शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

शेती खातेफोडअभावी अपात्रतेचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:13 PM

शेतकरी सैरभैर : पंतप्रधान शेतकरी योजनेंतर्गत सरकारनेच तोडगा काढण्याची मागणी

साक्री : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालुक्यात नव्हे तर राज्यात अनेक शेतकऱ्यांची जमिनीची अद्याप खाते फोड झालेली नाही. त्यामुळे कुटुंब जरी विभक्त असले तरी शेती मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर असल्याकारणाने अनेक शेतकरी कुटुंब या योजनेपासून वंचित राहणार आहेत.सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकºयांना कायमस्वरूपी आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकºयांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत दोन हेक्टरच्या आत जमीन असलेल्या शेतकºयांना दर वर्षी सहा हजार रुपये इतका निधी मिळणार आहे यासाठी तालुक्यातील महसूल स्तरावर शेतकºयांची माहिती जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी १५ फेब्रुवारी रोजी पात्र शेतकºयांची यादी प्रसिद्धही करण्यात आली आहे.परंतु अनेक गावांमध्ये पूर्वापार शेतकºयांच्या जमिनीची खातेफोड न झाल्याने किंवा अतिशय किचकट प्रकरण असल्याकारणाने अनेक शेतकरी खातेफोड करण्यापासून लांबच राहिले आहेत. तर काही शेतकºयांच्या आजोबा-पणजोबांच्या नावावर आजही जमिनी आहेत. कुटुंबाचा प्रचंड विस्तार झालेला असून कुटुंबातील अनेक सदस्य मयत झाले आहेत. त्यामुळे खातेफोड करण्यास शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.मोठ्या कुटुंबांमध्ये कौटुंबिक सदस्यांमध्येच मतभेद असल्याकारणाने शेतजमिनीची खाते फोड होऊ शकत नाही किंवा अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या नावावरच शेत जमिनी आहेत. यामुळे सातबारा उताºयावर जमिनीचे प्रमाण दोन हेक्टरपेक्षा अधिक असल्याने शेतकºयांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.काही शेतकºयांच्या वाट्यास एक एकर पेक्षाही कमी जमीन आहे. परंतु त्याच्या सातबाºयावर कुटुंबातील सर्वच सदस्यांची नावे लागलेली आहेत. भावा-भावांची तोंडी वाटणी झाल्यावरही सातबारा उताºयावर मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर जमीन दिसून येत आहे. त्यामुळे आता शेतकरीही सैरभैर झालेले आहेत यासाठी शासनाने योग्य तो पर्याय काढून अशा वंचित शेतकºयांनाही लाभ मिळायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.ज्या शेतकºयांच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असेल आणि त्यात त्याच्या इतर भावांचाही वाटा असेल अशा शेतकºयांची व जमिनीची फोड करून त्यांनाही लाभ देण्यात यावा, त्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे

टॅग्स :Dhuleधुळे