शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

दोंडाईचामध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST

दोंडाईचा नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीस हिरवा झेंडा दाखवून डीवायएसपी कुमावत ...

दोंडाईचा नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीस हिरवा झेंडा दाखवून डीवायएसपी कुमावत यांनी उद्‌घाटन केले.

सायकल रॅलीत दोंडाईचा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, जितेंद्र गिरासे, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, दोंडाईचा हौशी सायकलिस्टचे राजन मोरे, प्रीतम भावसार, परिमल कौटुंरवार, महेंद्र बाविस्कर, कृष्णा नगराळे, भरतरी ठाकूर, हितेंद्र महाले, चिरंजीवी चौधरी, युसूफ कादियानी, उपमुख्यधिकारी हर्षल भामरे, आरोग्य निरीक्षक शरद महाजन, रोटरी सिनीअर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, ‘लायन्स’चे अध्यक्ष हमजा जिनवाला, राकेश अग्रवाल, सुनील शिंदे, आदींसह नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रास्ताविकात मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखता यावा, शहर स्वच्छ सुंदर व हरित व्हावे म्हणून शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियानाची सुरुवात केली आहे. जल, वायू, आकाश, पृथ्वी व अग्नी या निसर्गाच्या पंचातत्त्वांवर आधारित अभियान आहे. अभियानात दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेने सहभाग घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत घनकचऱ्याचे जागेवरच विलगीकरण करण्यावर भर आहे.

यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन म्हणा, मधुमेहाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शरीर स्वास्थ्यासाठी सायकल चालविणे गरजेचे आहे. दोंडाईचा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किमान एक दिवस म्हणजे सोमवारी सायकलीवरून कार्यालयात यावे. शहरात ५० ओपन स्पेस विकसित करण्यात आल्या असून त्यांचा शरीरस्वास्थ्यासाठी वापर व्हावा. प्रत्येक व्यक्तीने शहरात फिरताना वाहनाऐवजी सायकलीचा वापर केल्यास वजन नियंत्रित होण्यास मदत होईल. यावेळी कृष्णा नगराळे, विक्रम पाटील, जितेंद्र गिरासे, आदींनी मनोगत व्यक्त केले.