होतो. अंतर जास्त असल्यामुळे तसेच इतर गावांना देखील येथूनच वीजपुरवठा होत असतो. यामुळे विजेला पूर्ण दाब राहत नाही व शेतक:यांच्या यामुळे विद्युत मोटारीदेखील फिरत नसल्यामुळे हे उपकेंद्र त्वरित होणे आवश्यक आहे.आधीच खरिपात या परिसरातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे मोडून पडला आहे, आता संपूर्ण आशा रब्बीवर टिकून आहेत.