शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

दादागिरी, अरेरावी करणाऱ्या ठेकेदाराच्या माणसांना संतप्त शेतकऱ्यांनी हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST

नेर : येथील महामार्ग चौपदरीकरणाच्या झालेल्या निकृष्ट कामामुळे खचलेला भराव आणि सर्विस रोडच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महामार्ग डागडुजीचे काम बंद ...

नेर : येथील महामार्ग चौपदरीकरणाच्या झालेल्या निकृष्ट कामामुळे खचलेला भराव आणि सर्विस रोडच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महामार्ग डागडुजीचे काम बंद पाडल्याचे वृत्त लोकमतने दिल्याने याची दखल घेऊन शनिवारी एनएचआयच्या सहायक अभियंत्यांनी महामार्गस्थळी भेट दिली. या वेळी ठेकेदाराच्या माणसांनी शेतकऱ्यांनी अरेरावी करीत दादागिरी केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना तेथून हकलवून लावले. त्यामुळे निकृष्ट महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे.

नेर येथून सुरत-नागपूर महामार्ग महाल रायवट आणि महालकाळी या शिवारातून बायपास जात आहे. परंतु महामार्गाच्या दोन्ही बाजूंकडील पाण्याचा निचरा होण्यासाठी आऊटलेट टाकण्यात आले आहेत. परंतु पाण्याचा निचरा न होता ते तुंबून राहिल्याने मध्येच हा महामार्ग खचला आहे. तसेच दोन्ही बाजूचा भरावही खचला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या डागडुजीस विरोध करून काम बंद पाडले आहे. याबाबत लोकमतने सविस्तर वृत्त दिल्याने शनिवारी एनएचआयचे सहायक अभियंता निखिल महाले यांनी महामार्गाच्या ठिकाणी भेट दिली. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच वेळी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे चार ते पाच माणसांनी येऊन शेतकऱ्यांना अरेरावी करीत दादागिरीची भाषा केली. यामुळे उपस्थित शेतकरी अधिकच संतप्त झाले. त्यांनीही आपला पवित्रा बदलत ठेकेदाराच्या माणसांना तेथून हकलून लावले. तर एनएचआयचे सहायक अभियंता निखिल महाले यांनी शेतकऱ्यांची समस्या आणि मागण्या ऐकून घेत वरिष्ठांकडे त्या मांडण्याचे आश्वासन दिले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत या ठिकाणी कोणतेही काम होऊ देणार नाहीत, असा इशाराही या वेळी शेतकऱ्यांनी दिला. या वेळी हिराबाई काळे, विजय भास्करराव देशमुख, शिवाजीराव देशमुख, शंकरराव खलाणे, डाॅ. सतीश बोढरे, निंबा खलाणे, योगेश गवळे, पोलीस पाटील विजय देशमुख, विशाल देशमुख, राकेश माळी, काशिनाथ माळी, आबा माळी, सागर देशमुख, सुनील खलाणे, राहुल खलाणे, भटू माळी, काशिनाथ माळी, भटू कोळी, नीलेश माळी आदी शेतकरी उपस्थित होते.

गडकरींकडे मांडणार प्रश्न...

या निकृष्ट महामार्गासंदर्भात शंकरराव खलाणे यांनी थेट खासदार सुभाष भामरे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधून महामार्गाच्या ठिकाणी येण्याची विनंती केली. परंतु ते एका कार्यक्रमाला जात असल्याने येऊ शकले नाहीत. परंतु सोमवारी संसदीय अधिवेशनासाठी ते दिल्लीला जात असल्याने तेथेच नागरी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या महामार्गासंदर्भात चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या मांडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पत्र देऊनही घेतली नाही दखल...

नेर म्हसदी फाट्यावरील बायपास रस्त्यावरील उंची कमी करून तसेच बाजूला सर्विस रोड व विद्युत केंद्राजवळ (भदाणे फाटा) बोगदा आणि खंडलाय शिरधाने चौफुलीवर (भटाई फाटा) येथे डायव्हर्शन रस्ता तयार करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा खलाणे यांनी एनएचआयच्या प्रकल्प संचालकांना १४ जून रोजी पत्र दिले होते. परंतु त्याची कोणतीही दखल या विभागाने घेतली नाही. त्यामुळे ही मागणी मान्य न झाल्यास शेतकऱ्यांसह महामार्गावर उतरू, असा इशाराही खलाणे यांनी दिला आहे.

जबरदस्तीने काम केल्यास आत्मदहन...

महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या माणसांनी शेतकऱ्यांची समस्या ऐकून न घेता अरेरावीची आणि दादागिरीची भाषा केली आहे. परंतु आमच्या मागण्या आणि समस्या सुटत नाहीत तोपर्यंत कोणतेही काम होऊ देणार नाही. जर त्यांनी जबरदस्तीने येथे काम करण्याचा प्रयत्न केला तर महामार्गावरच आत्मदहन करू.

- हिराबाई काळे, महिला शेतकरी, नेर