शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

अनलॉकनंतर सर्व सुरळीत, चाळीसगाव-धुळे रेल्वेची मात्र अद्याप प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST

धुळे - अनलॉकनंतर सर्वकाही सुरळीत सुरू झाले आहे. इतर जिल्ह्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र धुळे- चाळीसगाव रेल्वेगाडीची ...

धुळे - अनलॉकनंतर सर्वकाही सुरळीत सुरू झाले आहे. इतर जिल्ह्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र धुळे- चाळीसगाव रेल्वेगाडीची प्रवाशांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. धुळे ते चाळीसगाव दरम्यान पॅसेंजर रेल्वेच्या चार फेऱ्या व्हायच्या. कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झाल्यानंतर तसेच लॉकडाउन झाल्यामुळे संपूर्ण देशातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. अनलॉकनंतर आता हळूहळू देशभरातील रेल्वेसेवा टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. सुरुवातीला पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर विशेष गाड्या व एक्प्रेस रुळांवरून धावणार आहेत. धुळे-चाळीसगाव पॅसेंजर गाडी मात्र अद्यापही सुरू झाली नसल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबई किंवा पुणे याठिकाणी जायचे असल्यास त्यांना पॅसेंजर गाडीने चाळीसगाव येथे जावे लागते. त्यानंतर तेथून पुढच्या टप्प्याचा प्रवास सुरू होतो. मात्र पॅसेंजर सुरू झाली नसल्याने प्रवाशांना एसटी किंवा खासगी बसेसने प्रवास करावा लागत आहे. खासगी बसेसचे जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. चाळीसगाव-धुळे रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

व्यापारी, रुग्ण व चाकरमान्यांचे हाल -

धुळे जिल्ह्यातून शिक्षण, व्यापार आणि वैद्यकीय उपचारासाठी मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यासाठी ते धुळे-चाळीसगाव रेल्वे आणि तेथून दादरपर्यंत पुढील रेल्वेने जातात. प्रवाशांना ही सुविधा देताना रेल्वे व्यवस्थापनाकडून धुळे रेल्वे स्थानकावर धुळे-चाळीसगाव रेल्वेला मुंबई, पुण्याचे कोच लावले जातात. नंतर ते दादरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेला लावले जातात. मात्र धुळे-चाळीसगाव पॅसेंजर बंद असल्याने व्यापारी, विद्यार्थी, उपचारासाठी जाणारे रुग्ण व चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

मागणीने धरला जोर -

पॅसेंजर गाडी सुरू करावी या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा या नुकतीच पुणे येथे खा. सुप्रिया सुळे यांची याबाबत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. रेल्वेसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. धुळे जिल्ह्यातून मुंबईला रोज सरासरी २५४, तर पुण्याला रोज सरासरी १५० प्रवासी जातात. परतणाऱ्यांची संख्या तितकीच आहे. आता मुंबई, पुण्याला जाणारी रेल्वे सुविधाच बंद झाल्याने यावर अवलंबून प्रवाशांचे हाल होत असून प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच गरजू रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रतिक्रिया -

धुळे - चाळीसगाव रेल्वेसेवा बंद असल्याने हाल होत आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी नेहमी मुंबई येथे जावे लागते. आता मात्र चाळीसगाव येथे बसने जातो व तेथून पुढचा टप्पा गाठतो. त्यामुळे जास्त पैसे खर्च होतात तसेच वेळेचाही अपव्यय होतो. धुळे - चाळीसगाव रेल्वेसेवा तत्काळ सुरू करून दिलासा द्यावा.

- संजय पाटील, प्रवासी

धुळे येथून जाणारी पॅसेंजर बंद असल्याने मोठा फटका बसला आहे. माझे व्यापारानिमित्ताने मुंबई-पुणे येथे नियमित जाणे होते. त्यासाठी चाळीसगाव येथे जाऊन पुढचा प्रवास करतो. आता मात्र रेल्वेसेवा बंद असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. इतर ठिकाणी गाड्या सुरू झाल्या असताना धुळे पॅसेंजर का सुरू झाली नाही, असा प्रश्न पडतो.

- कैलास पवार, प्रवासी