शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
5
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
6
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
7
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
8
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
9
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
10
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
11
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
12
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
13
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
14
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
15
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
16
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
17
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
18
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
19
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आजपासून मोफत धान्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST

धुळे : गेल्या सात दिवसांपासून पुकारलेला संप रेशन दुकानदारांनी गुरुवारी स्थगित केला असून, सणासुदीत मोफत धान्य वितरणाचा मार्ग मोकळा ...

धुळे : गेल्या सात दिवसांपासून पुकारलेला संप रेशन दुकानदारांनी गुरुवारी स्थगित केला असून, सणासुदीत मोफत धान्य वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरासह जिल्ह्याच्या २५ टक्के दुकानांमध्ये धान्यसाठा पोहोचला आहे. ज्या दुकानांमध्ये धान्य उपलब्ध आहे, त्या दुकानांमध्ये आजपासून मोफत धान्याचे वितरण सुरू होणार आहे. येत्या दोन-चार दिवसात सर्वच दुकानांमध्ये मोफत धान्याचे वितरण सुरु होईल.

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी संतोष जैन यांनी सांगितले की, राज्य संघटनेने १ मेपासून संप पुकारला होता. ई-पाॅसवरील ग्राहकांचा अंगठा घेण्यास शासनाने स्थगिती दिली असली तरी रेशन दुकानदारांच्या विम्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. संपादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शासनासोबत चर्चा सुरु आहे. कोरोनामुळे बिकट झालेल्या परिस्थितीत राज्यातील रेशन दुकानदारांचा विमा काढला तर आर्थिक भार सहन होणार नाही. सध्या कोरोना रुग्णांचा उपचार आणि लसीकरणावर शासनाचा सर्वाधिक निधी खर्च होत असल्याने संप मागे घ्यावा अशी विनंती शासनाने केली. तसेच रमजान ईद आणि अक्षय तृतीया या सणासुदीच्या काळात गरजूंचे धान्यावाचून हाल होऊ नयेत यासाठी संघटनेने संप स्थगित केला आहे. येत्या एक-दोन दिवसात धान्याचे वितरण सुरू होईल, अशी माहिती संतोष जैन यांनी दिली.

दरम्यान, मोफत धान्य वितरणाची तयारी पुरवठा विभागाने केली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील ९८१ दुकानांपैकी २५ टक्के दुकानांवर म्हणजे जवळपास २५० दुकानांवर धान्य पोहोचले आहे. इतरही दुकानांवर धान्य पोहोचविण्यासाठी पुरवठा साखळी कामाला लागली आहे. धान्य वितरणात हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

कोणाला किती धान्य मिळणार

मे महिन्यासाठी ७ हजार २ मेट्रिक टन गहू आणि ८ हजार ८६८ मेट्रिक टन तांदूळ इतक्या धान्याचे नियोजन आहे. अंत्योदय अन्न योजनेत प्रतिशिधापत्रिका २३ किलो गहू आणि १२ किलो तांदूळ मिळेल. प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळेल. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना गेल्या वर्षाप्रमाणे प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळणार आहे. तसेच दुकानांमध्ये शिल्लक असलेली डाळ प्राधान्याने अंत्योदय लाभारर्थ्यांना आणि उर्वरित प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. हे सर्व धान्य मोफत मिळणार आहे.

जून महिन्यात अंत्योदय लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका २३ किलो गहू आणि १२ किलो तांदूळ मिळणार आहे. गहू २ रुपये किलो, भरडधान्य १ रुपये आणि तांदूळ ३ रुपये किलो मिळेल. तसेच १ किलो साखर २० रुपये किलोप्रमाणे मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळेल. धान्याचा दर अंत्योदय योजनेप्रमाणेच असणार आहे. प्राधान्य कुटुंबांना साखर मिळणार नाही. जूनमध्ये गहू काही प्रमाणात कमी करून भरडधान्य देण्याचे नियोजित आहे. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत जून महिन्यातदेखील अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मोफत मिळणार आहे.