शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पिकांवर विविध प्रकारच्या रोगांमुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:40 IST

बळसाणे व परिसरातील शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, उडीद,कापूस, तीळ, भुईमूग या पिकांची लागवड केली. गेल्या आठवड्यापासून रिपरिप ...

बळसाणे व परिसरातील शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, उडीद,कापूस, तीळ, भुईमूग या पिकांची लागवड केली. गेल्या आठवड्यापासून रिपरिप पाऊस तर कधी ढगाळ वातावरण असल्याने, कपाशी पिकांची पाने लालसर, पिवळसर झाली आहेत. सखल भागातील तुरीचे पीक देखील पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी पिकातून पाणी वाहत असल्याने त्या पिकांच्या मुळांना देखील विषाणूजन्य आजार जडले आहेत. बदलत्या वातावरणामुळे उडीद, मूग या पिकांवर भुरी, मावा रोग तर मक्यांवर लष्करी अळी व इतर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगराईमुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापूस, तूर, मूग या पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. तोडणीला आलेला मूग भिजल्यामुळे शेंगा फुगल्या तर कपाशी व कांद्याला जास्त पाणी झाल्यामुळे विषाणूजन्य आजाराने उद्ध्वस्त केले आहे. हलक्या जमिनीवरील पिकांवर किडीचा व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बळसाणे व परिसराचा शेतकरी मेटाकुटीला आला आहे

खरीप हंगामातील कांद्याची लागवड जवळपास पूर्ण झाली असून उशिराची लागवड सुरू आहे .पावसामुळे कांदा पिकावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बळसाणेसह माळमाथा परिसरात कांदा हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे परंतु सततच्या पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे कांदा पिकांवर मर रोगाची समस्या आहे.