शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर विविध प्रकारच्या रोगांमुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:40 IST

बळसाणे व परिसरातील शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, उडीद,कापूस, तीळ, भुईमूग या पिकांची लागवड केली. गेल्या आठवड्यापासून रिपरिप ...

बळसाणे व परिसरातील शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, उडीद,कापूस, तीळ, भुईमूग या पिकांची लागवड केली. गेल्या आठवड्यापासून रिपरिप पाऊस तर कधी ढगाळ वातावरण असल्याने, कपाशी पिकांची पाने लालसर, पिवळसर झाली आहेत. सखल भागातील तुरीचे पीक देखील पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी पिकातून पाणी वाहत असल्याने त्या पिकांच्या मुळांना देखील विषाणूजन्य आजार जडले आहेत. बदलत्या वातावरणामुळे उडीद, मूग या पिकांवर भुरी, मावा रोग तर मक्यांवर लष्करी अळी व इतर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगराईमुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापूस, तूर, मूग या पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. तोडणीला आलेला मूग भिजल्यामुळे शेंगा फुगल्या तर कपाशी व कांद्याला जास्त पाणी झाल्यामुळे विषाणूजन्य आजाराने उद्ध्वस्त केले आहे. हलक्या जमिनीवरील पिकांवर किडीचा व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बळसाणे व परिसराचा शेतकरी मेटाकुटीला आला आहे

खरीप हंगामातील कांद्याची लागवड जवळपास पूर्ण झाली असून उशिराची लागवड सुरू आहे .पावसामुळे कांदा पिकावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बळसाणेसह माळमाथा परिसरात कांदा हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे परंतु सततच्या पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे कांदा पिकांवर मर रोगाची समस्या आहे.