शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापुरातील आठवडी बाजार केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:10 IST

तुळजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केलेली असतानाही तुळजापुरात व्यापारी, शेतकऱ्यांकडून मागील दोन-तीन आठवड्यांपासून प्रत्येक मंगळवारी ...

तुळजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केलेली असतानाही तुळजापुरात व्यापारी, शेतकऱ्यांकडून मागील दोन-तीन आठवड्यांपासून प्रत्येक मंगळवारी बाजार भरविला जात होता. अखेर नगर परिषद प्रशासनाने ३१ ऑगस्ट रोजी सकाळीच बाजारस्थळी भेट देत आलेल्या बाजारकरू, व्यापाऱ्यांना परत पाठवून बाजार बंद केला.

मागील आठवड्यातील मंगळवारी मोठ्या प्रमाणावर आठवडी बाजार भरल्याने व शेजारील जिल्ह्यातून देखील भाजीविक्रेते, व्यापारी आल्याने बाजारात मोठी गर्दी झाली होती. त्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आठवडी बाजारात विक्रीसाठी कोणी येऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते; परंतु याकडे दुर्लक्ष करीत ३१ ऑगस्ट रोजी अनेक शेतकरी भाजीपाला घेऊन सकाळी आठवडी बाजारात विक्रीसाठी दाखल झाले होते. यावेळी उपस्थित न. प. कर्मचाऱ्यांनी आलेल्या सर्वांना आठवडी बाजारात बसण्यास मनाई करून परत पाठवले. त्यामुळे मंगळवारचा आठवडी बाजार भरलाच नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नगरपरिषदेने आठवडी बाजार बंद केल्याचे सांगण्यात आले.