शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२१बाबत ‘लोकमत’ने आज चर्चासत्राचे आयोजन केले होते. यात सीए श्रीराम देशपांडे ...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२१बाबत ‘लोकमत’ने आज चर्चासत्राचे आयोजन केले होते. यात सीए श्रीराम देशपांडे (अर्थतज्ज्ञ), सराफा व्यावसायिक दिलीप कुचेरिया, उद्योजक राजेंद्र जाखडी, ऑटोमाबाईल उद्योजक अविनाश लोखंडे, कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील, उत्तर महाराष्ट्र ट्रक असोसिएशनचे सेक्रेटरी मनोज राघवन, व्यापारी हर्ष रेलन सहभागी झाले होते. चर्चासत्रातील मान्यवरांचे ‘लोकमत’चे जिल्हा प्रमुख राजेंद्र शर्मा यांनी स्वागत केले.

संयमित अर्थसंकल्प

सीए श्रीराम देशपांडे यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पाचे सविस्तर विश्लेषण केले. ते म्हणाले, विद्यमान केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोरोनाच्या काळातही अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. यापूर्वी १९६५, १९७१ व १९८९-९० मध्ये भारताची अर्थव्यवस्था उणे झाली होती. आता ती ७.५ टक्के होईल असा अंदाज आहे. देशाचा जीडीपी वाढला पाहिजे हे अर्थमंत्र्यांसमोर आव्हान होते. आर्थिक संकटातून बाहेर पडायचे असल्यास खर्च वाढला पाहिजे असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. यावेळी ३४ लाख ८३ हजार कोटींचा खर्च प्रस्तावित केला असून, तो एक धाडसी निर्णय आहे. यावर्षी ९.५ टक्के वित्तीय तूट वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा अतिशय संयमित अर्थसंकल्प असून, रोजगाराला चालना देणारा आहे.

उद्योग क्षेत्राला चालना

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळणार असल्याचे उद्योजक राजेंद्र जाखडी यांनी सांगितले. देशातील २ लाख ३७ लाख जुनी वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत. त्याचा फायदा वाहन उद्योगाला होणार आहे. या वाहनांच्या सुट्या भागांचे पुनर्निर्माण होईल. रोजगार वाढतील. आता उद्योजकांना कोणाकडूनही वीज घेता येणार आहे, हादेखील चांगला निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.

इन्फ्रामध्येही गंतवणूक वाढणार

ॲाटोमाबाईल उद्योजक अविनाश लोखंडे म्हणाले, अर्थसंकल्पात बसगाड्यांसाठी १८ हजार कोटींची तरतूद केलेली आहे. इन्फ्रामध्येही गुंतवणूक वाढणार आहे. मात्र जुनी वाहने भंगारात काढण्याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नसल्याचे त्यांनी नमूद केले.

जुन्या वाहनांची भंगारात

काढण्याची कायमर्यादा वाढवावी

१५ ते २० वर्षे जुनी वाहने भंगारात काढण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल ट्रक असो.चे सेक्रेटरी मनोज राघवन यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ५० लाख रुपये खर्च करून मोठे मालवाहतूक वाहन खरेदी केले जाते. त्याचे कर्ज, शिवाय अपघात, मेंटेनन्स, डिझेलचे वाढते दर अशा सर्व गोष्टींमुळे कर्ज फेडणे कठीण होते. त्यातच १५-२० वर्षात ते वाहन भंगारात काढले तर मालकाला काहीच मिळणार नाही. त्यामुळे या जुन्या वाहनांची कायमर्यादा वाढवून मिळायला पाहिजे. दरम्यान, वाहनांसाठी लागणाऱ्या छोट्या पार्ट्सची आयात कमी होऊन ते येथेच तयार होतील. त्यामुळे अनेकांना राेजगार मिळू शकेल.

सुवर्ण व्यावसायिकांना फायदा

सुवर्ण व्यावसायिकांसाठी हा अर्थसंकल्प चांगला फायदेशीर असल्याचे सुवर्ण व्यावसायिक दिलीप कुचेरिया यांनी दिली. या अर्थसंकल्पामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढणार आहे. सुवर्ण व्यावसायिकांना या अर्थसंकल्पाचा फायदाच झालेला असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यापार कमी होणार नाही

याची काळजी घेतली

सोमवारी सादर झालेला अर्थसंकल्प संतुलित होता, असे सांगत व्यापारी हर्ष रेलन म्हणाले, सर्वसामान्यांना कुठलाही त्रास होणार नाही, तसेच गरजेपुरती करांमध्ये वाढ केलेली आहे. अर्थमंत्र्यांच्या निर्णयामुळे व्यापार वाढेल असे नाही, मात्र कमीही होणार नाही, याची काळजी घेतली आहे. शेती आणि आरोग्यावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे.

दरम्यान, जे जे पर्याय सुचविलेले आहेत, त्यातून रोजगार निर्मितीचा पर्याय खुला केलेला आहे. हाताला काम आणि कामाला दाम याची अंमलबजावणी यातून केलेली आहे. त्यामुळे दिलासादायक, आशावादी अर्थसंकल्प असेच त्याचे वर्णन करावे लागेल, असे मान्यवरांनी सांगितले.