शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पीकावर करपा रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:28 IST

रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हवालदिल

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात कांदा पिकावर करपा रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विभागाने उपाययोजना सुवचाव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मालपूरसह परिसरात कांदा उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. यावर्षी सुरुवातीच्या पाणी टंचाईमुळे कांदा उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने यावर्षी कांदा लागवड केली. हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. अशावेळी कांदा रोप टाकून कांदा लागवड केली आहे. सध्या बाजारात देखील बºयापैकी भाव सुरू असल्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र अचानक करपा या रोगाचे कांद्यावर आक्रमण झाल्यामुळे पुन्हा शेतकºयांच्या स्वप्नांवर पाणी फिरताना दिसून येत आहे.येथील कांद्याच्या परतीच्या तसेच सततच्या पावसाचा देखील मोठा फटका बसला आहे. अशाही परिस्थितीत येथील शेतकºयांनी योग्य रासायनिक खतांची मात्रा व महागडे नामांकीत कंपनीचे किटक नाशके, बुरशी नाशकांची फवारणी करुन कांदा पात चांगली वाढीस लागवल व कांद्याची पात जमल्यास कांदा चांगला पोसला जातो असा येथील शेतकºयांचा अनुभव आहे. मात्र या करपा रोगामुळे होत्याचे होताना दिसून येत आहे.आता पावसाने चांगली उघडीप दिली असून उन्हाचे प्रमाण देखील योग्य आहे. अशावेळेला कांद्याचे पाणी तोडून या योग्य वातावरणामुळे जमलेल्या पाताचा रस खाली उतरुन कांदा पोसला जाणार होता. मात्र या करपामुळे संपूर्ण पात करपून वाकडी-तिकडी होत असल्यामुळे याचा कांदा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. अगदी हातातोंडाशी घास आलेला असताना हे संकट उभे राहिल्यामुळे येथील शेतकºयांना कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची खुप गरत आहे.यावर्षी खरीपातले कडधान्य पीक सुरुवातीच्या पावसाच्या अंतरामुळे वाया गेले तर भुसारातील बाजरी-ज्वारी, मका आदी पिके येथे २० जुलैच्या सुरु झालेल्या अखंड सतत तसेच परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे कणसावरच कोंब फुटून सडून गेली तर कापसाचे यावर्षी येथे मोठे क्षेत्रफळ दिसून येत असून संपूर्ण कापूस भिजून गेला आहे. या कापसाला ओल्याव्याचे कारण व्यापारी सांगून मातीमो भावाने खरेदी करतात शिवाय मजुरी देखील जास्त लागत असून घरात देखील साठवता येत नसल्यामुळे मजुरी व भागभांडवलाचा खर्च वजा जाता हातात येथील शेतकºयांच्या काहीच शिल्लक रहात नसल्यामुळे संपूर्ण मदार कांदा पिकावर होती व बाजारातील आजचा भाव बघता खूप उमेद बाळगत असताना या करपा रोगाच्या आक्रमणामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला असून कृषी विभागाने येथे भेट देऊन शेतकºयांना उपाययोजना सुचवाव्यात, अशी येथील शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे