शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

फिर्यादी भाऊच निघाला मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : तीक्ष्ण हत्याराने खून करून मृतदेह आरसोली ते देवळाली रस्त्यावरील चारीत फेकून दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. ...

उस्मानाबाद : तीक्ष्ण हत्याराने खून करून मृतदेह आरसोली ते देवळाली रस्त्यावरील चारीत फेकून दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. यानंतर गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे वेगाने हलवून फिर्याद देणाऱ्या भावासच शुक्रवारी सायंकाळी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने खुनाची कबुली दिली असल्याची माहिती गुन्हे शाखेने शनिवारी दिली.

भूम तालुक्यातील आरसोली ते देवळाली रस्त्यावर गुरुवारी एक मृतदेह आढळून आला होता. परंडा पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर तो मृतदेह भूम तालुक्यातील आरसोली येथील विलास आबासाहेब गोयकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मयताचा भाऊ दिलीप गोयकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार परंडा ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. मयतावर झालेले निर्घृण वार व गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीवा जैन, अपर अधीक्षक नवनीतकुमार कावत, सहायक अधीक्षक एम. रमेश यांनी गुन्हे शाखेला तपास करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी उपनिरीक्षक शैलेंद्र पवार यांच्यासह कर्मचारी वलीउल्ला काझी, शिवाजी शेळके, महेश घुगे, गणेश सर्जे, बबन जाधवर, विठ्ठल गरड, धनंजय कवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. उपनिरीक्षक पवार यांनी फिर्यादी भावाकडे चौकशी सुरू केली असता त्यांच्या तक्रारीत व जबाबात विसंगती दिसून येऊ लागली. त्यामुळे संशय बळावला. त्यामुळे गुन्हे शाखेने पुन्हा एकदा मयताच्या घराकडे मोर्चा वळवून तेथील स्थितीची पाहणी केली. या वेळी काही संशयास्पद बाबी दिसून आल्याने फिर्यादीची उलटतपासणी घेण्यात आली. तेव्हा त्याने हा खून आपणच केल्याची कबुली दिली. लागलीच आरोपी दिलीप गोयकर यास ताब्यात घेऊन परंडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अवघ्या बारा तासांत उपनिरीक्षक पवार व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

कुऱ्हाडीने केले वार...

मयत विलास गोयकर हा खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होता. २१ सप्टेंबर रोजी तो कोर्टात तारखेस जाऊन नंतर मद्यपान करून घरी आला. घरी परतल्यावर त्याने भाऊ दिलीप गोयकर यास शिवीगाळ करीत मारहाण केली. यामुळे वैतागलेल्या दिलीप याने विलासच्या डोक्यावर, गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. नंतर त्याचा मृतदेह वडील आबासाहेब गोयकर यांच्या मदतीने पोत्यात बांधून दुचाकीवरून आरसोली-देवळाली रस्त्यावरील एका चारीत आणून टाकला.