शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा दर पाच हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST

कळंब : इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न देणारे पीक ठरल्याने अलीकडे सोयाबीनचा पेरा वेगाने वाढलेल्या कळंब तालुक्यातील शेतकरी, दरात ...

कळंब : इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न देणारे पीक ठरल्याने अलीकडे सोयाबीनचा पेरा वेगाने वाढलेल्या कळंब तालुक्यातील शेतकरी, दरात झालेल्या कमालीच्या घसरणीमुळे मात्र हवालदिल बनला आहे. अवघ्या दहा दिवसात दहा हजारावरून दराची पाच हजारावर घसरण झाली आहे.

कळंब तालुक्यात मागच्या दशकभरात पीक पद्धतीत अमूलाग्र बदल घडून आले आहेत. तूर, उडीद, मूग व कापूस या पिकांचा वरचष्मा मोडीत काढत एकूण पेरा झालेल्या क्षेत्रापैकी ऐंशी टक्के क्षेत्रावर एकट्या सोयाबीनचा बोलबाला निर्माण झाला आहे. इतर पिकांच्या तुलनेत कमी कालावधीत अधिक उत्पन्न देत असल्याने या पिकाच्या क्षेत्रातही वाढ नोंदली जात होती. यंदाही गतवर्षीच्या तुलनेत पाच हजार हेक्टरने वाढ होत तालुक्यातील सोयाबीनचे क्षेत्र साठ हजार हेक्टर झाले. पेरणी केल्यानंतर पहिला महिना पाऊसपाण्याच्या संदर्भात सुलभ गेला असला तरी, पुढे तब्बल २५ दिवस पावसाने ओढ दिल्याने हा खंड एकरी उत्पादनाला मारक ठरला होता.

उत्पादनात घट दृष्टिपथात दिसत असली तरी, बाजारात दरवृद्धीमुळे सोयाबीनचा ‘रूबाब’ होता. यामुळे उतार घटला तरी, दसहजारी ठरलेल्या सोयाबीनमुळे मालामाल होऊ असा शेतकऱ्यांचा आशावाद होता. परंतु, मागच्या दहा दिवसात हा दर पाच हजारावर आल्याने शेतकऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. आजच्या घडीला वाढलेला उत्पादन खर्च, काढणी व मळणीचा वाढता हिशेब गृहीत धरता, हा हंगाम मोठे आर्थिक नुकसान करणारा ठरत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

सोयाबीनचे दर...

महिना आवक (क्विंटल) दर (प्रतिक्विंटल )

जानेवारी २०२० ११९४७ ३९५०

जून २०२० ६१७२ ३८००

ऑक्टोबर २०२० ४७२०६ ३८००

जानेवारी २०२१ १०७१० ४३५०

जून २०२१ ११४१ ७३१०

सप्टेंबर २०२१ १३३७ ८०५०

सोयाबीनचा पेरा...

साल हेक्टर

२०१८ ५२०००

२०१९ ६३०००

२०२० ६५०००

२०२१ ६००००

प्रतिक्रिया...

यंदा मोठ्या संकटाने थोडेबहुत पीक हाती आले आहे. यास फडात उभे असताना आठ-नऊ हजाराचा दर होता. आता काढणी करावयाची आहे, तर दर अर्ध्यावर आला आहे. आजच्या भावात याचे विसेक हजारही येणार नाहीत. हा मोठा फटका आहे.

- बब्रुवान गोरे, शेतकरी, मस्सा (खं)

सध्या सोयाबीन पाच हजाराच्या आसपास आहे. यास काढावयास साडेचार हजार रुपये लागत आहेत. मळणीही महागली आहे. दर वाढला म्हणून मजूर जादा पैसै घेत आहेत. असे असताना सोयाबीन तर बेभाव विकले जात आहे. प्रत्येक शेतकरी यात खपला जात आहे. यामुळे भाववाढ झाली पाहिजे.

- राजाभाऊ गंभिरे, ईटकूर

बाजारभावाची चढ-उतार सामान्य व्यापाऱ्यांच्या आकलनाबाहेरची आहे. भाव का कोसळत आहेत, हे आम्हाला समजत नाही. आता पाहा, लातूर मिलच्या सकाळ अन् दुपारच्या भावात सहाशेची घट झाली आहे. काही तासाला असे घडत असेल, तर दूरचे काय सांगावे?

- लक्ष्मण कोल्हे, व्यापारी, कळंब