शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

अनलॉकनंतर सर्व सुरळीत, चाळीसगाव-धुळे रेल्वेची मात्र अद्याप प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST

धुळे - अनलॉकनंतर सर्वकाही सुरळीत सुरू झाले आहे. इतर जिल्ह्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र धुळे- चाळीसगाव रेल्वेगाडीची ...

धुळे - अनलॉकनंतर सर्वकाही सुरळीत सुरू झाले आहे. इतर जिल्ह्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र धुळे- चाळीसगाव रेल्वेगाडीची प्रवाशांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. धुळे ते चाळीसगाव दरम्यान पॅसेंजर रेल्वेच्या चार फेऱ्या व्हायच्या. कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झाल्यानंतर तसेच लॉकडाउन झाल्यामुळे संपूर्ण देशातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. अनलॉकनंतर आता हळूहळू देशभरातील रेल्वेसेवा टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. सुरुवातीला पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर विशेष गाड्या व एक्प्रेस रुळांवरून धावणार आहेत. धुळे-चाळीसगाव पॅसेंजर गाडी मात्र अद्यापही सुरू झाली नसल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबई किंवा पुणे याठिकाणी जायचे असल्यास त्यांना पॅसेंजर गाडीने चाळीसगाव येथे जावे लागते. त्यानंतर तेथून पुढच्या टप्प्याचा प्रवास सुरू होतो. मात्र पॅसेंजर सुरू झाली नसल्याने प्रवाशांना एसटी किंवा खासगी बसेसने प्रवास करावा लागत आहे. खासगी बसेसचे जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. चाळीसगाव-धुळे रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

व्यापारी, रुग्ण व चाकरमान्यांचे हाल -

धुळे जिल्ह्यातून शिक्षण, व्यापार आणि वैद्यकीय उपचारासाठी मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यासाठी ते धुळे-चाळीसगाव रेल्वे आणि तेथून दादरपर्यंत पुढील रेल्वेने जातात. प्रवाशांना ही सुविधा देताना रेल्वे व्यवस्थापनाकडून धुळे रेल्वे स्थानकावर धुळे-चाळीसगाव रेल्वेला मुंबई, पुण्याचे कोच लावले जातात. नंतर ते दादरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेला लावले जातात. मात्र धुळे-चाळीसगाव पॅसेंजर बंद असल्याने व्यापारी, विद्यार्थी, उपचारासाठी जाणारे रुग्ण व चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

मागणीने धरला जोर -

पॅसेंजर गाडी सुरू करावी या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा या नुकतीच पुणे येथे खा. सुप्रिया सुळे यांची याबाबत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. रेल्वेसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. धुळे जिल्ह्यातून मुंबईला रोज सरासरी २५४, तर पुण्याला रोज सरासरी १५० प्रवासी जातात. परतणाऱ्यांची संख्या तितकीच आहे. आता मुंबई, पुण्याला जाणारी रेल्वे सुविधाच बंद झाल्याने यावर अवलंबून प्रवाशांचे हाल होत असून प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच गरजू रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रतिक्रिया -

धुळे - चाळीसगाव रेल्वेसेवा बंद असल्याने हाल होत आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी नेहमी मुंबई येथे जावे लागते. आता मात्र चाळीसगाव येथे बसने जातो व तेथून पुढचा टप्पा गाठतो. त्यामुळे जास्त पैसे खर्च होतात तसेच वेळेचाही अपव्यय होतो. धुळे - चाळीसगाव रेल्वेसेवा तत्काळ सुरू करून दिलासा द्यावा.

- संजय पाटील, प्रवासी

धुळे येथून जाणारी पॅसेंजर बंद असल्याने मोठा फटका बसला आहे. माझे व्यापारानिमित्ताने मुंबई-पुणे येथे नियमित जाणे होते. त्यासाठी चाळीसगाव येथे जाऊन पुढचा प्रवास करतो. आता मात्र रेल्वेसेवा बंद असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. इतर ठिकाणी गाड्या सुरू झाल्या असताना धुळे पॅसेंजर का सुरू झाली नाही, असा प्रश्न पडतो.

- कैलास पवार, प्रवासी